शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्ती आदेश आले; पण रूजू होण्याबाबत उदासिनताच

By admin | Updated: September 23, 2016 02:21 IST

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सध्याच्या स्थितीत रिक्त पदांच्या ग्रहणामुळे पुरती ढासळली आहे.

२६ पैकी १७ जणांना आदेश : केवळ दोघेच झाले रूजू रूपेश खैरी  वर्धाजिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सध्याच्या स्थितीत रिक्त पदांच्या ग्रहणामुळे पुरती ढासळली आहे. ही स्थिती सुधारण्याकरिता शासनाच्या आदेशनुसार जिल्ह्यातून २६ डॉक्टरांची निवड करून त्यांच्या अहवाल नियुक्ती आदेशाकरिता आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. यापैकी १७ जणांना नियुक्ती आदेश मिळाले. यापैकी केवळ दोघेच डॉक्टर सेवेत रूजू झाले. इतर १५ डॉक्टरांना नियुक्ती आदेश आले असताना ते अद्यापही रूज झाले नसल्याने ते शासकीय सेवेत येण्याकरिता उदासिन असल्याचे दिसत आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नोंद असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्याकरिता शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना डॉक्टरांची थेट निवड करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार ११० वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुलाखत घेत २६ जणांची निवड केली. नियुक्ती केंद्रीय प्रक्रीया असल्याने त्यांचे आदेश आरोग्य मंत्रालयातून येत असल्याने या २६ डॉक्टरांना नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा होती. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालातील २६ डॉक्टरांपैकी १७ जणांना शासनाच्यावतीने दोन टप्प्यात नियुक्ती आदेश दिले. पहिल्या टप्प्यात नऊ आणि दुसऱ्या टप्प्यात आठ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले. पहिल्या नऊ जणांना आदेश येवून आठ दिवसांचा कालावधी झाला. यातील केवळ दोनच जण रूजू झाले आहेत. नियुक्तीपत्र मिळूनही इतर डॉक्टरांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात येत आपल्या नियुक्तीबद्दल कुठलीही शहानिशा केली नसल्याने नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. रिक्त जागी कोण डॉक्टर रूजू होतात याकडे अनेकांचे लक्ष आहे. सर्वांना हवे तालुक्याचे ठिकाणजिल्हा आरोग्य यंत्रणेत निवड करण्यात आलेल्या डॉक्टरांना त्यांच्या मर्जीचे ठिकाण विचारूनच ते देण्यात आले होते; मात्र आता निवड झाल्यानंतर या डॉक्टरांना तालुक्याचे ठिकाण हवे असल्याची चर्चा जिल्हा आरोग्य विभागात आहे. आदेश आलेल्यांपैकी बऱ्याच डॉक्टरांना जिल्ह्याचे अथवा तालुक्याचे स्थळ पाहिजे आहे. यामुळे काही जणांच्या नियुक्तीची प्रक्रीया रखडली आहे.तालुका स्थळी नियुक्ती घेत या डॉक्टरांकडून शासकीय सेवेत राहून आपले खासगी रुग्णालय थाटण्याचे प्रयत्न असतात. या डॉक्टरांकडून एकवेळा खासगी रुग्णालयांचे बस्तान बसल्यास त्यांच्याकडून शासकीय सेवेकडे दुर्लक्ष होते, अशी आरोग्य विभागात चर्चा आहे. असे झाल्यास पुन्हा शासकीय आरोग्य यंत्रणा ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या २६ डॉक्टरांपैकी १७ जणांना आदेश मिळाले आहेत. असे असताना केवळ दोघेच जण रूजू झाले आहे. इतर आदेश आले नसून त्यांची प्रतीक्षा आहे. तसेच ज्यांचे आदेश आले त्यांच्या रूजू होण्याचीही प्रतीक्षा आहे.- डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा.