शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
5
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
6
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
7
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
8
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
9
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
10
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
11
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
12
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
13
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
14
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
15
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
16
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
17
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
18
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
19
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत

कृषी विभागाने बजावली तब्बल 24 विक्रेत्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

बनावट बियाणे, खत तसेच कीटकनाशक विक्रीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून यंदाच्या वर्षी बियाण्यांचे ५१८ नमुने, खताची ३०८ नमुने तर कीटकनाशकांची तब्बल १२३ नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याच्या कृषी विभागाला प्राप्त झाले. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच जि.प. कृषी विभागाने यंदा बियाण्यांचे ५२२ नमुने, खताची २९७ नमुने तर कीटकनाशकांची १२८ नमुने घेत ती तपासणीसाठी पाठविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीप किंवा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बनावट बियाणे, खत तसेच कीटकनाशकाची विक्री करणारे सक्रिय होतात. पण जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्याची या प्रकरामुळे फसवणूक होऊ नये म्हणून म्हणून कृषी विभाग अलर्ट मोडवर येत भरारी पथकाच्या माध्यमातून पडताळणी करते. बनावट खत, बियाणे तसेच कीटकनाशकाची विक्री करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून यंदाच्या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत कृषी विभागाने तब्बल २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावला आहे. बनावट बियाणे, खत तसेच कीटकनाशक विक्रीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून यंदाच्या वर्षी बियाण्यांचे ५१८ नमुने, खताची ३०८ नमुने तर कीटकनाशकांची तब्बल १२३ नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याच्या कृषी विभागाला प्राप्त झाले. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच जि.प. कृषी विभागाने यंदा बियाण्यांचे ५२२ नमुने, खताची २९७ नमुने तर कीटकनाशकांची १२८ नमुने घेत ती तपासणीसाठी पाठविले आहे. कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान काही चुकीचे आढळल्याने जिल्ह्यातील २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. यात २२ बियाणे तर दोन खत विक्रेते आहेत.

न्यायालयात १६६ प्रकरणे प्रलंबितऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण १६६ प्रकरणे न्यायालयात निकालासाठी प्रलंबित आहेत. यात बियाण्यांशी संबंधित १०५, खतांशी संबंधित ४४ तर कीटकनाशकांशी संबंधित १७ प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले.

बोगस बियाण्यांबाबत प्राप्त झाल्या १८७ तक्रारीयंदाच्या वर्षी कृषी विभागाला बोगस बियाण्यांबाबत तब्बल १८७ तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यापैकी १०० तक्रारींचा निपटारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे. तर उर्वरित तक्रारींचा लवकरच निपटारा हाेणार असल्याचे सांगण्यात आले.

बोगस बियाणे, खत तसेच कीटकनाशकाची जिल्ह्यात विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. यंदा जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत बियाण्यांचे ५२२, खताची २९७ तर कीटकनाशकांची १२८ नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर तब्बल २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :agricultureशेती