शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

पशुपालक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:23 IST

अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देआठ गावातील : जनावरांना घटसर्प आजाराची लागण
<p>लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मागील पंधरा दिवसापासून रिपरिप पाऊस झाला. पावसाळ्यातील दूषित पाणी किडीने भरलेला चार जनावरांच्या खाण्यात गेला. त्याचा परिणाम जनावरांच्या आजारावर झाला. त्यातच घटसर्प या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे घरीच गोठ्यात बांधून ठेवावी लागत आहे. अंतोरा, नवीन अंतोरा, माणिकनगर, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, चिंचोली या गावातील पशुंसाठी अंतोरा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र येथे गेल्या ३ महिन्यांपासून पशुधन अधिकारी नाही. त्यामुळे अतिरिक्त कारभार भारसवाडा येथील अधिकाºयाकडे आहे. त्यांच्याकडे आधीच जास्त काम असल्याने अंतोराकडे येण्यास वेळ नसल्याची माहिती मिळाली आहे.शेतकरी दवाखान्यात येरझारा मारून शकले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. काळे यांचीही बुलढाणा जिल्ह्यात अचानक बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. कांबळे रूजू झाल्या. मात्र त्यांनी पशुवैद्यकीय केंद्राकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या गंभीर बनत चाचली आहे. शेतकºयांच्या संकटाची दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या आजाराच्या औषधीची खरेदी राज्य स्तरावरच केली नाही. त्यामुळे स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यांमध्ये औषध उपलब्ध नाही. शासकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे सेवा देत नाही. एका पशुवैद्यकीय अधिकाºयाकडे दोन ते तीन गावांचा पदभार आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या दिवशी उपलब्ध होतात त्यामुळे पशुपालकाच्या अडचणी वाढत आहे. तर काही पशुवैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसायही करतात त्यामुळे त्यांचे प्राधान्य दुसरीकडेच राहते. असे दिसून येते.दोन हजार जनावरे आजाराच्या विळख्यातघटसर्पाच्या लागणीमुळे आठ गावातील दोन हजारावर जनावर आजारी आहे. त्यांना धड उभेही राहता येत नाही. अनेक गायी, बैल, कालवड, गोºहे आजारामुळे दगावण्याच्या स्थितीत आहे. त्यांना तात्काळ लसीकरण करण्याची गरज आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनी दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले नाही.