शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अंगणवाडीचा पोषण आहार बनतो गुरांचा चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:07 IST

शासनाच्या धोरणानुसार बालविकास कल्याण विभागामार्फत अंगणवाडीला पोषण आहार देण्यात येतो. कुपोषण मुक्ती आणि गरोदर मातांना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात मात्र हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देशासनाचा खर्च ठरत आहे व्यर्थ : अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शासनाच्या धोरणानुसार बालविकास कल्याण विभागामार्फत अंगणवाडीला पोषण आहार देण्यात येतो. कुपोषण मुक्ती आणि गरोदर मातांना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात मात्र हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याचे उघड झाले आहे. घरी नेण्याकरिता लाभार्थ्यांना देण्यात आलेला हा आहार ते गुरांचे खाद्य होत असल्याचे दिसून आले आहे.१ ते ३ वर्ष वयोगटातील मुलांना महिन्याला ३ किलो आहार देण्याचा शासनाचा दंडक आहे. यात उपमा ११७० ग्रॅम, बाल आहार १०४० ग्रॅम आणि शिरा ७८० ग्रॅम इतका दिला जातो. गरोदर माता व स्तनदा यांना साडेतीन किलो पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत.अंगणवाडीतून मिळत असलेला पोषण आहार निकृष्ठ दर्जाचा असल्यामुळे लाभार्थी गुरांना चारत असल्याचे लाभार्थ्यांच्या पालकांकडून कळते. पोषण आहार घरी न देता अंगणवाडीतच शिजवून मुलांना द्यावा व पोषण आहार उत्कृष्ट दर्जाचा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. संबंधित विभाग सदर योजनेवरती अवाढव्य खर्च करीत असताना याचा उपयोग लहान मुलांना तसेच स्तनदा व गरोदर मातांना होत नसल्याचे निदर्शनास येते. यामुळे केलेला खर्च व्यर्थ ठरत असल्याचेच दिसत आहे.कुपोषण मुक्तीकरिता शासनाकडून विविध उपकम राबविण्यात येत आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येते आहे. पण ग्रामीण भागात होत असलेल्या प्रकारामुळे शासनाच्या योजनांना खिळ बसत आहे.