शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

घोषणा झाली; आदेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 15, 2017 00:42 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी अकरा दिवस लढा दिल्यानंतर राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्यातील शेतकऱ्यांनी अकरा दिवस लढा दिल्यानंतर राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली. ११ जून रोजी याबाबत घोषणा करण्यात आली; पण तीन दिवस लोटूनही बँकांमध्ये आदेश धडकले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. शासनाकडून कर्जमाफीबाबत कुठलेही निर्देश आले नाहीत. यामुळे लेखी आदेश येईपर्यंत कुठलीही कार्यवाही होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला ५० टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला. १ जूनपासून सुरू झालेला संप, आंदोलने तब्बल अकरा दिवस चालली. अकरा दिवसांच्या संघर्षानंतर शासनाकडून सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. यात अल्पभूधारक व अत्यल्प भूधारकांचे कर्ज तत्काळ प्रभावाने माफ करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले; पण अद्याप कुठल्याही प्रकारचे आदेश बँकांपर्यंत पोहोचले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना बँकांतून परत जावे लागत आहे. घोषणेला तीन दिवस लोटूनही लेखी आदेश न आल्याने कर्जमाफी हे ‘गाजर’ ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात १२ जूनपासून शेतकरी कर्जासाठी बँकांमध्ये चकरा मारत आहेत; पण बँकेत गेल्यानंतर प्रथम जुने कर्ज फेडा नंतरच नवीन कर्ज मिळेल, असा सूर आळविला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. सध्यसा खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी घोषणा झाल्यापासून बँकांमध्ये विचारणा करीत आहेत; पण लेखी आदेश न आल्याने बँकाही हतबल आहेत. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेत घोषणांबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे. १.१८ लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा जिल्ह्यात ५१७ ग्रा.पं. असून १३८२ गावे आहे. यात ३४ हजार ७३१ अत्यल्पभूधारक व ८४ हजार १२१ अल्पभूधारक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ प्रभावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे. यामुळे या १ लाख १८ हजार ८५२ शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. बँकांना लेखी आदेश आल्यानंतरच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या बँकांत चकरा राज्य शासनाकडून ११ जून रोजी घोषणा करण्यात आली; पण अद्याप कुठलेही निर्देश देण्यात आले नाही. शिवाय लेखी आदेशही आले नाही. यामुळे अंमलबजावणी झाली नाही. शासनाचे लेखी आदेश व रक्कम जमा होताच कर्जमाफी तथा कर्ज वाटपाची कारवाई केली जाईल. - वामन कोहाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.