शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अन् तहसीलदार पाहोचले ऊसतोड कामगारांच्या वसाहतीत

By admin | Updated: January 8, 2017 00:41 IST

येथील शेतात ऊसाची तोड करण्याकरिता आलेल्या परिवारातील चिमुकलींची शिक्षणाची व आरोग्याची दैना होत असल्याची माहिती

शाळाबाह्य मुलांच्या नोंदी घेणे सुरू : पाटी, पुस्तकाची प्रतीक्षा आकोली : येथील शेतात ऊसाची तोड करण्याकरिता आलेल्या परिवारातील चिमुकलींची शिक्षणाची व आरोग्याची दैना होत असल्याची माहिती ‘लोकमत’च्या वृत्ताने उजागर होताच तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. शिक्षण विभागाकडून या विद्यार्थ्यांची चौकशी झाली तर शनिवारी खुद्द तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी या कामगारांच्या वसाहतीला भेट देत पाहणी केली. त्यांच्या पाहणीत या कामगारांच्या मुलांना आरोग्याच्या अनेक समस्यांनी ग्रासल्याचे दिसून आले. तसेच या कामगारांच्या घरात असलेल्या गरोदर मातांना कुठल्याही आरोग्य सेवा मिळाल्या नसल्याचे समोर आले. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती तत्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांना या कामगारांना आरोग्य सेवा पुरविण्याच्या सूचना केल्या. तत्पूर्वी या प्रकाराची माहिती जि.प. शिक्षण विभागाला या कामगारांच्या वसाहतीवर जात विद्यार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश मिळताच जामनी येथील ऊसतोड कामगारांच्या वसाहतीत जात शिक्षक शालीक शेंडे, रविंद्र केने यांनी शाळाबाह्य मुलांची नावे नोंदवून घेतली; ते त्या वेळी येथे गेले त्यावेळी अनेक मुलं रात्रीलाच आई वडिलांसोबत फडात गेल्याने नोंदी घेणे बाकी आहे. येथील साखर कारखाना परिसरात मराठवाडा व विदर्भातील पुसद व यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड कामगार मुलांबाळांसह आले आहेत. येथे आलेली मुलं आपापल्या गावात शाळेत शिकतात; पण येथे आल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्याबाबत दोन दिवस ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे शासनाने अशा सर्व मुलांची हजेरी रजिस्टरवर नोंद करून या मुलांना संबंधीत शाळेत पाटी, पुस्तक, पेन देवून बसविण्याचे आदेश दिले. (वार्ताहर) जिल्हाधिकारीही देणार वसाहतीला भेट या वसाहतीला आज तहसीलदार डॉ. होळी यांनी भेट देत चौकशी केली. त्यांना येथे दिसलेल्या विदारक स्थितीची माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर जिल्हाधिकारीही या वसाहतीत भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पहिली ते सातवीपर्यंतचे २० विद्यार्थी शिक्षक शेंडे व केने यांनी केलेल्या सर्व्हेत येथे १०४ कुटुंब वास्तव्यास आहे. ऊसतोड कामगारांच्या वसाहतीत वर्ग पहिली ते सातवीपर्यतचे २० विद्यार्थी आढळले. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावाच्या नोंदी घेण्यात आल्या आहे. येथील अनेक मुलं मुली रात्रीच आई वडिलांसोबत ऊसाच्या फडात गेले असल्याने त्यांच्या नोंदी होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. नोंदी करून सुविधा देण्याची गरज या वसाहतीत आढळलेल्या २० चिमुकल्यांना प्रत्यक्ष त्यांच्या हातात पुस्तक, पाटी व पेन देवून ज्ञानाजर्नाचे धडे देण्यात येते. हे आगामी काळच सांगणार आहे.