शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अभ्यास मंडळांतर्गत शेतीविषयक चर्चा

By admin | Updated: October 18, 2014 01:50 IST

श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी वर्धा अंतर्गत सामुदायिक विकास व विस्तार विभागातर्फे महाविद्यालयात..

वर्धा : श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी वर्धा अंतर्गत सामुदायिक विकास व विस्तार विभागातर्फे महाविद्यालयात कृषी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात येऊन अनेक शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेश नेमाडे, उपप्राचार्य एम.एम. पवार वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय कानोडे व कृषी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी खुनकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रा. शिरीष सुतार यांनी प्रास्ताविकात मंडळाचा व त्याद्वारे घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली. डॉ. संजय कानोडे यांनी कृषी अभ्यास मंडळाच्या सदस्याने विस्तार कार्यकर्त्यांची भूमिका पार पाडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करावा, असे मत व्यक्त करून उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना स्वच्छता राखण्याबाबत शपथ दिली. कृषी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी खुनकर यांनी कृषी अभ्यास मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या कार्याची माहिती सादर केली आणि विद्यार्थी व शेतकरी यांना जोडणारा दुवा म्हणून मंडळ कार्य करेल असे प्रतिपादन केले.उपप्राचार्य प्रा. पवार यांनी कृषी अभ्यास मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करण्यासाठी याचा फायदा होत असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सुरेश नेमाडे यांनी मंडळामार्फत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्या बाबतची तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर तरूण मंडळीचा स्वत:च्या शेतीमध्ये सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी मंडळाने कार्य करावे, असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी अभ्यास मंडळामार्फत शेतकऱ्यांना परंपरागत शेतीसोबत विज्ञान तंत्रज्ञानाची जोड देण्यावर भर दिला. युवकांची शेतीशी नाळ तुटत चालली आहे. परंतु शेती समृद्ध करण्यासाठी युवकांची मातीशी नाळ पुन्हा जोडली जाणे आवश्यक असून मंडळाने त्यामार्गाने विधायक प्रयत्न करावे, असेही ते यावेळी म्हणाले. संचालन डॉ. रतन चौधरी यांनी केले. आभार डॉ. अजय किनखेडकर यांनी मानले. कृषी अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष अमर पाटील, कोषाध्यक्ष अर्चना घोंगडे, सचिव आरती गायकवाड व सहसचिव म्हणून अश्विनी बुधबावरे व इतर सदस्यांचा समावेश आहे. त्यानीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)