शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गांधीनगरीत साहित्य संमेलन ठरलं; आता अध्यक्ष कोण होणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 12:19 IST

या संमेलनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरीही संमेलनाचा अध्यक्ष कोण? याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगायला लागली आहे.

ठळक मुद्देअद्याप तारीख अनिश्चित, पण नावांची चर्चा जोरात

आनंद इंगोले

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या वर्ध्यातील गांधीनगरीला ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. स्वावलंबी शाळेच्या मैदानावर संमेलन घेण्याचे ठरले असून आता या संमेलनाचा अध्यक्ष कोण? यावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

वर्ध्यामध्ये नवसाहित्यिकांना बळ देण्यासह साहित्य चळचळ वृद्धिंगत करण्याचे कार्य विदर्भ साहित्य संघाच्या वतीने अविरत सुरु आहे. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्ताने या वर्षी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान वर्ध्याला मिळाला आहे. यापूर्वी १९६९ मध्ये पु. शि. रेगे यांच्या अध्यक्षतेत ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच स्वावलंबी शाळेच्या मैदानावर घेण्यात आले होते. आता तब्बल ५३ वर्षांनंतर पुन्हा हा मान मिळाला असून वर्ध्यात सारस्वतांचा महामेळा भरणार आहे. या संमेलनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरीही संमेलनाचा अध्यक्ष कोण? याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगायला लागली आहे.

वर्ध्यात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता काही निकषही लावले जात असून आगामी अध्यक्ष विदर्भातील असावा, वर्ध्याशी नाळ जुळलेला असावा, गांधी विचारवंत असावा आणि सर्वोदयी कार्यकर्ता असावा, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगायला लागली आहे. केवळ कविता, कथा, कादंबरी लिहिणाराच साहित्यिक नव्हे तर सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करणारा विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता असेल तर संमेलनाध्यक्ष पदाच्या कक्षा रुंदावतील, असेही मत काहींनी व्यक्त केले आहे. परंतु आता महामंडळाकडून कुणाचे नाव जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुणी म्हणतंय डॉ. अभय बंग तर कुणी श्याम मानव

सोशल मीडियावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या नावाची चर्चा सुरु असताना यामध्ये काहींनी विनोबा-गांधी विचाराचे कृतिशील विचारवंत, लेखक व संशोधक पद्मश्री डॉ. अभय बंग तर कुणी दीर्घकाळ वर्ध्यात राहिलेले, आजही वर्ध्याशी आणि गांधीविचारांशी नाळ जुळलेले, विनोबांच्या आश्रमात रुळलेले, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष करीत असलेले, पुरोगामी विचारक, लेखक आणि प्रभावी वक्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचे नाव पुढे केले आहे. यावर अनेकांनी आपापली मतेही व्यक्त केली आहे.

डॉ. अभय बंग का?

गांधी विनोबांच्या विचारावर मार्गक्रमण करीत सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास करणारे. गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक डॉ. अभय बंग हे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुस्तकाने ते घराघरांत पोहोचले आहे. वैद्यकीय जगताबरोबरच अनेक सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांवर त्यांचे चिंतन व कृती महत्त्वपूर्ण आहे. १९९३ मध्ये लोकचळवळीच्या माध्यमातून अभय बंग यांच्या नेतृत्वात लागू झालेली दारूबंदी, अनेक साहित्यकृती, वैचारिक दिशा देणारे लेख डॉ. अभय बंग यांचे नावे आहेत. म्हणून गांधी-विनोबांच्या कर्मभूमीत होऊ घातलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी-विनोबांच्या विचारांचे पाईक असलेले डॉ. बंग यांची निवड व्हावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.

श्याम मानव का?

इंग्रजी विषयाचे शिक्षक असलेल्या श्याम मानवांची मराठीत दोन डझनांहून अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा वाचकवर्गही मोठा आहे. अनेकानेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास असून युथ कॉलम, सिनेनाट्य परीक्षण, समीक्षण, मुलाखती यांसह नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहे. मुद्र्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि नव्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही प्रा. श्याम मानव सातत्याने विवेकवादी, विज्ञानवादी व संवैधानिक मांडणी करतात. प्राच्यविद्या, लोकपरंपरा आणि संतसाहित्यापासून स्वसंमोहन, अद्ययावत आयुर्विज्ञान ते नवसंशोधनांपर्यंत चौफेर चिकित्सक अभ्यास त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानातून अनुभवायला मिळतो. म्हणून अध्यक्षपद श्याम मानवांना मिळाल्यास हे संमेलन ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे होईल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन