शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

आंबेडकर बालोद्यान मुलांसाठी की गुरांसाठी?

By admin | Updated: October 26, 2014 22:45 IST

बालकांना खेळता, बागडता यावे, वृद्धांना फिरण्या व बसण्यासाठी हक्काचे स्थळ असावे म्हणून शहरांत बाग-बगिचांची निर्मिती केली जाते़ वर्धा शहरातही अनेक ठिकाणी बालोद्याने निर्माण करण्यात आलीत़

वर्धा : बालकांना खेळता, बागडता यावे, वृद्धांना फिरण्या व बसण्यासाठी हक्काचे स्थळ असावे म्हणून शहरांत बाग-बगिचांची निर्मिती केली जाते़ वर्धा शहरातही अनेक ठिकाणी बालोद्याने निर्माण करण्यात आलीत़ यासाठी मोठी जागा आणि पैसाही खर्ची घालण्यात आला; पण त्या बालोद्यानाच्या देखभाल, दुरूस्तीसाठी कुठल्याही उपाययोजना नाहीत़ यामुळे आज शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान मुलांसाठी की जनावरांसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ अद्यापही या बालोद्यानाकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिल्याचे दिसत नाही़शहरातील बसस्थानक ते सेवाग्राम मार्गावर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर बालोद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे़ नगर परिषदेने या बालोद्यानात खेळसाहित्य, कारंजे बसविले़ फुलझाडे लावून बालोद्यान सुशोभित करण्याचा प्रयत्न केला़ या बालोद्यानात दोन ठिकाणी कारंजा लावण्यात आले होते़ शिवाय सर्वच प्रकारचे खेळ साहित्यही बसविण्यात आले होते़ शिवाय वृद्धांकरिता बाकांची तसेच जमिनीवर निवांत आराम करता यावा म्हणून लॉनमध्ये वापरले जाणारे गवतही लावण्यात आले होते़ काही वर्षे हे बालोद्यान एका संघटनेला देखभाल-दुरूस्तीसाठी हस्तांतरीत केले़ अनेक वर्षे सदर संघटनेने बालोद्यान सुस्थितीत ठेवले; मात्र छोट्याशा कारणावरून पालिकेने ते कंत्राट संपुष्टात आणले़ तेव्हापासून बालोद्यान मद्यपि, अवैध व्यावसायिक आणि अनैतिक कामांच्या हवाली केल्याचे दिसून येत आहे़ आंबेडकर बालोद्यानाचे गेट नेहमी बंद राहत असले तरी आतमध्ये शिरण्याकरिता एक नव्हे तर अनेक मार्ग आहेत़ बालोद्यानाला असलेले तारांचे कुंपण कित्येक ठिकाणी तुटलेले आहे़ जनावरे या बालोद्यानात चारली जातात़ गाई, म्हशी, बकऱ्यांसह लगत नाला असल्याने वराहांचाही सुळसुळाट असतो़ बालोद्यानातील खेळ साहित्य भंगार झाले आहे़ साहित्याची मोडतोड झाली असून बाक नाहिसेच झाले आहेत़ पाण्याचे कारंजे होते की नव्हते, हेदेखील कळायला मार्ग नाही़ बालोद्यानात सर्वत्र झाडे-झुडपे वाढली असून खेळ साहित्यालाही झुडपांचा विळखा आहे़ बालोद्यानाच्या दोन्ही बाजूला नाला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली असते़ मुख्य मार्गावर दुकाने असून ट्रॅव्हल्स उभ्या करण्याकरिता ती जागा देण्यात आली आहे़ यामुळे दिवसभर वाहनांची गर्दी असते़ परिसरातील नागरिक मुतारी म्हणून बालोद्यानाचा वापर करताना दिसून येतात़ अनेक वर्षांपासून नागरिकांद्वारे ओरड होत असताना पालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याचे सौजन्य दाखविले नाही़ यामुळे बालकांचा हिरमोड होताना दिसतो़(कार्यालय प्रतिनिधी)