शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरी व्हावी

By admin | Updated: April 16, 2017 00:57 IST

देशात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली.

रविकांत तुपकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा थाटात समारोपवर्धा : देशात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. मग बाबासाहेबांचा जयंती दिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला पाहिजे. यासाठी आपण केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे शुक्रवारी केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त वर्धा शहरातील पोलीस ग्राऊंडवर झालेल्या भव्य सोहळयात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. वर्धा शहर उत्सव समितीच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद राऊत उपस्थित होते.याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी आजच्या राजकारणातील अनेक विसंगतीवर बोट ठेवत तरुणांनी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवावे आणि नेत्याच्या मागे मागे करणे सोडून शिक्षण घेतले पाहिजे. विधायक कामे करावीत आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवावा, असे आवाहनही यावेळी तुपकर यांनी केले. रुग्णवाहिकेचे लोकार्पणडॉ बाबासाहेब आंबेडकर शहर उत्सव समितीकडून आणि भीम टायगर संघटनेकडून यावेळी एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. ही रुग्णवाहिका २४ तास वर्धेकरांच्या सेवेत असणार आहे. हा लोकार्पण सोहळा जिजाबाई राऊत, नगरसेविका पद्मावती रामटेके यांच्या हस्ते पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समितीतर्फे मनोरंजनासोबत व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी विविध क्षेत्रातील्या मान्यवरांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने वर्धेकरांनी उपस्थिती दर्शविली होती.(जिल्हा प्रतिनिधी)भीमशाहीने आंबेडकरी जनता मंत्रमुग्धप्रबोधनात्मक कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी ‘भिमशाही’ हा भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात उत्कर्ष शिंदे व त्यांच्या संचाने एकापेक्षा एक असे सरस भीमगीत सादर केल्याने आंबेडकरी जनता मंत्रमुग्घ झाली होती. या कार्यक्रमासाठी पोलीस ग्राऊंड आंबेडकरी जनतेने खचाखच भरला होता. रात्री १२ वाजतापर्यंत चाललेला कार्यक्रम जसजसा बहरत गेला. तसतशी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. अखेरच्या क्षणी युवक जागीच थिरकायला लागले.