शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आर्वी नाक्याच्या थांब्याची एसटीला अ‍ॅलर्जी

By admin | Updated: March 31, 2017 01:57 IST

स्थानिक आगारातून निघालेल्या आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका येथे थांबत नाही.

विद्यार्थ्यांचे हाल : उन्हापासून बचावासाठी घ्यावा लागतो दुकानांचा आसरावर्धा/आकोली : स्थानिक आगारातून निघालेल्या आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका येथे थांबत नाही. यामुळे विद्यार्थ्यांची भर उन्हात होरपळ होत आहे. प्रवासी निवारा नसल्याने दुकानांचा आधार घ्यावा लागतो वा पायी मुख्य बसस्थानकावर पोहोचावे लागते. थांबा असताना एसटीला आर्वी नाक्यावर थांबण्याची अ‍ॅलर्जी असल्याचेच दिसते.वर्धा ते आर्वी मार्गावर शेकडो विद्यार्थी दररोज प्रवास करतात. आंजी, खरांगणा, येळाकेळी, सुकळी (बाई) या गावातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता बसने वर्धा गाठतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी आर्वी नाका परिसरातील लोक महाविद्यालय, न्यू आर्टस कॉलेज, पिपरी (मेघे) येथील महाविद्यालयात शिक्षण घेतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांकडे प्रवास भाड्याला पैसे राहत नाहीत. यामुळे त्यांना बसवर विसंबून राहावे लागते. कॉलेज संपल्यानंतर जवळचा थांबा म्हणून विद्यार्थी आर्वी नाक्यावर येतात.वर्धा आगारातून सुटणाऱ्या बसेस आर्वी नाका थांब्यावर न थांबता सुसाट निघून जातात. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एक तर येथे हक्काचा प्रवासी निवारा नाही. यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना दुकानांचा आधार घेत दुसऱ्या बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागते. दुपारी आर्वी नाक्यावर गावाकडे जाण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळीच घरी जाता येते. गोरगरीबांची ही मुलं पैसे नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करू शकत नाहीत. यामुळे काही विद्यार्थी नाक्यापासून पायी भर उन्हात बसस्थानक गाठतात. पोटात अन्नाचा कण नसताना विद्यार्थ्यांची पायीवारी दमछाक करणारी ठरते. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वाहकांना आर्वी नाक्यावर बस थांबविण्याच्या सूचना देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)दोन मार्गांना दिला जातो वेगवेगळा न्यायवर्धा बसस्थानकातून दिवसभर आर्वी आणि नागपूरसाठी बसेस सोडल्या जातात. यातील नागपूरकडे जाणाऱ्या बसेस पोस्ट आॅफीस, आरती चौक व धुनिवाले मठ या भागात प्रवासी असल्यास थांबविल्या जातात; पण आर्वीकडे जाणाऱ्या बसेस आर्वी नाका, कारला रोड या थांब्यांवर थांबत नसल्याचे दिसते. यामुळे दोन मार्गांना वेगवेगळा न्याय दिला जात असल्याचे दिसते. काही दयाळू वाहक बस थांबवून विद्यार्थी घेतात तर काही बस रिकामी असताना पुढे जातात. यामुळे संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने महामंडळाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.