शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा लॉग मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:25 IST

देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.

ठळक मुद्देकिसान सभेची मागणी :कोल्हापुरात ठरणार रणनिती मुंबईत घेणार शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.डॉ. नवले म्हणाले की, राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुष्काळाचे सावट आहे. खरीपाची पीके हातीची गेली आहेत. रब्बी पीके हातुन जाण्याची शक्यता आहे.जनावरांच्या चाºयाचा प्रश्न अत्यंत जटील आहे. यावेळी चारा पशुखाद्य अत्यंत वेगाने महाग होत आहेत. जनावर व नागरीकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कठीण होणार आहे. राज्यात अशी परीस्थिती असतांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त काढला आहे.दुष्काळात निर्माण होणाºया प्रश्नांबाबत सरकारी उपाययोजनेची तयारी मात्र अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. दुष्काळाच्या या छायेत शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांना सावरण्यासाठी ३० जून २०१८ पर्यंत कर्जमाफी द्या. कर्जमाफीची दीड लाखाची कर्ज मर्यादा रद्द करा, कर्जाचे नियमित नुतनीकरण केलेल्या शेतकºयांनाही संपूर्ण कर्जमाफी द्या, दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या. पिक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करा, दुष्काळात होणाºया पाणी, चारा टंचाई दुर करण्यासाठी तातडीने नियोजन करा, रोजगार हमीची कामे सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा, जनतेला पुरेश्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पुरेशी सरकारी केंद्र सुरू करावी, उपलब्ध पाण्याचे समन्वयाने वाटप करावे, दारूच्या कारखान्याला पाणी देणे तातडीने थांबावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. आदी मागण्यांना घेऊन किसान सभा आगामी काळात आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी कोल्हापुर येथे दोन दिवस शेतकरी कार्यशाळा घेणार आहे. व मुंबई येथे शेतकरी मेळावा घेणार आहे. या माध्यमातून सरकार विरोधातील रोष व्यक्त होणार आहे व सरकारला जागे केले जाणार आहे अशी माहीती डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रसंगी किसान सभेचे राज्य सरचिटणीस व सुकाणू समिती प्रमुख डॉ. अजित नवले अहमदनगर, राज्य अध्यक्ष किसन गुजर नाशिक, नगरसेवक यशवंत झाडे. जानराव नागमोते, अनिल चव्हाण, अरूण लाटकर, राजू हटवार, शंकरराव दानव, महादेव गारपवार, दादा रायपुरे, अमोेल मारकवार, आदी उपस्थित होते.