शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

जिल्हाधिकाऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनी गिरविला पाठ

By admin | Updated: September 22, 2016 01:17 IST

सुनंदा व संजय दोघे वर्गमित्र असतात. सारखेच हुशार असल्याने दोघेही शिष्यवृत्ती परिक्षेत प्रथम येतात.

‘सुनंदा जिल्हाधिकारी होते’ : वाहितीपूर उच्च प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम, थेट संवादातून विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणावर्धा : सुनंदा व संजय दोघे वर्गमित्र असतात. सारखेच हुशार असल्याने दोघेही शिष्यवृत्ती परिक्षेत प्रथम येतात. शिक्षणाकरिता सुनंदाला कुटुंबीयांचे सहकार्य मिळते, तर संजयचे वडील शिक्षण संस्थेत नोकरीवर असल्याने स्वत:च्या जागेवर संजयला चपराशाची नोकरी ते मिळवून देतात. याच दरम्यान सुनंदा ही उच्चशिक्षित होऊन थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारते. जिल्हाधिकाऱ्यांचा गावात सत्कार समारंभ असतो. त्यावेळी संजय आणि सुनंदा पुन्हा एकमेकांना भेटतात. यावेळी संवादात मी चपराशी असल्याचे संजय सांगतो. त्यावेळी सुनंदा त्याला निराश न करता पुढील शिक्षणाची प्रेरणा देते. हा सारांश आहे. इयत्ता सातवीतील सुनंदा जिल्हाधिकारी होते, या पाठाचा. जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास कसा खडतड असतो. पण प्रयत्न केल्याने ते शिखर कशारितीने गाठू शकता. याचे थेट प्रात्यक्षिक सेलू तालुक्यातील वाहितपूर येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील सातवीच्या २३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधूनच घेतले. शिक्षक वर्गात पाठ शिकवून प्रत्यक्ष चित्र विद्यार्थ्यांपुढे उभे करतात. पण जिल्हाधिकाऱ्यांसोबतच हा पाठ जर आत्मसात करायला मिळाला तर विद्यार्थ्यांना जास्त आनंद होईल ही बाब ध्यानात घेत वाहितपूर येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक देवेंद्र गाठे यांनी याबाबतची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. ठरल्याप्रमाणे सोमवारी अगदी शाळेच्या वेळेवर सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे थांबले. वर्गाप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी आपली जागा निश्चित केली. त्यावेळी शिक्षक मात्र गाठे नव्हते तर होते, खुद्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल. जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर प्रथम पाठ आईवडीलांच्या सेवेचा झाला. तेथूनच विद्यार्थ्यांचा एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार जिल्हाधिकाऱ्यांवर होत राहीला. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर दिले. या पाठात सुमारे ४८ प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून समाधान मिळवून घेतले. तब्बल ९० मिनिटे हा जिल्हाधिकारी-विद्यार्थी संवाद चालला. आज पालकांच्या इच्छेमुळे विद्यार्थ्यांवर केवळ डॉक्टर व इंजिनिअर होण्याची सक्ती केली जाते. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परिक्षेचा दृष्टीकोन ठेवा. दररोज अभ्यास करा आणि प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय गाठा, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी नवाल यांनी विद्यार्थ्यांना केले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अध्ययन करावे, ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशस्तीपत्राने सन्मानित केले. मुख्याध्यापक देवेंद्र गाठे, केंद्रप्रमुख चंदा डायगव्हाणे, शिक्षक रवींद्र कडू, डॉ. किरण धांदे, पालक निलेश दांडेकर, भगवान महाकाळकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम साध्य झाला. सामुदायिक प्रार्थनेने वर्गपाठाचा समारोप करण्यात आला. हा पाठ सदैव स्मरणात राहिल असे मत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.(शहर प्रतिनिधी)