शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घोषणा झाली; आदेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 15, 2017 00:42 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी अकरा दिवस लढा दिल्यानंतर राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्यातील शेतकऱ्यांनी अकरा दिवस लढा दिल्यानंतर राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली. ११ जून रोजी याबाबत घोषणा करण्यात आली; पण तीन दिवस लोटूनही बँकांमध्ये आदेश धडकले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. शासनाकडून कर्जमाफीबाबत कुठलेही निर्देश आले नाहीत. यामुळे लेखी आदेश येईपर्यंत कुठलीही कार्यवाही होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला ५० टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला. १ जूनपासून सुरू झालेला संप, आंदोलने तब्बल अकरा दिवस चालली. अकरा दिवसांच्या संघर्षानंतर शासनाकडून सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. यात अल्पभूधारक व अत्यल्प भूधारकांचे कर्ज तत्काळ प्रभावाने माफ करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले; पण अद्याप कुठल्याही प्रकारचे आदेश बँकांपर्यंत पोहोचले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना बँकांतून परत जावे लागत आहे. घोषणेला तीन दिवस लोटूनही लेखी आदेश न आल्याने कर्जमाफी हे ‘गाजर’ ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात १२ जूनपासून शेतकरी कर्जासाठी बँकांमध्ये चकरा मारत आहेत; पण बँकेत गेल्यानंतर प्रथम जुने कर्ज फेडा नंतरच नवीन कर्ज मिळेल, असा सूर आळविला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. सध्यसा खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी घोषणा झाल्यापासून बँकांमध्ये विचारणा करीत आहेत; पण लेखी आदेश न आल्याने बँकाही हतबल आहेत. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेत घोषणांबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे. १.१८ लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा जिल्ह्यात ५१७ ग्रा.पं. असून १३८२ गावे आहे. यात ३४ हजार ७३१ अत्यल्पभूधारक व ८४ हजार १२१ अल्पभूधारक शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ प्रभावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे. यामुळे या १ लाख १८ हजार ८५२ शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. बँकांना लेखी आदेश आल्यानंतरच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या बँकांत चकरा राज्य शासनाकडून ११ जून रोजी घोषणा करण्यात आली; पण अद्याप कुठलेही निर्देश देण्यात आले नाही. शिवाय लेखी आदेशही आले नाही. यामुळे अंमलबजावणी झाली नाही. शासनाचे लेखी आदेश व रक्कम जमा होताच कर्जमाफी तथा कर्ज वाटपाची कारवाई केली जाईल. - वामन कोहाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.