शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

संतप्त शेतकऱ्यांची तालुका कृषी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:18 IST

यावर्षी सदोष बियाण्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केला आहे.

ठळक मुद्देकपाशीवर बोंडअळी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन

आॅनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : यावर्षी सदोष बियाण्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केला आहे. तोंडाजवळ आलेले पीक गेल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रसंगावधान दाखवित उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी यांनी आष्टीला येवून तात्काळ निवेदन स्वीकारले. लागलीच अंतोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले. सदर अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा यांना पाठविण्यात येणार आहे.लहानआर्वी, अंतोरा, किन्हाळा, चिंचोली, माणिकनगर, खंबीत, बेलोरा, देलवाडी, जोलवाडी, अंबिकापूर या मौजातील कपाशीच्या बोंडांना मोठ्या प्रमाणात अळ्या आल्या. त्यामुळे कापूस पिकण्याऐवजी बोंड गळून पडत आहे. तर शेकडो बोंड सडले आहे. हजारो रुपये उसनवारीने आणून उभे केलेले पीक क्षणार्धात सपाट झाल्याने शेतकरी सैरावैरा झाले आहे. याची तक्रार आठवडाभरापूर्वी केली होती. मात्र कृषी सहाय्यक साझावर आले नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे.आज शंकरलाल राठी, राजेश ठाकरे, देविदास पाथरे, डॉ. नरेंद्र देशमुख, दिनेश मानकर, शरद जवळेकर, नरेंद्र राऊत, युवराज राऊत, गजानन आंबेकर, प्रशांत पांडे, हनुमंत कुरवाडे, गोरखनाथ भिवाकरे, जगदीश राठी, घनश्याम राठी व गावातील शेतकरी यांनी कपाशीचे झाड व बोंड घेवून तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकºयांनी उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे यांना कपाशी झाड व बोंड भेट दिली. तसेच निवेदन दिले. याकडे दुर्लक्ष झाल्यास सर्व शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करतील असा इशारा दिला आहे.पवनूर परिसरात प्रादुर्भावआॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : पवनूर येथील गजानन कडू, अरूण कडू संतोष उमाळे, प्रदीप सोनुरकर, शरद कोंडलकर, प्रमोद डांगे, महादेव कडू व इतर शेतकºयांच्या शेतात बोंडअळीने हल्ला केला. या शेतकºयांनी कावेरी कंपनीचे मणी मेकर, युवा बायो सिड, माऊली श्रीराम बायोसिड, तुलसी सिडचे सैराट आदी कंपनीचे बियाणे शेतात पेरेले होते. या वाणावर हिरवी व गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून प्रत्येक बोंडात अळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बोंडातून कापसाची निर्मिती होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या सदंर्भात कृषी विभागाला तक्रार केली असता तालुका कृषी अधिकारी मुडे, मंडळ कृषी अधिकारी भाष्कर मेघे, कृ.स. वहाने व चमूने भेट देवून पाहणी केली असून वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी बि.टी. कापूस बियाणे उत्पादन करून विकणाºया कंपन्यावर ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.