शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कचरा ‘कुंडीत’ टाकण्याची अ‍ॅलर्जी

By admin | Updated: July 15, 2015 02:41 IST

शहरात नगर परिषदेच्या वतीने चौकाचौकांमध्ये कचराकुंड्या ठेवून नागरिकांना त्यात कचरा टाकण्याची सोय केली आहे.

सर्वत्र दुर्गंधी : सुजाण नागरिकही यादीतवर्धा : शहरात नगर परिषदेच्या वतीने चौकाचौकांमध्ये कचराकुंड्या ठेवून नागरिकांना त्यात कचरा टाकण्याची सोय केली आहे. अद्याप काही ठिकाणी अशा कचराकुंड्या नसल्याने एकीकडे नागरिक ओरड करीत आहे, तर दुसरीकडे कचराकुंड्या असूनही त्यात कचरा न टाकता कुड्यांच्या सभोवताल कचरा टाकून अनेकजण मोकळे होतात. त्यामुळे नागरिकांना कचरा हा कचराकुंडीत टाकण्याची ‘अ‍ॅलर्जी’ झाली की काय, असा प्रश्न पडत असून यात अनेक सुजाण नागरिकही असतात.शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जिकडे पहावे तिकडे प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. त्यामुळे प्रशासनाप्रती राग निर्माण होणे सहाजिकच आहे. पण याची वेगळी बाजू निदर्शनास येते. असून त्यामुळेच जास्त कचरा शहरात दिसत आहे. आणि ती म्हणजे नागरिकांना असलेली कचराकुंड्यांची अ‍ॅलर्जी. शहरातील बहुतेक ठिकाणी कचराकुंड्या आहेत. परंतु अशा कचराकुंड्यांकडे लक्ष दिले असता या कचराकुंड्या रिकाम्या आणि त्यांच्या सभोवतालच कचरा दिसून येतो. यात ९० टक्के हा प्लास्टिक कचरा असतो हे विशेष. अनेक ठिकाणी आजही कचरा टाकण्याची सोय नाही. त्यामुळे त्या भागातील नागरिक आम्ही कचरा टाकावा कुठे, असा प्रश्न उपस्थित करतात. पण ज्या ठिकाणी अनेक दिवसांपासून कचरा टाकण्याची सोय आहे तिथे मात्र कचरा हा कचराकुंडीत न टाकता इतरत्र टाकला जातो. परिणामी दुर्गंधी पसरते आणि परिसराला अवकळा आल्याचे दिसते. सोय असतानाही नागरिक कचरा योग्य त्या जागी टाकत नसल्यानेही अव्यवस्था वाढत आहे. विशेष म्हणजे यात सुजाण नागरिकांचे प्रमाणही बरेच आहे.(शहर प्रतिनिधी)