शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून केली शेती

By admin | Updated: February 8, 2016 02:15 IST

येथील सरकारी आबादीच्या ८१ आर जमिनीवर येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण केले.

शेतकऱ्यांची वहिवाट अडली : दीड वर्षांपासून प्रकरण धूळ खातकारंजा (घाडगे): येथील सरकारी आबादीच्या ८१ आर जमिनीवर येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण केले. त्याने या जमिनीवर शेती करणे सुरू केल्याने येथून जाणारा रस्ता बंद झाला. यामुळे एकूण चार शेतकऱ्यांची त्यांच्या शेतात जाणारी वहिवाट बंद झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून अतिक्रमण काढण्याच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. असे असताना येथील नायब तहसीलदाराकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अतिक्रमणाला या अधिकाऱ्याचे पाठबळ असल्याची ओरड होत आहे. त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही अधिकाऱ्यांनी केली आहे. शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने अडचणीत आलेल्या चार शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे पत्र दिले. त्याच्या स्मराणाकरिता दोन वेळा पत्रव्यवहार केला. असे असताना संबंधीत नायब तहसीलदाराकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे या अतिक्रमणालाा या अधिकाऱ्याचे पाठबळ असल्याची ओरड गावात होत आहे. मंडळ अधिकाऱ्याने चौकशी करून शासकीय जमिनीवर जेसीबीद्वारे खोदकाम करून ती ताब्यात घेत त्यावर पेरणी केल्याचा अहवालही तहसीलदारांना दिला आहे. तसे माहिती अधिकारातही पुढे आले आहे. त्या जागेवर संत्रा झाडे सुध्दा लावलेली, असल्याचा पुरावा आहे. या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्ते शेतकरी मारोती करमधार, भाऊराव बेलखेडे, गणपत सरोदे व किशोर मोकदम रा. कारंजा या चार शेतकऱ्यांचा पुढील शेतात जाणारा वहीवाटीचा रस्ता बंद झाला आहे. याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) गाव नकाशानुसारही जागा शासकीय कारंजा गाव नकाशा नमुनानुसार सर्व्हे क्रमांक १०२९, १०३०, १०३१ व १०३२ च्या मध्ये एल चिन्हाचे दर्शविलेली सरकारी आबादीची ८१ आर एवढी जागा आहे. भूमिअभिलेख वेळपत्रकामध्ये जुन्या प्रस्थापनानुसार सर्वे नं. ४८४/३ क, ४८४/३ ख आणि ४८४/१ग ही जागा ०.८१ हे. आर असून सध्या एल ने दर्शविलेली सरकारी आबादीची जागा म्हणून नोंद आहे. निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने याच रस्त्याच्या हक्काबाबत सन २००० मध्ये या चार शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून कारंजा तहसील कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. तेव्हा या शेतकऱ्यांचे बाजूला निकाल लागला होता. असे असतानाही त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेलाही बगलरस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रावरून नायब तहसीलदार काचोरे व तहसीलदार जोशी यांना अतिक्रमण त्वरीत हटविण्याबद्दल व रस्ता मोकळा करून देण्याबद्दल सुचविले. याला दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही कारवाई झाली नाही. सदर प्रकरण नायब तहसीलदार गणेश बर्वे यांच्याकडे आहे. मी प्रभारी तहसीलदार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा सरकारी जमिनीवरील अतिक्रमण कायदेशीररित्या त्वरीत हटवून शेतकऱ्यांना शेतवाट मोकळी करून द्यावी असे सुचविले आहे. त्यानुसार भूमि अभिलेख अधिकारी संबंधीत अर्जदार शेतकरी व गैरअर्जदार बोलावून त्वरीत कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे. - मिलिंद जोशी, तहसीलदार, कारंजा (घा.)