शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसह स्वामिनाथन आयोग लागू करा

By admin | Updated: April 19, 2017 00:40 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा,

शेतकरी हक्क परिषदेतील ठराव : महात्मा फुले समता परिषदेचे आयोजन वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा, यासाठी स्वतंत्र व प्रभावी कायदा करावा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी कायद्याची ऐसीतैसी करू नये, असे ठराव शेतकऱ्यांनी एकमताने पारित केले. महात्मा फुले समता परिषदेद्वारे शेतकरी हक्क परिषद घेण्यात आली. यात शासन, प्रशासनाच्या निषेधासह अन्य पारित ठराव शासनाला सादर केले जाणार आहे. हक्क परिषदेमध्ये कुण्याही प्रस्थापित नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते, हे विशेष! शेतकऱ्यांनीच आपल्या व्यथा, वेदना या परिषदेत मांडाव्या. त्यावर चर्चा करावी आणि त्यातून सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकपणे संघटीत होऊन मार्ग काढावा, ही संकल्पना होती. शेतकरी प्रश्नांवर विचार मांडण्यासाठी हे व्यासपीठ सर्वांना खुले ठेवले होते. शेतकरी हक्क परिषदेत नागपूर समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या ३५ गावांतील शेतकरी हजर होते. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज त्वरित माफ करण्यात यावे, यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी या हक्क परिषदेमध्ये आले होते. यात शेतकरी महिलांचाही समावेश होता. परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. महाराष्ट्रात व देशात स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करून उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचा प्रभावी कायदा करावा. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जिल्हाधिकारी व त्यांच्या संमतीने चाललेल्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची दंडेलशाही बंद करावी. नागपूर-मुंबई महामार्गातील लँड पुलींग ही कायद्यातील बेकायदेशीर तरतूद त्वरित रद्द करावी, नवनगरांच्या नावाखाली वसणारी शहरे योजनेतून रद्द करावी. या महामार्गाची गरज नसल्याने तो रद्द करावा. जर शासनाला वाटाघाटीने शेतकऱ्यांकडून जमिनी हव्या असतील तर भूसंपादन कायद्याप्रमाणे पाचपट म्हणजे ८० लाख रुपये एकर जमिनीचा भाव जाहीर करावा व नंतरच वाटाघाटी कराव्या. सत्तारुढ पक्षाचे खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांबाबत जिथे भेटतील वा त्यांच्या सभेत जाऊन जाब विचारावा. यापुढे शेतकऱ्यांनी स्वत:च नेतृत्व करून आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. शेतकऱ्यांनी संघटीतपणे निराशग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत त्यांच्या समस्या सोडवाव्या, असे विविध ठराव घेण्यात आहे. ते शासनाला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहेत. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शेतकरी हक्क परिषदेला प्रारंभ झाला. यावेळी प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, अ‍ॅड. महेंद्र धोटे, मसुद खान पठाण, गंगाधर मुडे, रामराव मुडे, रमेश भोपळे, प्रा. मनोहर सोमनाथे, भाऊराव काकडे, सुधीर पांगुळ आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)