शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सुसूंदवासीयांनी बांधली वनविभागाच्या वाहनाला जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:43 IST

गावात मागील दीड महिन्यापासून वाघाचे हल्ले सुरू आहे. यात अनेक जनावरांचा जीव गेला. भीतीमुळे शेती मशागतीची कामे रखडलेली आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला : दीड महिन्यापासून वाघाची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : गावात मागील दीड महिन्यापासून वाघाचे हल्ले सुरू आहे. यात अनेक जनावरांचा जीव गेला. भीतीमुळे शेती मशागतीची कामे रखडलेली आहे. गावकरी दहशतीत आहेत. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असताना वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी अखेर गावात आलेल्या वनविभागाच्या वाहनाला गाय, बैल व वासरू बांधून संताप व्यक्त केला. अखेर रात्री ११ वाजता खरांगण्याचे ठाणेदार निशीकांत रामटेके यांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला.सुसूंद (हेटी) हे जंगलव्याप्त भागात वसलेले गाव. गावात गोपालन हा शेतीला मुख्य जोडधंदा आहे. न्यू बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी सध्या या गावालगत आपले बस्थान मांडले आहे. मागील दीड महिन्यापासून या गावातील जनावरांवर सतत वाघाचे हल्ले सुरू आहे. यात शेळ्या, गाई, बैल व गोºहे वाघाच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. काही मरणाला टेकले आहे. त्यामुळे सर्वत्र भीती, दहशतीची गडद छाया पसरली आहे.अखेर सोमवारी चंपा शिवारात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बैलाला बघायला आलेल्या वनविभागाच्या वाहनाला पुढे बैल तर मागे गाय व वासरू बांधले. या जनावरांची रखवाली तुम्हीच करा, अन्यथा वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी गावकºयांनी केली. गावकरी व वनविभागाच्या अधिकाºयांत वाद वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार निशीकांत रामटेके व वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. ताल्हण यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत घातली. यातून मार्ग निघून रात्री ११ वाजता वाहनाची सुटका झाली.कामे खोळंबलीउन्हाळी भाजीपाला पिके शेतात सडली; पण शेतकरी काढणी करू शकला नाही. ओलीत सुद्धा करणे कठीण झाले आहे. या वाघाच्या दहशतीमुळे शेती मशागतीची कामे प्रभावित झाली. ५० हजारांचा बैल वाघाने मारला तर नुकसान भरपाईच्या नावावर तोंडाला पाने पुसली जात आहे.