शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

नियुक्ती आदेश आले; पण रूजू होण्याबाबत उदासिनताच

By admin | Updated: September 23, 2016 02:21 IST

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सध्याच्या स्थितीत रिक्त पदांच्या ग्रहणामुळे पुरती ढासळली आहे.

२६ पैकी १७ जणांना आदेश : केवळ दोघेच झाले रूजू रूपेश खैरी  वर्धाजिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सध्याच्या स्थितीत रिक्त पदांच्या ग्रहणामुळे पुरती ढासळली आहे. ही स्थिती सुधारण्याकरिता शासनाच्या आदेशनुसार जिल्ह्यातून २६ डॉक्टरांची निवड करून त्यांच्या अहवाल नियुक्ती आदेशाकरिता आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. यापैकी १७ जणांना नियुक्ती आदेश मिळाले. यापैकी केवळ दोघेच डॉक्टर सेवेत रूजू झाले. इतर १५ डॉक्टरांना नियुक्ती आदेश आले असताना ते अद्यापही रूज झाले नसल्याने ते शासकीय सेवेत येण्याकरिता उदासिन असल्याचे दिसत आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नोंद असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्याकरिता शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना डॉक्टरांची थेट निवड करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार ११० वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुलाखत घेत २६ जणांची निवड केली. नियुक्ती केंद्रीय प्रक्रीया असल्याने त्यांचे आदेश आरोग्य मंत्रालयातून येत असल्याने या २६ डॉक्टरांना नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा होती. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालातील २६ डॉक्टरांपैकी १७ जणांना शासनाच्यावतीने दोन टप्प्यात नियुक्ती आदेश दिले. पहिल्या टप्प्यात नऊ आणि दुसऱ्या टप्प्यात आठ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले. पहिल्या नऊ जणांना आदेश येवून आठ दिवसांचा कालावधी झाला. यातील केवळ दोनच जण रूजू झाले आहेत. नियुक्तीपत्र मिळूनही इतर डॉक्टरांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात येत आपल्या नियुक्तीबद्दल कुठलीही शहानिशा केली नसल्याने नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. रिक्त जागी कोण डॉक्टर रूजू होतात याकडे अनेकांचे लक्ष आहे. सर्वांना हवे तालुक्याचे ठिकाणजिल्हा आरोग्य यंत्रणेत निवड करण्यात आलेल्या डॉक्टरांना त्यांच्या मर्जीचे ठिकाण विचारूनच ते देण्यात आले होते; मात्र आता निवड झाल्यानंतर या डॉक्टरांना तालुक्याचे ठिकाण हवे असल्याची चर्चा जिल्हा आरोग्य विभागात आहे. आदेश आलेल्यांपैकी बऱ्याच डॉक्टरांना जिल्ह्याचे अथवा तालुक्याचे स्थळ पाहिजे आहे. यामुळे काही जणांच्या नियुक्तीची प्रक्रीया रखडली आहे.तालुका स्थळी नियुक्ती घेत या डॉक्टरांकडून शासकीय सेवेत राहून आपले खासगी रुग्णालय थाटण्याचे प्रयत्न असतात. या डॉक्टरांकडून एकवेळा खासगी रुग्णालयांचे बस्तान बसल्यास त्यांच्याकडून शासकीय सेवेकडे दुर्लक्ष होते, अशी आरोग्य विभागात चर्चा आहे. असे झाल्यास पुन्हा शासकीय आरोग्य यंत्रणा ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या २६ डॉक्टरांपैकी १७ जणांना आदेश मिळाले आहेत. असे असताना केवळ दोघेच जण रूजू झाले आहे. इतर आदेश आले नसून त्यांची प्रतीक्षा आहे. तसेच ज्यांचे आदेश आले त्यांच्या रूजू होण्याचीही प्रतीक्षा आहे.- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा.