शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा लॉग मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:25 IST

देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.

ठळक मुद्देकिसान सभेची मागणी :कोल्हापुरात ठरणार रणनिती मुंबईत घेणार शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ- मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. अनेक समस्यांना शेतकरी समोर जात आहे. या समस्या लवकरच सरकारने सोडवाव्या व दुष्काळ जाहीर करावा अन्यथा १५ नोंव्हेबर रोजी आझाद मैदानावर लॉग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद दिली.डॉ. नवले म्हणाले की, राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुष्काळाचे सावट आहे. खरीपाची पीके हातीची गेली आहेत. रब्बी पीके हातुन जाण्याची शक्यता आहे.जनावरांच्या चाºयाचा प्रश्न अत्यंत जटील आहे. यावेळी चारा पशुखाद्य अत्यंत वेगाने महाग होत आहेत. जनावर व नागरीकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कठीण होणार आहे. राज्यात अशी परीस्थिती असतांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त काढला आहे.दुष्काळात निर्माण होणाºया प्रश्नांबाबत सरकारी उपाययोजनेची तयारी मात्र अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. दुष्काळाच्या या छायेत शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांना सावरण्यासाठी ३० जून २०१८ पर्यंत कर्जमाफी द्या. कर्जमाफीची दीड लाखाची कर्ज मर्यादा रद्द करा, कर्जाचे नियमित नुतनीकरण केलेल्या शेतकºयांनाही संपूर्ण कर्जमाफी द्या, दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या. पिक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करा, दुष्काळात होणाºया पाणी, चारा टंचाई दुर करण्यासाठी तातडीने नियोजन करा, रोजगार हमीची कामे सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा, जनतेला पुरेश्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पुरेशी सरकारी केंद्र सुरू करावी, उपलब्ध पाण्याचे समन्वयाने वाटप करावे, दारूच्या कारखान्याला पाणी देणे तातडीने थांबावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. आदी मागण्यांना घेऊन किसान सभा आगामी काळात आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी कोल्हापुर येथे दोन दिवस शेतकरी कार्यशाळा घेणार आहे. व मुंबई येथे शेतकरी मेळावा घेणार आहे. या माध्यमातून सरकार विरोधातील रोष व्यक्त होणार आहे व सरकारला जागे केले जाणार आहे अशी माहीती डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रसंगी किसान सभेचे राज्य सरचिटणीस व सुकाणू समिती प्रमुख डॉ. अजित नवले अहमदनगर, राज्य अध्यक्ष किसन गुजर नाशिक, नगरसेवक यशवंत झाडे. जानराव नागमोते, अनिल चव्हाण, अरूण लाटकर, राजू हटवार, शंकरराव दानव, महादेव गारपवार, दादा रायपुरे, अमोेल मारकवार, आदी उपस्थित होते.