शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

आर्वी नाक्याच्या थांब्याची एसटीला अ‍ॅलर्जी

By admin | Updated: March 31, 2017 01:57 IST

स्थानिक आगारातून निघालेल्या आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका येथे थांबत नाही.

विद्यार्थ्यांचे हाल : उन्हापासून बचावासाठी घ्यावा लागतो दुकानांचा आसरावर्धा/आकोली : स्थानिक आगारातून निघालेल्या आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका येथे थांबत नाही. यामुळे विद्यार्थ्यांची भर उन्हात होरपळ होत आहे. प्रवासी निवारा नसल्याने दुकानांचा आधार घ्यावा लागतो वा पायी मुख्य बसस्थानकावर पोहोचावे लागते. थांबा असताना एसटीला आर्वी नाक्यावर थांबण्याची अ‍ॅलर्जी असल्याचेच दिसते.वर्धा ते आर्वी मार्गावर शेकडो विद्यार्थी दररोज प्रवास करतात. आंजी, खरांगणा, येळाकेळी, सुकळी (बाई) या गावातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता बसने वर्धा गाठतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी आर्वी नाका परिसरातील लोक महाविद्यालय, न्यू आर्टस कॉलेज, पिपरी (मेघे) येथील महाविद्यालयात शिक्षण घेतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांकडे प्रवास भाड्याला पैसे राहत नाहीत. यामुळे त्यांना बसवर विसंबून राहावे लागते. कॉलेज संपल्यानंतर जवळचा थांबा म्हणून विद्यार्थी आर्वी नाक्यावर येतात.वर्धा आगारातून सुटणाऱ्या बसेस आर्वी नाका थांब्यावर न थांबता सुसाट निघून जातात. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एक तर येथे हक्काचा प्रवासी निवारा नाही. यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना दुकानांचा आधार घेत दुसऱ्या बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागते. दुपारी आर्वी नाक्यावर गावाकडे जाण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळीच घरी जाता येते. गोरगरीबांची ही मुलं पैसे नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करू शकत नाहीत. यामुळे काही विद्यार्थी नाक्यापासून पायी भर उन्हात बसस्थानक गाठतात. पोटात अन्नाचा कण नसताना विद्यार्थ्यांची पायीवारी दमछाक करणारी ठरते. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वाहकांना आर्वी नाक्यावर बस थांबविण्याच्या सूचना देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)दोन मार्गांना दिला जातो वेगवेगळा न्यायवर्धा बसस्थानकातून दिवसभर आर्वी आणि नागपूरसाठी बसेस सोडल्या जातात. यातील नागपूरकडे जाणाऱ्या बसेस पोस्ट आॅफीस, आरती चौक व धुनिवाले मठ या भागात प्रवासी असल्यास थांबविल्या जातात; पण आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका, कारला रोड या थांब्यांवर थांबत नसल्याचे दिसते. यामुळे दोन मार्गांना वेगवेगळा न्याय दिला जात असल्याचे दिसते. काही दयाळू वाहक बस थांबवून विद्यार्थी घेतात तर काही बस रिकामी असताना पुढे जातात. यामुळे संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने महामंडळाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.