शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

आंबिया बहाराच्या संत्रा फळांवर तडक्या रोगाचा ‘अटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 08:47 IST

Wardha news आंबीया बहार असलेल्या तळेगाव परिसरातील संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाने अटॅक केला असल्याने संत्र्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांसमोर उद्भवले संकटअर्थकारण धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा  : आंबिया बहार असलेल्या तळेगाव परिसरातील संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाने अटॅक केला असल्याने संत्र्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परिणामी, मेहनतीने पिकविलेला संत्रा मातीमोल होत असल्याचे पाहून त्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे.

‘संत्राबेल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्याच्या शेजारी लागून असलेल्या आष्टी तालुक्यात बऱ्याच प्रमाणात संत्र्याच्या बागा असून परिसरात संत्र्याचे आंबिया व मृग बहाराची संत्री शेतकरी घेतात. सध्या तळेगावसह परिसरात आंबिया बहाराची संत्राफळे शेतकऱ्यांच्या बागेत असून त्यावर तडक्या रोगाने आक्रमण केले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडावरील हिरव्या फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत असून झाडाखाली फळांचा खच दिसून येत आहे.

संत्राफुटीसाठी हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला. मात्र, आता तडकलेली संत्राफळे झाडांखाली गळून पडल्याने वेचून फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

विशेष म्हणजे तालुक्‍यात यावर्षी मृगबहार फारच कमी प्रमाणात फुलला. त्यासाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे आंबिया बहराच्या संत्र्यावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून होते. कोरोनामुळे देशभरात संत्र्याला मोठी मागणी पाहता यावर्षी चांगले बाजारभाव मिळतील, अशी अपेक्षा असताना तडक्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे परीसरातील शेतकऱ्यांनी तूर, कपासी, सोयाबीनच्या पेरण्या केल्या. परंतु पावसाने दडी मारल्याने परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यात संत्राफळावर तडक्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी तळेगावसह परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

माझे दुर्गापूर शिवारात शेत असून ४ एकरात संत्राझाडे आहेत. सध्या त्यावर आंबिया बहाराचे संत्री आहे. ती नोव्हेंबरमध्ये विकावयास येईल. परंतु, संत्रा फळे परिपक्व होण्याअगोदरच तडकून गळत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकरिता या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

अनिल बुले, संत्रा उत्पादक शेतकरी

टॅग्स :agricultureशेती