शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

आंबिया बहाराच्या संत्रा फळांवर तडक्या रोगाचा ‘अटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 08:47 IST

Wardha news आंबीया बहार असलेल्या तळेगाव परिसरातील संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाने अटॅक केला असल्याने संत्र्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांसमोर उद्भवले संकटअर्थकारण धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा  : आंबिया बहार असलेल्या तळेगाव परिसरातील संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाने अटॅक केला असल्याने संत्र्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परिणामी, मेहनतीने पिकविलेला संत्रा मातीमोल होत असल्याचे पाहून त्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे.

‘संत्राबेल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्याच्या शेजारी लागून असलेल्या आष्टी तालुक्यात बऱ्याच प्रमाणात संत्र्याच्या बागा असून परिसरात संत्र्याचे आंबिया व मृग बहाराची संत्री शेतकरी घेतात. सध्या तळेगावसह परिसरात आंबिया बहाराची संत्राफळे शेतकऱ्यांच्या बागेत असून त्यावर तडक्या रोगाने आक्रमण केले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडावरील हिरव्या फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत असून झाडाखाली फळांचा खच दिसून येत आहे.

संत्राफुटीसाठी हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला. मात्र, आता तडकलेली संत्राफळे झाडांखाली गळून पडल्याने वेचून फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

विशेष म्हणजे तालुक्‍यात यावर्षी मृगबहार फारच कमी प्रमाणात फुलला. त्यासाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे आंबिया बहराच्या संत्र्यावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून होते. कोरोनामुळे देशभरात संत्र्याला मोठी मागणी पाहता यावर्षी चांगले बाजारभाव मिळतील, अशी अपेक्षा असताना तडक्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे परीसरातील शेतकऱ्यांनी तूर, कपासी, सोयाबीनच्या पेरण्या केल्या. परंतु पावसाने दडी मारल्याने परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यात संत्राफळावर तडक्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी तळेगावसह परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

माझे दुर्गापूर शिवारात शेत असून ४ एकरात संत्राझाडे आहेत. सध्या त्यावर आंबिया बहाराचे संत्री आहे. ती नोव्हेंबरमध्ये विकावयास येईल. परंतु, संत्रा फळे परिपक्व होण्याअगोदरच तडकून गळत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकरिता या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

अनिल बुले, संत्रा उत्पादक शेतकरी

टॅग्स :agricultureशेती