शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

राज्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा लॉग मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:25 IST

देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.

ठळक मुद्देकिसान सभेची मागणी :कोल्हापुरात ठरणार रणनिती मुंबईत घेणार शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.डॉ. नवले म्हणाले की, राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुष्काळाचे सावट आहे. खरीपाची पीके हातीची गेली आहेत. रब्बी पीके हातुन जाण्याची शक्यता आहे.जनावरांच्या चाºयाचा प्रश्न अत्यंत जटील आहे. यावेळी चारा पशुखाद्य अत्यंत वेगाने महाग होत आहेत. जनावर व नागरीकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कठीण होणार आहे. राज्यात अशी परीस्थिती असतांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त काढला आहे.दुष्काळात निर्माण होणाºया प्रश्नांबाबत सरकारी उपाययोजनेची तयारी मात्र अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. दुष्काळाच्या या छायेत शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांना सावरण्यासाठी ३० जून २०१८ पर्यंत कर्जमाफी द्या. कर्जमाफीची दीड लाखाची कर्ज मर्यादा रद्द करा, कर्जाचे नियमित नुतनीकरण केलेल्या शेतकºयांनाही संपूर्ण कर्जमाफी द्या, दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या. पिक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करा, दुष्काळात होणाºया पाणी, चारा टंचाई दुर करण्यासाठी तातडीने नियोजन करा, रोजगार हमीची कामे सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा, जनतेला पुरेश्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पुरेशी सरकारी केंद्र सुरू करावी, उपलब्ध पाण्याचे समन्वयाने वाटप करावे, दारूच्या कारखान्याला पाणी देणे तातडीने थांबावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. आदी मागण्यांना घेऊन किसान सभा आगामी काळात आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी कोल्हापुर येथे दोन दिवस शेतकरी कार्यशाळा घेणार आहे. व मुंबई येथे शेतकरी मेळावा घेणार आहे. या माध्यमातून सरकार विरोधातील रोष व्यक्त होणार आहे व सरकारला जागे केले जाणार आहे अशी माहीती डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रसंगी किसान सभेचे राज्य सरचिटणीस व सुकाणू समिती प्रमुख डॉ. अजित नवले अहमदनगर, राज्य अध्यक्ष किसन गुजर नाशिक, नगरसेवक यशवंत झाडे. जानराव नागमोते, अनिल चव्हाण, अरूण लाटकर, राजू हटवार, शंकरराव दानव, महादेव गारपवार, दादा रायपुरे, अमोेल मारकवार, आदी उपस्थित होते.