शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कर वसुलीत ९० हजार रुपयांच्या अफरातफरीचा आरोप

By admin | Updated: April 14, 2017 02:15 IST

शासनाच्या आदेशानुसार नगर परिषद, नगर पंचायतीद्वारे कर वसुलीवर जोर देण्यात येत आहे.

मुख्याधिकाऱ्यांवर आरोप : नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारसमुद्रपूर : शासनाच्या आदेशानुसार नगर परिषद, नगर पंचायतीद्वारे कर वसुलीवर जोर देण्यात येत आहे. यात नगर पंचायतमध्ये डिसेंबर २०१६ पर्यंत कर वसुलीत ९० हजार २०३ रुपयांची अफरातफर झाल्याचे नगराध्यक्ष शिला सोनारे यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना गुरूवारी निवेदनातून तक्रार केली आहे.ज्या काळापासून मुख्याधिकारी स्वालीया माळगावे रूजू झाल्या, त्याच काळापासून ही अफरातफर झाल्याचा आरोप नगराध्यक्षांनी तक्रारीत केला आहे. त्यांच्या अफलातून कारभारानेच हा प्रकार घडला असल्याचे त्यांचे मत आहे. त्यांनी कर वसुलीचे काम तांत्रिक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांना हे काम झेपले नसल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. केवळ हा घोळच नाही तर नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही तीन महिन्यांपासून देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने संबंधित मुख्याधिकारी, रोखपाल यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी विचारणा केली असता रोकड वहीनुसार डिसेंबर २०१६ पर्यंत ९० हजार २०३ रुपयांचा अपहार झाल्याचे रोखपालांनी कबुल केल्याचे निवेदनात नमूद केले आहे.या वहीत पोटकिर्द सुद्धा अपूर्ण आहे. या रोकडवहीमध्ये बरीच तफावत असल्याचे नमूद केले. यामुळे रोखपाल कोणत्याच वेतनावर व इतर बिलावर स्वाक्षऱ्या करणार नाही, असे त्याने कळविले आहे. या सर्व प्रकाराला मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या अपहाराची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी नगराध्यक्ष शिला सोनारे, उपाध्यक्ष रवींद्र झाडे, सभापती गजानन राऊत, अंकुश आत्राम, वनिता कांबळे, गटनेता मधुकर कामडी, नगरसेवक दिनेश निखाडे, नगरसेविका सुनीता सुरपाम, राजाभाऊ उमरे, पंकज बेलेकर, प्रवीण चौधरी, वर्षा बाभुळकर, सुषमा चिताडे, आशा वासनीक आदींनी केली आहे. तत्सम तक्रारीवर या सर्वांनी स्वाक्षरी केल्या आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांवर वसुलीबाबत काय कार्यवाही करतात, याकडे नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांचा ‘नो रिप्लाय’नगर पंचायतीच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी अफरातफरीचा आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या आरोबांबाबत मुख्याधिकारी स्वालीया माळगावे यांची भूमिका जाणून घेण्याकरिता त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता. यामुळे हे आरोप किती खरे आणि नेमका काय प्रकार आहे, याची माहिती मिळू शकली नाही.