शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे खाद्य मनुष्याच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:03 IST

समाजातील आर्थिक दुर्बल व विविध योजनांचे लाभार्थी ठरणाऱ्या गरजुंना शासकीय धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त धान्य अतिशय अल्प दरात दिले जाते. परंतु अतिशय दर्जाहिन धान्य सध्या स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानातील प्रकार : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी): समाजातील आर्थिक दुर्बल व विविध योजनांचे लाभार्थी ठरणाऱ्या गरजुंना शासकीय धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त धान्य अतिशय अल्प दरात दिले जाते. परंतु अतिशय दर्जाहिन धान्य सध्या स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.कुठलेही कुटुंब आर्थिक अडचणीमुळे उपाशी राहू नये या उद्देशाने गरजू व विविध योजनेतील लाभार्थी ठरणाºया कुटुंबियांना शासनाच्यावतीने अतिशय अल्प दरात गहू, तांदूळ व डाळ तसेच साखर वितरीत केली जाते. मात्र, गरिबांच्या वाट्याच्या या शासकीय धान्यावर धनदांडग्यांचा व शासकीय धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांचा डोळा राहत असल्याचे अनेक कारवाईत पुढे आले आहे. असे असले तरी साधे जनावरही खाणार नाही असे निकृष्ट दर्जाचे शासकीय धान्य सध्या येथील स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होत असल्याने नागरिकांकडून आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.येथील गजानन रंदळे हे स्थानिक स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी गेले असता त्यांना निकृष्ट दर्जाचे गहू देण्यात आला. विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भागातील लाभार्थ्यांना नेहमीच निकृष्ट दर्जाचे शासकीय धान्य वितरीत करण्यात येत असल्याच्या तक्रारी असून याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आहे.नव्या प्रणालीने वाढविली डोकेदुखीस्वस्त दुकानात शासकीय धान्य घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून तुमची आर. सी. नसल्याचे सांगत धान्य देण्यास टाळाटाळ केली जाते. इतकेच नव्हे तर यंदा धान्य वेळीच आले नसून काही दिवसांनी या असेही सांगण्यात येते. शासनाच्यावतीने धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी सध्या नवीन प्रणालीचा वापर होत आहे. परंतु, ही प्रणाली स्वस्त धान्य दुकानदारांसह लाभार्थ्यांच्या अडचणीत भर टाकणारीच ठरत आहे.विरुळ येथील स्वस्त धान्य दुकानात गेलो. दुकानदाराने धान्यही दिले. परंतु, ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. विचारणा केली असता वरूनच तसा माल आल्याचे स्वस्त धान्य दुकानदाराने सांगितले. निकृष्ट दर्जाचे हे शासकीय धान्य खाऊन आम्ही आता आमची प्रकृती बिघडवायची काय?- गजानन रंदळे, लाभार्थी, विरुळमी आज दुकानात नव्हतो. शासकीय धान्याचा माल दुकानापर्यंत आणताना एखादे पोते खराब आले असावे. शिवाय त्यातीलच धान्य वाटप करण्यात आले असावे. लाभार्थ्याने ते निकृष्ट दर्जाचे धान्य परत द्यावे त्यांना दुसरे गहू देण्यात येईल.- मधुकर माजरखेडे, स्वस्त धान्य दुकानदार, विरुळ.