शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आंबेडकरी राजकारण

By admin | Updated: February 4, 2017 00:54 IST

देशातील सत्ताधारी जमात बनून समताधिष्ठित समाज निर्मिती करणे हे आंबेडकरी राजकारणाचे मुख्य प्रयोजन आहे;

अविनाश डोळस : ‘भारतीय राजकारणात आंबेडकरी राजकारणाची भूमिका’वर व्याख्यान हिंगणघाट : देशातील सत्ताधारी जमात बनून समताधिष्ठित समाज निर्मिती करणे हे आंबेडकरी राजकारणाचे मुख्य प्रयोजन आहे; पण त्यासाठी लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असणे गरजेचे आहे, असे मत प्रा. अविनाश डोळस यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक प्रबोधन मंचाद्वारे ‘आजच्या भारतीय राजकारणात आंबेडकरी राजकारणाची भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विषयाच्या अनुषंगाने प्रा. डोळस पूढे म्हणाले की, भारतीय राजकारणात स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध विचारप्रवाह आहेत; पण कोणत्याही विचार प्रवाहातून भारतीय संविधानाला अपेक्षित समताधिष्ठित समाजनिर्मितेचे उद्दीष्ट पूर्ण झाले नाही. उलट विविध घटकांनी राज्यात जातीय नेतृत्व उभे करून जातीवादाला खतपाणी घालून विषमता अधिकच घट्ट केली गेली. जन्माने, वर्णाने श्रेष्ठ तोच राजकारणातील नेता व सत्ताधारी ठरविला गेला. २०१४ नंतर तर हे संविधान आमचे नाहीच, ही सांसदीय शासन पद्धती आमच्यावर लादण्यात आली, असे वेळोवेळी दाखवून देऊन देव, धर्म, वैदिक परंपरा मान्य करणारा वर्ग सत्तेवर आला. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जन्माने श्रेष्ठ असलेला अध्यक्ष निवडून आणता येऊ शकतो व संपूर्ण राजकारणावर आपली पकड घट्ट करता येते, म्हणून समर्थन केले जात आहे. अशावेळी आंबेडकरी माणसाने प्रतिक्रियाच देत बसण्यापेक्षा कृती व क्रिया करून भारतीय राजकारणाला प्रभावित करून इतरांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडावे. विशेषत: समताधिष्ठित समाज निर्मिती करण्यासाठी आंबेडकरी सुशिक्षित वर्गाने नेतृत्व करावे आणि हेच धम्माचे प्रयोजन आहे, असेही डॉ. डोळस यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. अशोक बुरबुरे होते. त्यांनी आंबेडकरी समाजातील अंतर्विरोध स्पष्ट करून डॉ. आंबेडकरानी संविधानाच्या माध्यमातून नवभारताची निर्मिती व्हावी, डोके मोजण्यापेक्षा गुणवत्ता प्राप्त लोकांच्या हाती सत्ता असावी व संविधान संस्कृती निर्माण करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. तक्षशील सुटे यांनी प्रजासत्ताक प्रबोधन मंच आणि व्याख्यानाच्या विषयाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरुण भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार उमेश वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सेवकदास खेळकर, हरीभाऊ भानसे, उद्धव धाबर्डे, बुद्धमजी कांबळे, गौतम बुरबुरे, डॉ वाघमारे, प्रा गुजरकर, प्रा. वानखेडे, नामदेव वासेकर, प्रा हेमंत झाडे, सचिन कवाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)