शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

पशुपालक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:23 IST

अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देआठ गावातील : जनावरांना घटसर्प आजाराची लागण
<p>लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मागील पंधरा दिवसापासून रिपरिप पाऊस झाला. पावसाळ्यातील दूषित पाणी किडीने भरलेला चार जनावरांच्या खाण्यात गेला. त्याचा परिणाम जनावरांच्या आजारावर झाला. त्यातच घटसर्प या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे घरीच गोठ्यात बांधून ठेवावी लागत आहे. अंतोरा, नवीन अंतोरा, माणिकनगर, बेलोरा, खंबीत, देलवाडी, जोलवाडी, चिंचोली या गावातील पशुंसाठी अंतोरा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र येथे गेल्या ३ महिन्यांपासून पशुधन अधिकारी नाही. त्यामुळे अतिरिक्त कारभार भारसवाडा येथील अधिकाºयाकडे आहे. त्यांच्याकडे आधीच जास्त काम असल्याने अंतोराकडे येण्यास वेळ नसल्याची माहिती मिळाली आहे.शेतकरी दवाखान्यात येरझारा मारून शकले आहे. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. काळे यांचीही बुलढाणा जिल्ह्यात अचानक बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. कांबळे रूजू झाल्या. मात्र त्यांनी पशुवैद्यकीय केंद्राकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या गंभीर बनत चाचली आहे. शेतकºयांच्या संकटाची दखल घेण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या आजाराच्या औषधीची खरेदी राज्य स्तरावरच केली नाही. त्यामुळे स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यांमध्ये औषध उपलब्ध नाही. शासकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे सेवा देत नाही. एका पशुवैद्यकीय अधिकाºयाकडे दोन ते तीन गावांचा पदभार आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या दिवशी उपलब्ध होतात त्यामुळे पशुपालकाच्या अडचणी वाढत आहे. तर काही पशुवैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसायही करतात त्यामुळे त्यांचे प्राधान्य दुसरीकडेच राहते. असे दिसून येते.दोन हजार जनावरे आजाराच्या विळख्यातघटसर्पाच्या लागणीमुळे आठ गावातील दोन हजारावर जनावर आजारी आहे. त्यांना धड उभेही राहता येत नाही. अनेक गायी, बैल, कालवड, गोºहे आजारामुळे दगावण्याच्या स्थितीत आहे. त्यांना तात्काळ लसीकरण करण्याची गरज आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनी दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले नाही.