शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:31 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. केंद्रात १९९८ आणि २००२-०३ पासून शंभर टक्के शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली.

ठळक मुद्देमागणी : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.केंद्रात १९९८ आणि २००२-०३ पासून शंभर टक्के शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली. २००६ पर्यंत योजनेनुसार शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात आली. मात्र, त्यानंतर ज्यांचे उत्पन्न १ लाखाहुन अधिक त्यांच्या पाल्यांना शंभर टक्के निर्वाह भत्ता आणि ५० टक्के शुल्क परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय व्यवसायिक अभ्यास क्रमांमध्ये शुल्क भरताना मोठा आर्थिक फटका बसतो. दुसरीकडे अनुसुचित जाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर जातीसाठी स्वतंत्र वस्तीगृह आहे. मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा अडीच लाख करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अशी व्यवस्था नसल्याने त्यांच्यासाठी वसतीगृह निर्माण करण्याची मागणी संघटने तर्फे केली आहे. तसे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कल्पना मानकर, सुषमा भड, लक्ष्मी सावरकर, डॉ. माधुरी काळे, अलका भुगुल, शिला ढोबळे, शरद वानखेडे, सुनील सावध, प्रा. विकास काळे, विनय डहाके, राजेंद्र कळसाईत, शांताराम भालेराव, राजेंद्र भोयर, निलेश कोठे, मयुर वाघ, रोशन कुंभलकर, रोहित हरणे, सुयोग मुरारकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण