शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल वापरताना अंगणवाडी सेविकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:45 IST

अंगणवाडीचे कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ‘सही पोषण देश रोशन’ उपक्रमाअंतर्गत आय.सी.डी.एस, सी.ए.एस. या अ‍ॅपच्या माध्यमातून अंगणवाडीसेविकांंना नोंदी ठेवण्याकरिता मोबाईल संच पुरविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकामकाज गतिमान करण्यासाठी शासनाकडून मोबाईल संच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडीचे कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ‘सही पोषण देश रोशन’ उपक्रमाअंतर्गत आय.सी.डी.एस, सी.ए.एस. या अ‍ॅपच्या माध्यमातून अंगणवाडीसेविकांंना नोंदी ठेवण्याकरिता मोबाईल संच पुरविण्यात आले आहेत. यासाठी अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, पुरेशा शिक्षणाचा अभाव आणि अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल वापरताना उडणारा गोंधळ यामुळे कामकाज खरेच गतिमान होईल का, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.शासनाकडून पुरविण्यात आलेल्या मोबाईलमध्ये कुटुंब व्यवस्थापन, दररोजचे पोषण-भरण, गृहभेट, वेळापत्रक, वाढीची देखरेख, घरपोच आहार, अपेक्षित कामाची यादी, अंगणवाडी केंद्राचे व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल, किशोरवयीन मुली, समुदाय आधारित कार्यक्रम आदी १० अ‍ॅप आहेत. तालुक्यातील सर्वच अंगणवाडीसेविकांना मोबाईल संच देण्यात आले असून याद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी लवकरच स्मार्ट होणार आहे.पुढील महिन्यापासून अंगणवाडीचा कारभार हा आॅनलाईन नोंदणीद्वारे चालणार आहे. यामध्ये लसीकरण, गृहभेटी, बालकांच्या दैनंदिन नोंदी, स्तनदा माता, गरोदर माता आणि मुलीच्या आरोग्याच्या नोंदी असणार आहेत.आतापर्यंत अंगणवाडी सेविका दैनंदिन अहवाल आणि नोंद लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, बालकाचे वजन उंचीची नोंद लसीकरण आदी नोंदी रजिस्टरमध्ये होत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना आता रजिस्टर हाताने लिहिण्याची गरज राहणार नाही. कामकाज पेपरलेस होईल.अ‍ॅप समजत नसल्याने उडतो गोंधळअंगणवाडीचे कामकाज गतिमान होण्यासाठी राज्य शासनाकडून अंगणवाडी सेविकांना अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलचे वाटप जरी करण्यात आले असले तरी तालुक्यातील बालवाडीचे रूपांतर अंगणवाडीत करण्यात आल्याने बहुतांश अंगणवाडी सेविका या केवळ सातवी ते आठवी उत्तीर्ण असल्याने त्यांची मोबाईल वापरताना समजत नसल्याने प्रचंड दमछाक होत असून प्रचंड गोंधळ उडत आहे. यामुळे मोबाईलमुळे कामकाज खरेच गतिमान होणार काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल