शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आंबेडकर बालोद्यान मुलांसाठी की गुरांसाठी?

By admin | Updated: October 26, 2014 22:45 IST

बालकांना खेळता, बागडता यावे, वृद्धांना फिरण्या व बसण्यासाठी हक्काचे स्थळ असावे म्हणून शहरांत बाग-बगिचांची निर्मिती केली जाते़ वर्धा शहरातही अनेक ठिकाणी बालोद्याने निर्माण करण्यात आलीत़

वर्धा : बालकांना खेळता, बागडता यावे, वृद्धांना फिरण्या व बसण्यासाठी हक्काचे स्थळ असावे म्हणून शहरांत बाग-बगिचांची निर्मिती केली जाते़ वर्धा शहरातही अनेक ठिकाणी बालोद्याने निर्माण करण्यात आलीत़ यासाठी मोठी जागा आणि पैसाही खर्ची घालण्यात आला; पण त्या बालोद्यानाच्या देखभाल, दुरूस्तीसाठी कुठल्याही उपाययोजना नाहीत़ यामुळे आज शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान मुलांसाठी की जनावरांसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ अद्यापही या बालोद्यानाकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिल्याचे दिसत नाही़शहरातील बसस्थानक ते सेवाग्राम मार्गावर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर बालोद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे़ नगर परिषदेने या बालोद्यानात खेळसाहित्य, कारंजे बसविले़ फुलझाडे लावून बालोद्यान सुशोभित करण्याचा प्रयत्न केला़ या बालोद्यानात दोन ठिकाणी कारंजा लावण्यात आले होते़ शिवाय सर्वच प्रकारचे खेळ साहित्यही बसविण्यात आले होते़ शिवाय वृद्धांकरिता बाकांची तसेच जमिनीवर निवांत आराम करता यावा म्हणून लॉनमध्ये वापरले जाणारे गवतही लावण्यात आले होते़ काही वर्षे हे बालोद्यान एका संघटनेला देखभाल-दुरूस्तीसाठी हस्तांतरीत केले़ अनेक वर्षे सदर संघटनेने बालोद्यान सुस्थितीत ठेवले; मात्र छोट्याशा कारणावरून पालिकेने ते कंत्राट संपुष्टात आणले़ तेव्हापासून बालोद्यान मद्यपि, अवैध व्यावसायिक आणि अनैतिक कामांच्या हवाली केल्याचे दिसून येत आहे़ आंबेडकर बालोद्यानाचे गेट नेहमी बंद राहत असले तरी आतमध्ये शिरण्याकरिता एक नव्हे तर अनेक मार्ग आहेत़ बालोद्यानाला असलेले तारांचे कुंपण कित्येक ठिकाणी तुटलेले आहे़ जनावरे या बालोद्यानात चारली जातात़ गाई, म्हशी, बकऱ्यांसह लगत नाला असल्याने वराहांचाही सुळसुळाट असतो़ बालोद्यानातील खेळ साहित्य भंगार झाले आहे़ साहित्याची मोडतोड झाली असून बाक नाहिसेच झाले आहेत़ पाण्याचे कारंजे होते की नव्हते, हेदेखील कळायला मार्ग नाही़ बालोद्यानात सर्वत्र झाडे-झुडपे वाढली असून खेळ साहित्यालाही झुडपांचा विळखा आहे़ बालोद्यानाच्या दोन्ही बाजूला नाला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली असते़ मुख्य मार्गावर दुकाने असून ट्रॅव्हल्स उभ्या करण्याकरिता ती जागा देण्यात आली आहे़ यामुळे दिवसभर वाहनांची गर्दी असते़ परिसरातील नागरिक मुतारी म्हणून बालोद्यानाचा वापर करताना दिसून येतात़ अनेक वर्षांपासून नागरिकांद्वारे ओरड होत असताना पालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याचे सौजन्य दाखविले नाही़ यामुळे बालकांचा हिरमोड होताना दिसतो़(कार्यालय प्रतिनिधी)