शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाई गावासाठी स्वतंत्र सचिव नियुक्त करा

By admin | Updated: January 8, 2017 00:48 IST

नजीकच्या वाई ग्रा.पं. चा कारभार असलेल्या सचिवाकडे चार ग्रामपंचायतींचा कारभा आहे.

सरपंचाची मागणी : जि.प. सीईओंना साकडे रोहणा : नजीकच्या वाई ग्रा.पं. चा कारभार असलेल्या सचिवाकडे चार ग्रामपंचायतींचा कारभा आहे. यामुळे ते १५ ते २० दिवस गावात येऊ शकत नाहीत. परिणामी, गावातील विकास कामे रखडली आहेत. गरजूंना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यातही अडचणी येत आहे. यामुळे वाई ग्रा.पं. मध्ये स्वतंत्र सचिवाची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी सरपंच गणेश गचकेश्वर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व आर्वीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या मागणीकडे अद्याप लक्ष देण्यात आले नसून कायम सचिव मिळाला नाही. यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग पत्करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वाई हे आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव आहे. लहान व मोठी पिंपळधरी या कोलाम वस्तींचा या ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. शासन आदिवासींसाठी अनेक अनुदानाच्या य९ाजना राबवित आहे. या सर्व योजनांची माहिती पुरविणे, आवश्यक प्रमाणपत्रे प्रदान करण्याचे महत्त्वाचे काम ग्रामपंचायत सचिवाद्वारे केली जातात; पण या गावात सचिव १५ ते २० दिवसांतून कधीतरी दिसतात. आले तरी ते कधी येतात व कधी जातात, हे ग्रामस्थांच्या लक्षातही येत नाही. सचिव येत नसल्याने ग्रा.पं. च्या कर वसुलीची प्रक्रियाही पूर्णत: ठप्प आहे. परिणामी, ग्रामपंचायतीचे उत्पन्न नाही. पाणी पुरवठा योजनेची देयके थकित आहेत. विद्युत वितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद करण्याची नोटी ग्रामपंचायतीला बजावली आहे. गावातील रस्ते बांधणी, नाल्यावर पावसाळ्यापूर्वी पूल व्हावा यासाठी पाठपुरावा करणे आदी कामांसाठी सरपंचांना सचिवाची साथ गरजेचे असते. यासाठी सरपंचांनी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व आर्वीचे गटविकास अधिकारी यांना याबाबत तोंडी व लेखी माहिती दिली होती. वाई ग्रा.पं. ला स्वतंत्र सचिव द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती; पण दोन्ही अधिकाऱ्यांनी ऐकून घेण्यापलिकडे काहीही केले नाही. परिणामी, गावाचा विकास थांबला आहे. ग्रामस्थाां आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांसाठी ताटकळावे लागत आहे. नाईलाजाने मागणी पूर्ण करून घेण्यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा सरपंच गणेश गचकेश्वर यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांनी मागणीकडे जातीने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनीही केली आहे.(वार्ताहर)