शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

पशुपालक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:23 IST

अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देआठ गावातील : जनावरांना घटसर्प आजाराची लागण
<p>लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मागील पंधरा दिवसापासून रिपरिप पाऊस झाला. पावसाळ्यातील दूषित पाणी किडीने भरलेला चार जनावरांच्या खाण्यात गेला. त्याचा परिणाम जनावरांच्या आजारावर झाला. त्यातच घटसर्प या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे घरीच गोठ्यात बांधून ठेवावी लागत आहे. अंतोरा, नवीन अंतोरा, माणिकनगर, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, चिंचोली या गावातील पशुंसाठी अंतोरा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र येथे गेल्या ३ महिन्यांपासून पशुधन अधिकारी नाही. त्यामुळे अतिरिक्त कारभार भारसवाडा येथील अधिकाºयाकडे आहे. त्यांच्याकडे आधीच जास्त काम असल्याने अंतोराकडे येण्यास वेळ नसल्याची माहिती मिळाली आहे.शेतकरी दवाखान्यात येरझारा मारून शकले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. काळे यांचीही बुलढाणा जिल्ह्यात अचानक बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. कांबळे रूजू झाल्या. मात्र त्यांनी पशुवैद्यकीय केंद्राकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या गंभीर बनत चाचली आहे. शेतकºयांच्या संकटाची दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या आजाराच्या औषधीची खरेदी राज्य स्तरावरच केली नाही. त्यामुळे स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यांमध्ये औषध उपलब्ध नाही. शासकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे सेवा देत नाही. एका पशुवैद्यकीय अधिकाºयाकडे दोन ते तीन गावांचा पदभार आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या दिवशी उपलब्ध होतात त्यामुळे पशुपालकाच्या अडचणी वाढत आहे. तर काही पशुवैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसायही करतात त्यामुळे त्यांचे प्राधान्य दुसरीकडेच राहते. असे दिसून येते.दोन हजार जनावरे आजाराच्या विळख्यातघटसर्पाच्या लागणीमुळे आठ गावातील दोन हजारावर जनावर आजारी आहे. त्यांना धड उभेही राहता येत नाही. अनेक गायी, बैल, कालवड, गोºहे आजारामुळे दगावण्याच्या स्थितीत आहे. त्यांना तात्काळ लसीकरण करण्याची गरज आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनी दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले नाही.