शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेतीविषयक कार्य व कृषीसंबाधित उद्योग करण्याकरिता परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 20:21 IST

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यात या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे खा. रामदास तडस यांनी भेट देवून आढावा घेऊन आजची परिस्थिती जाणून घेतली.

ठळक मुद्देखासदार रामदास तडस यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यात या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे खा. रामदास तडस यांनी भेट देवून आढावा घेऊन आजची परिस्थिती जाणून घेतली.जिल्हयात कोरोणा विषाणूच्या प्रादुभार्वास प्रतिबंध करण्याकरिता संपूर्ण जिल्हयात संचार बंदी करण्यात आलेली आहे. परंतु जिल्हयातील शेतक-यांचा कापुस, हरभरा, गहु, तूर, संत्रा इत्यादी शेतमाल काढावयाचा असल्यामुळे अनेक अडचणी येत आहे, शेतक-यांना शेतामध्ये काम करण्याकरिता मजुर मिळत नसल्यामुळे तसेच पावसाळी वातावरणामुळे अनेक पिकाचे नुकसान होऊ शकते या करिता आपण शेतक-यांना शेतमाल काढण्याची परवानगी देण्यात यावी, त्यांची अडवणूक करुन त्रास देवू नये. तसेच कृषी आधारीत उद्योग धंदे बंद करण्यात आलेले आहे. याकरिता आपण कृषी आधारित उद्योग धंदे जसे जिनिंग अ‍ॅन्ड पे्रसींग मध्ये कापुस प्रक्रिया व त्यापासून निघणारी सरकी, तेल व्यवासाय, जिंनिंग व कृषी उद्योगा मध्ये दिवसपाळी व रात्रपाळी कामकरणारे, कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणा-या कंपन्या दालमिल, आॅइलमील, गहु, कारखाने उद्योग व्यवसाय करणार यांच्यावर सुध्दा कोणतही कार्यवाही करु नये तसेच या संबधीत आपल्या अधिनस्त आदेश काढून सर्वांना कळवावे अश्या सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.वर्धा शहरात भाजी विक्रेत्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व तुकडोजी ग्राउंड येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. परतु एकाच ठिकाणी असल्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढू शकते याकरिता प्रत्येक वार्डामध्ये भाजीपाल्याची व्यवस्था करुन देण्यात यावी जेणेकरुन गर्दीचे प्रमाण कमी होऊ शकेल. वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक विद्यार्थी व नोकरदारवर्ग जिल्हाबाहेर, अनेक राज्यात आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु संपुर्ण संचारबंदी असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत आहे त्यांना जिल्हयात आणण्याकरिता किंवा तिथेच त्या सर्व व्यवस्था करण्याकरिता तेथील संबधीत जिल्हयाधिकारी सोबत संपर्क साधून व्यवस्था करण्याबाबतसुध्दा सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी दिल्या.वर्धा जिल्हात जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव नियत्रणात आणण्याखाली प्रभावी कार्य सुरु आहे. आपल्या जिल्हयात कोरोना ग्रस्त रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करुन जिल्हयात कोरोना वायरस प्रादुर्भाव थांबविण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहे. सर्व नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत मध्ये सर्व परीसर स्वच्छ राखत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, प्रशासनाला सहकार्य करा, प्रशासनाच्या सुचनाचे पालन करा, घरीच रहा, सुरक्षित रहा असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस