शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

घोषणा झाली; आदेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 15, 2017 00:42 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी अकरा दिवस लढा दिल्यानंतर राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्यातील शेतकऱ्यांनी अकरा दिवस लढा दिल्यानंतर राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली. ११ जून रोजी याबाबत घोषणा करण्यात आली; पण तीन दिवस लोटूनही बँकांमध्ये आदेश धडकले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. शासनाकडून कर्जमाफीबाबत कुठलेही निर्देश आले नाहीत. यामुळे लेखी आदेश येईपर्यंत कुठलीही कार्यवाही होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला ५० टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला. १ जूनपासून सुरू झालेला संप, आंदोलने तब्बल अकरा दिवस चालली. अकरा दिवसांच्या संघर्षानंतर शासनाकडून सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. यात अल्पभूधारक व अत्यल्प भूधारकांचे कर्ज तत्काळ प्रभावाने माफ करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले; पण अद्याप कुठल्याही प्रकारचे आदेश बँकांपर्यंत पोहोचले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना बँकांतून परत जावे लागत आहे. घोषणेला तीन दिवस लोटूनही लेखी आदेश न आल्याने कर्जमाफी हे ‘गाजर’ ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात १२ जूनपासून शेतकरी कर्जासाठी बँकांमध्ये चकरा मारत आहेत; पण बँकेत गेल्यानंतर प्रथम जुने कर्ज फेडा नंतरच नवीन कर्ज मिळेल, असा सूर आळविला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. सध्यसा खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी घोषणा झाल्यापासून बँकांमध्ये विचारणा करीत आहेत; पण लेखी आदेश न आल्याने बँकाही हतबल आहेत. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेत घोषणांबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे. १.१८ लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा जिल्ह्यात ५१७ ग्रा.पं. असून १३८२ गावे आहे. यात ३४ हजार ७३१ अत्यल्पभूधारक व ८४ हजार १२१ अल्पभूधारक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ प्रभावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे. यामुळे या १ लाख १८ हजार ८५२ शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. बँकांना लेखी आदेश आल्यानंतरच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या बँकांत चकरा राज्य शासनाकडून ११ जून रोजी घोषणा करण्यात आली; पण अद्याप कुठलेही निर्देश देण्यात आले नाही. शिवाय लेखी आदेशही आले नाही. यामुळे अंमलबजावणी झाली नाही. शासनाचे लेखी आदेश व रक्कम जमा होताच कर्जमाफी तथा कर्ज वाटपाची कारवाई केली जाईल. - वामन कोहाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.