शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

राज्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा लॉग मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:25 IST

देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.

ठळक मुद्देकिसान सभेची मागणी :कोल्हापुरात ठरणार रणनिती मुंबईत घेणार शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.डॉ. नवले म्हणाले की, राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुष्काळाचे सावट आहे. खरीपाची पीके हातीची गेली आहेत. रब्बी पीके हातुन जाण्याची शक्यता आहे.जनावरांच्या चाºयाचा प्रश्न अत्यंत जटील आहे. यावेळी चारा पशुखाद्य अत्यंत वेगाने महाग होत आहेत. जनावर व नागरीकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कठीण होणार आहे. राज्यात अशी परीस्थिती असतांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त काढला आहे.दुष्काळात निर्माण होणाºया प्रश्नांबाबत सरकारी उपाययोजनेची तयारी मात्र अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. दुष्काळाच्या या छायेत शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांना सावरण्यासाठी ३० जून २०१८ पर्यंत कर्जमाफी द्या. कर्जमाफीची दीड लाखाची कर्ज मर्यादा रद्द करा, कर्जाचे नियमित नुतनीकरण केलेल्या शेतकºयांनाही संपूर्ण कर्जमाफी द्या, दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या. पिक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करा, दुष्काळात होणाºया पाणी, चारा टंचाई दुर करण्यासाठी तातडीने नियोजन करा, रोजगार हमीची कामे सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा, जनतेला पुरेश्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पुरेशी सरकारी केंद्र सुरू करावी, उपलब्ध पाण्याचे समन्वयाने वाटप करावे, दारूच्या कारखान्याला पाणी देणे तातडीने थांबावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. आदी मागण्यांना घेऊन किसान सभा आगामी काळात आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी कोल्हापुर येथे दोन दिवस शेतकरी कार्यशाळा घेणार आहे. व मुंबई येथे शेतकरी मेळावा घेणार आहे. या माध्यमातून सरकार विरोधातील रोष व्यक्त होणार आहे व सरकारला जागे केले जाणार आहे अशी माहीती डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रसंगी किसान सभेचे राज्य सरचिटणीस व सुकाणू समिती प्रमुख डॉ. अजित नवले अहमदनगर, राज्य अध्यक्ष किसन गुजर नाशिक, नगरसेवक यशवंत झाडे. जानराव नागमोते, अनिल चव्हाण, अरूण लाटकर, राजू हटवार, शंकरराव दानव, महादेव गारपवार, दादा रायपुरे, अमोेल मारकवार, आदी उपस्थित होते.