शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाई गावासाठी स्वतंत्र सचिव नियुक्त करा

By admin | Updated: January 8, 2017 00:48 IST

नजीकच्या वाई ग्रा.पं. चा कारभार असलेल्या सचिवाकडे चार ग्रामपंचायतींचा कारभा आहे.

सरपंचाची मागणी : जि.प. सीईओंना साकडे रोहणा : नजीकच्या वाई ग्रा.पं. चा कारभार असलेल्या सचिवाकडे चार ग्रामपंचायतींचा कारभा आहे. यामुळे ते १५ ते २० दिवस गावात येऊ शकत नाहीत. परिणामी, गावातील विकास कामे रखडली आहेत. गरजूंना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यातही अडचणी येत आहे. यामुळे वाई ग्रा.पं. मध्ये स्वतंत्र सचिवाची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी सरपंच गणेश गचकेश्वर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व आर्वीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या मागणीकडे अद्याप लक्ष देण्यात आले नसून कायम सचिव मिळाला नाही. यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग पत्करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वाई हे आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव आहे. लहान व मोठी पिंपळधरी या कोलाम वस्तींचा या ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. शासन आदिवासींसाठी अनेक अनुदानाच्या य९ाजना राबवित आहे. या सर्व योजनांची माहिती पुरविणे, आवश्यक प्रमाणपत्रे प्रदान करण्याचे महत्त्वाचे काम ग्रामपंचायत सचिवाद्वारे केली जातात; पण या गावात सचिव १५ ते २० दिवसांतून कधीतरी दिसतात. आले तरी ते कधी येतात व कधी जातात, हे ग्रामस्थांच्या लक्षातही येत नाही. सचिव येत नसल्याने ग्रा.पं. च्या कर वसुलीची प्रक्रियाही पूर्णत: ठप्प आहे. परिणामी, ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही. पाणी पुरवठा योजनेची देयके थकित आहेत. विद्युत वितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद करण्याची नोटी ग्रामपंचायतीला बजावली आहे. गावातील रस्ते बांधणी, नाल्यावर पावसाळ्यापूर्वी पूल व्हावा यासाठी पाठपुरावा करणे आदी कामांसाठी सरपंचांना सचिवाची साथ गरजेचे असते. यासाठी सरपंचांनी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व आर्वीचे गटविकास अधिकारी यांना याबाबत तोंडी व लेखी माहिती दिली होती. वाई ग्रा.पं. ला स्वतंत्र सचिव द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती; पण दोन्ही अधिकाऱ्यांनी ऐकून घेण्यापलिकडे काहीही केले नाही. परिणामी, गावाचा विकास थांबला आहे. ग्रामस्थाां आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांसाठी ताटकळावे लागत आहे. नाईलाजाने मागणी पूर्ण करून घेण्यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा सरपंच गणेश गचकेश्वर यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांनी मागणीकडे जातीने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनीही केली आहे.(वार्ताहर)