शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:31 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. केंद्रात १९९८ आणि २००२-०३ पासून शंभर टक्के शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली.

ठळक मुद्देमागणी : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.केंद्रात १९९८ आणि २००२-०३ पासून शंभर टक्के शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली. २००६ पर्यंत योजनेनुसार शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात आली. मात्र, त्यानंतर ज्यांचे उत्पन्न १ लाखाहुन अधिक त्यांच्या पाल्यांना शंभर टक्के निर्वाह भत्ता आणि ५० टक्के शुल्क परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय व्यवसायिक अभ्यास क्रमांमध्ये शुल्क भरताना मोठा आर्थिक फटका बसतो. दुसरीकडे अनुसुचित जाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर जातीसाठी स्वतंत्र वस्तीगृह आहे. मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा अडीच लाख करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अशी व्यवस्था नसल्याने त्यांच्यासाठी वसतीगृह निर्माण करण्याची मागणी संघटने तर्फे केली आहे. तसे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कल्पना मानकर, सुषमा भड, लक्ष्मी सावरकर, डॉ. माधुरी काळे, अलका भुगुल, शिला ढोबळे, शरद वानखेडे, सुनील सावध, प्रा. विकास काळे, विनय डहाके, राजेंद्र कळसाईत, शांताराम भालेराव, राजेंद्र भोयर, निलेश कोठे, मयुर वाघ, रोशन कुंभलकर, रोहित हरणे, सुयोग मुरारकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण