शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अन्नपूर्णा माय घर धान्यानं भरू दे...

By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला जिल्ह्यासह विदर्भात आठवीची पूजा केली जाते. कागदावर काढलेल्या हत्तीची या काळात येत असलेल्या फळांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाचा मांडव

पराग मगर - वर्धाआश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला जिल्ह्यासह विदर्भात आठवीची पूजा केली जाते. कागदावर काढलेल्या हत्तीची या काळात येत असलेल्या फळांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाचा मांडव टाकला जातो. मातीच्या मडक्याचीही पूजा केली जाते. बाजारात सर्वत्र आठवीच्या पूजेचे साहित्य विकण्यास आले असून खरेदीची लगबग सुरू झाली आहे. निसर्गपूजक असलेल्या भारतीय समाजात आठवीची पूजा ही ढोवळमानाने धान्याची पूजा म्हणून केली जात असली तरी त्याचे सामाजिक व ऐतिहासिक संदर्भ काय याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे दिसते. भारतीय समाज हा मुळात निसर्गपूजक आहे. त्या त्या काळात येत असलेल्या धान्याची पूजा करण्याची प्रथा सर्वत्र आढळते. आठवीची पूजा ही त्याचेच द्योतक आहे. आता जरी सर्वत्र गव्हाचे प्रचलन असले तरी पूर्वी जिल्ह्यात बहुतेक भागात ज्वारी मुख्य पीक होते. भाकरी हेच मुख्य खाद्य होते. त्यामुळे ज्वारीला अन्नपूर्णाही संबोधल्या जाते. याच काळात ज्वारीची कणसं भरतात. त्यामुळे ते पीक घरी आणताना तिची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असावी. याच ज्वारीची आंबिल करून तिचा देवाला नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. घर ज्वारीच्या भरल्या कणसाप्रमाणे भरून जावं यासाठी ही पूजा केली होत असे. पण कालांतराने या पूजेचे संदर्भ बदलले. गंगेच्या काठावर असलेल्या प्रांतामध्ये या दिवशी कुमारिका आपल्या ओंजळीत पाणी आणून देवीची पूजा करतात. त्यामुळे याला कराष्टमीही म्हणतात. त्याचप्रमाणे काही भागात या सणाला लेकुरवाळीची पूजा असेही म्हणतात. घरी या दिवशी कुळाचार असतो. आठ फळे ठेवून पूजा केल्यानेही याला काही भागात आठवीची पूजा म्हणतात. असे असले तरी या सणाचे ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ काळाच्या ओघात धुसर झाले आहे. केवळ कुळाचार म्हणून पूजा केली जाते. खरीपातले पहिले धान्य असलेल्या ज्वारीच्या आंबिलीला विशेष मान होता. पण आता ज्वारीच पेरल्या जात नसल्याने प्रथा म्हणून दुकानातून ज्वारी आणून त्याची आंबिल केल्या जात असल्याचे दिसते.