शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांची तालुका कृषी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:18 IST

यावर्षी सदोष बियाण्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केला आहे.

ठळक मुद्देकपाशीवर बोंडअळी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन

आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : यावर्षी सदोष बियाण्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केला आहे. तोंडाजवळ आलेले पीक गेल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रसंगावधान दाखवित उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी यांनी आष्टीला येवून तात्काळ निवेदन स्वीकारले. लागलीच अंतोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले. सदर अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा यांना पाठविण्यात येणार आहे.लहानआर्वी, अंतोरा, किन्हाळा, चिंचोली, माणिकनगर, खंबीत, बेलोरा, देलवाडी, जोलवाडी, अंबिकापूर या मौजातील कपाशीच्या बोंडांना मोठ्या प्रमाणात अळ्या आल्या. त्यामुळे कापूस पिकण्याऐवजी बोंड गळून पडत आहे. तर शेकडो बोंड सडले आहे. हजारो रुपये उसनवारीने आणून उभे केलेले पीक क्षणार्धात सपाट झाल्याने शेतकरी सैरावैरा झाले आहे. याची तक्रार आठवडाभरापूर्वी केली होती. मात्र कृषी सहाय्यक साझावर आले नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे.आज शंकरलाल राठी, राजेश ठाकरे, देविदास पाथरे, डॉ. नरेंद्र देशमुख, दिनेश मानकर, शरद जवळेकर, नरेंद्र राऊत, युवराज राऊत, गजानन आंबेकर, प्रशांत पांडे, हनुमंत कुरवाडे, गोरखनाथ भिवाकरे, जगदीश राठी, घनश्याम राठी व गावातील शेतकरी यांनी कपाशीचे झाड व बोंड घेवून तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकºयांनी उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे यांना कपाशी झाड व बोंड भेट दिली. तसेच निवेदन दिले. याकडे दुर्लक्ष झाल्यास सर्व शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करतील असा इशारा दिला आहे.पवनूर परिसरात प्रादुर्भावआॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : पवनूर येथील गजानन कडू, अरूण कडू संतोष उमाळे, प्रदीप सोनुरकर, शरद कोंडलकर, प्रमोद डांगे, महादेव कडू व इतर शेतकºयांच्या शेतात बोंडअळीने हल्ला केला. या शेतकºयांनी कावेरी कंपनीचे मणी मेकर, युवा बायो सिड, माऊली श्रीराम बायोसिड, तुलसी सिडचे सैराट आदी कंपनीचे बियाणे शेतात पेरेले होते. या वाणावर हिरवी व गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून प्रत्येक बोंडात अळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बोंडातून कापसाची निर्मिती होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या सदंर्भात कृषी विभागाला तक्रार केली असता तालुका कृषी अधिकारी मुडे, मंडळ कृषी अधिकारी भाष्कर मेघे, कृ.स. वहाने व चमूने भेट देवून पाहणी केली असून वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी बि.टी. कापूस बियाणे उत्पादन करून विकणाºया कंपन्यावर ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.