शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

सोयाबीनमुळे शेतीच आली संकटात

By admin | Updated: November 2, 2014 22:44 IST

अतिवृष्टी व नापिकीमुळे सोयाबीन यंदा परवडत नसल्याचे दिसते़ सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने शेतकऱ्यांची शेतीच संकटात आल्याचे चित्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्वी उपविभागातून

आवक आली निम्म्यावर : पाच दिवसांत केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवकआर्वी : अतिवृष्टी व नापिकीमुळे सोयाबीन यंदा परवडत नसल्याचे दिसते़ सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने शेतकऱ्यांची शेतीच संकटात आल्याचे चित्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा आर्वी उपविभागातून होणारी सोयाबीनची आवक निम्म्यावर आली आहे. गत पाच दिवसांत आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवक झाली आहे़ मागील वर्षी हा आकडा १५ हजारांच्या वर होता. तीन वर्षांपासून दुष्काळसदृश्य स्थिती असून नैसर्गिक प्रकोप वाढला आहे़ यातच प्रथम पावसाची दडी व नंतर अतिपाऊस यामुळे सोयाबीन व कपाशीची वाताहत झाली़ यावर्षी सोयाबीनची आराजी एकरी एक ते तीन पोते एवढी अत्यल्प आहे़ काहींना सोयाबीन पीक सवंगण्याची गरजच भासली नाही. ४ हजारांचे सोयाबीन काढण्यासाठी ६ हजारांचा खर्च, अशी स्थिती आहे़ यंदा आर्वी बाजार समितीची सोयाबीन खरेदी २७ नोव्हेंबरपासून सुरू झाली. शुभारंभ दिनी २६० पोत्यांची आवक झाली. दि़ २८ रोजी १७५, दि़ २९ ला ४२०, दि़ ३१ ला ५५६ तर १ नोव्हेंबरला ६०६ अशी पाच दिवसांत केवळ २ हजार ११७ पोत्यांची आवक झाली. मागील वर्षी ही आकडेवारी व आवक १५ ते १७ हजारांवर होती. यंदा ती निम्मीही झाली नसल्याने बाजार समितीत शुकशुकाट पसरला आहे़ यावर्षी सोयाबीनला उतारा नाही आणि भाव २६५० ते ३५०० एवढाच आहे. नापिकी व सततच्या पावसाने सोयाबीनची प्रतवारी खराब होऊन सोयाबीनचा दाणा बारिक झाला़ कमी-अधिक पाऊस झाल्याने शेतकरी सोयाबीन साठवूनही ठेऊ शकत नसल्याने शेतातून माल निघताच तो विकण्याशिवाय गत्यंतर नाही. अत्यंत कमी उतारा आणि अत्यल्प भाव, यामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भरून निघत नसल्याचे दिसते़ अनेक शेतकरी सोयाबीन सवंगणारच नसल्याचेही दिसते़(तालुका प्रतिनिधी)