शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायक

By admin | Updated: September 5, 2014 00:01 IST

शिकत असताना विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव असू द्यावी. यामुळे आव्हान पेलण्याची ऊर्जा प्राप्त होते. नवीन पिढीत आव्हाने पेलण्याची क्षमता कमी होत असल्याचे बोलले जाते. याकरिता त्यांनी

वर्धा : शिकत असताना विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव असू द्यावी. यामुळे आव्हान पेलण्याची ऊर्जा प्राप्त होते. नवीन पिढीत आव्हाने पेलण्याची क्षमता कमी होत असल्याचे बोलले जाते. याकरिता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संघर्षमय जीवन चरित्र वाचावे. यानंतर आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनात येणार नाही, असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता प्रशांत जनबंधू यांनी केले.वर्धा जिल्हा बामसेफ व अरहंत बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रम स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात सोमवारी पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता जनबंधू तसेच महिला बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे, युनियन बँकेचे व्यवस्थापक ए. के. खोब्रागडे, तरुण उद्योजक अमोल मेश्राम, सामाजिक संस्थेचे नंदकुमार धाबर्डे, संयोजक प्रमोद जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी दहावीतील ४६ तर बारावीतील १८ विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांच्या पाल्यांना विशेष आर्थिक सहकार्य करण्यात आले.यावेळी बोलताना तेलंग म्हणाले की, शासनातर्फे व्यावसायिक आवड व कल यांची चाचणी घेतल्या जाते. विद्यार्थ्यांनी यानुसार आवडीच्या क्षेत्राकडे वळलात तर कमी वेळात निश्चित ध्येय गाठले जाईल. त्यासाठी सकारात्मक विचाराची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. मनिषा कुरसंगे यांनी उज्वल यशासाठी पारंपारिक क्षेत्रापेक्षा नवनविन आव्हानात्मक क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन केले. तर अमोल मेश्राम यांनी उद्योगात यशस्वी होण्याच्या गुजगोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. धाबर्डे यांनी समाजऋण याबद्दल समायोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अध्यापक गौतम पाटील यांनी केले. प्रास्ताविक मोहन राईकवार यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. प्रकाश गोडघाटे यांनी मानले. आयोजनाला माया जगताप, प्रकाश कांबळे, देवानंद थुल, आशिष जगताप, भारत मून, अविनाश अंबोरे, सुमेध जगताप, इंजि. प्रकाश भगत, ओंकार मेश्राम, शुभम जगताप, चंद्रशेखर वानखेडे, सिद्धार्थ मून, श्रीरंग जगताप, अरविंद खैरकर, प्रणाली जगताप, प्रफुल उमरे, श्वेता जगताप, सुषमा पाखरे आदींनी सहकार्य केले. यावेळी पालक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)