शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाने बजावली तब्बल 24 विक्रेत्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

बनावट बियाणे, खत तसेच कीटकनाशक विक्रीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून यंदाच्या वर्षी बियाण्यांचे ५१८ नमुने, खताची ३०८ नमुने तर कीटकनाशकांची तब्बल १२३ नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याच्या कृषी विभागाला प्राप्त झाले. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच जि.प. कृषी विभागाने यंदा बियाण्यांचे ५२२ नमुने, खताची २९७ नमुने तर कीटकनाशकांची १२८ नमुने घेत ती तपासणीसाठी पाठविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : खरीप किंवा रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बनावट बियाणे, खत तसेच कीटकनाशकाची विक्री करणारे सक्रिय होतात. पण जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्याची या प्रकरामुळे फसवणूक होऊ नये म्हणून म्हणून कृषी विभाग अलर्ट मोडवर येत भरारी पथकाच्या माध्यमातून पडताळणी करते. बनावट खत, बियाणे तसेच कीटकनाशकाची विक्री करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून यंदाच्या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत कृषी विभागाने तब्बल २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावला आहे. बनावट बियाणे, खत तसेच कीटकनाशक विक्रीच्या प्रकाराला आळा बसावा म्हणून यंदाच्या वर्षी बियाण्यांचे ५१८ नमुने, खताची ३०८ नमुने तर कीटकनाशकांची तब्बल १२३ नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याच्या कृषी विभागाला प्राप्त झाले. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच जि.प. कृषी विभागाने यंदा बियाण्यांचे ५२२ नमुने, खताची २९७ नमुने तर कीटकनाशकांची १२८ नमुने घेत ती तपासणीसाठी पाठविले आहे. कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान काही चुकीचे आढळल्याने जिल्ह्यातील २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. यात २२ बियाणे तर दोन खत विक्रेते आहेत.

न्यायालयात १६६ प्रकरणे प्रलंबितऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण १६६ प्रकरणे न्यायालयात निकालासाठी प्रलंबित आहेत. यात बियाण्यांशी संबंधित १०५, खतांशी संबंधित ४४ तर कीटकनाशकांशी संबंधित १७ प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले.

बोगस बियाण्यांबाबत प्राप्त झाल्या १८७ तक्रारीयंदाच्या वर्षी कृषी विभागाला बोगस बियाण्यांबाबत तब्बल १८७ तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यापैकी १०० तक्रारींचा निपटारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे. तर उर्वरित तक्रारींचा लवकरच निपटारा हाेणार असल्याचे सांगण्यात आले.

बोगस बियाणे, खत तसेच कीटकनाशकाची जिल्ह्यात विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. यंदा जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत बियाण्यांचे ५२२, खताची २९७ तर कीटकनाशकांची १२८ नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर तब्बल २४ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :agricultureशेती