शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आंबेडकरी राजकारण

By admin | Updated: February 4, 2017 00:54 IST

देशातील सत्ताधारी जमात बनून समताधिष्ठित समाज निर्मिती करणे हे आंबेडकरी राजकारणाचे मुख्य प्रयोजन आहे;

अविनाश डोळस : ‘भारतीय राजकारणात आंबेडकरी राजकारणाची भूमिका’वर व्याख्यान हिंगणघाट : देशातील सत्ताधारी जमात बनून समताधिष्ठित समाज निर्मिती करणे हे आंबेडकरी राजकारणाचे मुख्य प्रयोजन आहे; पण त्यासाठी लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असणे गरजेचे आहे, असे मत प्रा. अविनाश डोळस यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक प्रबोधन मंचाद्वारे ‘आजच्या भारतीय राजकारणात आंबेडकरी राजकारणाची भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विषयाच्या अनुषंगाने प्रा. डोळस पूढे म्हणाले की, भारतीय राजकारणात स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध विचारप्रवाह आहेत; पण कोणत्याही विचार प्रवाहातून भारतीय संविधानाला अपेक्षित समताधिष्ठित समाजनिर्मितेचे उद्दीष्ट पूर्ण झाले नाही. उलट विविध घटकांनी राज्यात जातीय नेतृत्व उभे करून जातीवादाला खतपाणी घालून विषमता अधिकच घट्ट केली गेली. जन्माने, वर्णाने श्रेष्ठ तोच राजकारणातील नेता व सत्ताधारी ठरविला गेला. २०१४ नंतर तर हे संविधान आमचे नाहीच, ही सांसदीय शासन पद्धती आमच्यावर लादण्यात आली, असे वेळोवेळी दाखवून देऊन देव, धर्म, वैदिक परंपरा मान्य करणारा वर्ग सत्तेवर आला. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जन्माने श्रेष्ठ असलेला अध्यक्ष निवडून आणता येऊ शकतो व संपूर्ण राजकारणावर आपली पकड घट्ट करता येते, म्हणून समर्थन केले जात आहे. अशावेळी आंबेडकरी माणसाने प्रतिक्रियाच देत बसण्यापेक्षा कृती व क्रिया करून भारतीय राजकारणाला प्रभावित करून इतरांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडावे. विशेषत: समताधिष्ठित समाज निर्मिती करण्यासाठी आंबेडकरी सुशिक्षित वर्गाने नेतृत्व करावे आणि हेच धम्माचे प्रयोजन आहे, असेही डॉ. डोळस यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. अशोक बुरबुरे होते. त्यांनी आंबेडकरी समाजातील अंतर्विरोध स्पष्ट करून डॉ. आंबेडकरानी संविधानाच्या माध्यमातून नवभारताची निर्मिती व्हावी, डोके मोजण्यापेक्षा गुणवत्ता प्राप्त लोकांच्या हाती सत्ता असावी व संविधान संस्कृती निर्माण करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. तक्षशील सुटे यांनी प्रजासत्ताक प्रबोधन मंच आणि व्याख्यानाच्या विषयाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अरुण भगत यांनी केले तर उपस्थितांचे आभार उमेश वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सेवकदास खेळकर, हरीभाऊ भानसे, उद्धव धाबर्डे, बुद्धमजी कांबळे, गौतम बुरबुरे, डॉ वाघमारे, प्रा गुजरकर, प्रा. वानखेडे, नामदेव वासेकर, प्रा हेमंत झाडे, सचिन कवाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)