शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

संतप्त नागरिकांनी रोखला तासभर महामार्ग

By admin | Updated: September 16, 2014 23:56 IST

येथील राष्ट्रीय महामार्गावर नांदगांव चौकात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधकाची तातडीने दुरूस्ती करावी व उड्डाण पुलाच्या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी सुमारे

गतिरोधकाच्या दुरूस्तीची मागणी : १९ जणांना घेतले ताब्यात हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावर नांदगांव चौकात होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधकाची तातडीने दुरूस्ती करावी व उड्डाण पुलाच्या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी सुमारे तासभर रस्तारोको केला. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्ता रोको करणाऱ्या १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊा न्यायालयात हजर केले. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दुपारी प्रेमकुमार मिश्रा (६०) रा. शास्त्री वॉर्ड हे बालाजी जिनिंगमध्ये हिरो होंडा मोटारसायकल एमएच ३२ के ३८५६ ने जात होते. दरम्यान चंद्रपूर येथून वर्धेला कोळसा भरून जाणाऱ्या एमएच ३१ एपी ४८०९ ने चौकात जबर धडक दिली. त्या अपघातात प्रेमकुमार मिश्रा यांचा मृत्यू झाला. या अगोदर ४ जुलै २०१४ ला सुध्दा येथे अपघात झाला होता. सततच्या अपघातामुळे शहरातील दोन मोठ्या इंग्रजी शाळा, बाजार समिती मार्केट तसेच येथे येणाऱ्या शेतकऱ्यांत असुरक्षीतता निर्माण झाली आहे. प्रशासनाने या चौकातील गतिरोधकाची दुरूस्ती करावी या मागणीकरिता पाच महिन्यापुर्वी नागरिकांनी निवेदनही सादर केले होते; परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथे दुर्घटना घडण्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रलय तेलंग, निलेश ठोंबरे, शंकर मोहमारे, सुनील डोंगरे, चेतन वाघमारे, मारोती साठे, ज्ञानेश्वर पुंड, रंजीत बेले, विनोद राऊत, सरवर खान, सुरेश पुंड, नितीन वाघ, गिरीश नागुलवार, उमेश मंगरुळकर, चंदु भुते, माणिक महाकाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखुन धरली. ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून १९ जणांना भादंविच्या ३४१,१४३ व मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ अन्वये ताब्यात घेवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. आंदोलकांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. (तालुका प्रतिनिधी)