शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सुसूंदवासीयांनी बांधली वनविभागाच्या वाहनाला जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:43 IST

गावात मागील दीड महिन्यापासून वाघाचे हल्ले सुरू आहे. यात अनेक जनावरांचा जीव गेला. भीतीमुळे शेती मशागतीची कामे रखडलेली आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला : दीड महिन्यापासून वाघाची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : गावात मागील दीड महिन्यापासून वाघाचे हल्ले सुरू आहे. यात अनेक जनावरांचा जीव गेला. भीतीमुळे शेती मशागतीची कामे रखडलेली आहे. गावकरी दहशतीत आहेत. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असताना वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी अखेर गावात आलेल्या वनविभागाच्या वाहनाला गाय, बैल व वासरू बांधून संताप व्यक्त केला. अखेर रात्री ११ वाजता खरांगण्याचे ठाणेदार निशीकांत रामटेके यांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला.सुसूंद (हेटी) हे जंगलव्याप्त भागात वसलेले गाव. गावात गोपालन हा शेतीला मुख्य जोडधंदा आहे. न्यू बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी सध्या या गावालगत आपले बस्थान मांडले आहे. मागील दीड महिन्यापासून या गावातील जनावरांवर सतत वाघाचे हल्ले सुरू आहे. यात शेळ्या, गाई, बैल व गोºहे वाघाच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. काही मरणाला टेकले आहे. त्यामुळे सर्वत्र भीती, दहशतीची गडद छाया पसरली आहे.अखेर सोमवारी चंपा शिवारात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बैलाला बघायला आलेल्या वनविभागाच्या वाहनाला पुढे बैल तर मागे गाय व वासरू बांधले. या जनावरांची रखवाली तुम्हीच करा, अन्यथा वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी गावकºयांनी केली. गावकरी व वनविभागाच्या अधिकाºयांत वाद वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार निशीकांत रामटेके व वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. ताल्हण यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत घातली. यातून मार्ग निघून रात्री ११ वाजता वाहनाची सुटका झाली.कामे खोळंबलीउन्हाळी भाजीपाला पिके शेतात सडली; पण शेतकरी काढणी करू शकला नाही. ओलीत सुद्धा करणे कठीण झाले आहे. या वाघाच्या दहशतीमुळे शेती मशागतीची कामे प्रभावित झाली. ५० हजारांचा बैल वाघाने मारला तर नुकसान भरपाईच्या नावावर तोंडाला पाने पुसली जात आहे.