शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

सर्वच शेतकऱ्यांना मिळणार जीवनदायी योजनेचा लाभ

By admin | Updated: June 11, 2016 02:33 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकरी कुटूंबांना याचा लाभ मिळणार आहे.

शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबाना लाभवर्धा : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकरी कुटूंबांना याचा लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्ह्याचाही या योजनेत समावेश असून शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटूंबांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका तसेच सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येईल. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबांना लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अमलबजावणी सुरू झाली असून शेतकरी कुटूंबांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबांना त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका तसेच सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या शेतकरी कुटूंबांकडे कोणतीही शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्यांस फक्त त्यांच्याकडे असलेल्या सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी कुटूंबांतील कोणत्याही लाभार्थ्यांस विमा कंपनीने लाभ नाकारू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. शेतकरी कुटूंबांतील सदस्याचे नाव शिधापत्रिका किंवा सातबाराच्या उताऱ्यात समाविष्ट नसल्यास सदस्य हा त्या कुटूंबांतील असल्याचे संबंधित महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. लाभार्थी कुटूंबाचा व्यवसाय हा फक्त शेती एवढाच असणे आवश्यक राहील. शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असलेल्या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याला योजनेचा लाभ नाही.(शहर प्रतिनिधी)