शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सर्व प्रलंबित रेल्वे उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: July 17, 2015 02:12 IST

जिल्ह्यातील रेल्वे उड्डाण पुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे सर्वच उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

रामदास तडस : सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाची बैठकवर्धा : जिल्ह्यातील रेल्वे उड्डाण पुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे सर्वच उड्डाण पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. मंगळवारी स्थानिक विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यात खासदारांनी पुलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. शिवाय प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत, असे निर्देशही दिलेत.विश्रामगृहात खा. तडस यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीला बांधकाम विभाग व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. प्रामुख्याने वर्धा शहरातील बजाज चौक येथील वर्धा उड्डाण पुलाचे विस्तारिकरण, सिंदी रेल्वे येथील उड्डाण पूल, पुलगाव शहरातील उड्डाण पूल, केंद्र शासनाद्वारे अनुदानित केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली विविध विकास कामे, स्थानिक खासदार निधी अंतर्गत विकास कामे तसेच वर्धा जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व कामांचा आढावा खा. तडस यांनी बैठकीत घेतला. शिवाय प्रलंबित कामे मार्गी लावण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले.बजाज चौकातील रेल्वे उड्डाण पुलांच्या विस्तारीकरणाला केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. काही किरकोळ तांत्रिक कारणांमुळे सदर प्रस्ताव रेल्वे विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावर त्वरित तोडगा काढून प्रस्ताव विनाविलंब मंजूर करण्याच्या सूचनाही खा. तडस यांनी बैठकीमध्ये रेल्वे प्रशासनाला दिली. शिवाय अन्य कामेही जलदगतीने करण्याकरिता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाला दिले.बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता बालपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धाचे कार्यकारी अभियंता चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वीचे जुमडे, रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)