शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

कृषी अभ्यास मंडळांतर्गत शेतीविषयक चर्चा

By admin | Updated: October 18, 2014 01:50 IST

श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी वर्धा अंतर्गत सामुदायिक विकास व विस्तार विभागातर्फे महाविद्यालयात..

वर्धा : श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी वर्धा अंतर्गत सामुदायिक विकास व विस्तार विभागातर्फे महाविद्यालयात कृषी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात येऊन अनेक शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेश नेमाडे, उपप्राचार्य एम.एम. पवार वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय कानोडे व कृषी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी खुनकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रा. शिरीष सुतार यांनी प्रास्ताविकात मंडळाचा व त्याद्वारे घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली. डॉ. संजय कानोडे यांनी कृषी अभ्यास मंडळाच्या सदस्याने विस्तार कार्यकर्त्यांची भूमिका पार पाडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करावा, असे मत व्यक्त करून उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना स्वच्छता राखण्याबाबत शपथ दिली. कृषी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी खुनकर यांनी कृषी अभ्यास मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या कार्याची माहिती सादर केली आणि विद्यार्थी व शेतकरी यांना जोडणारा दुवा म्हणून मंडळ कार्य करेल असे प्रतिपादन केले.उपप्राचार्य प्रा. पवार यांनी कृषी अभ्यास मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करण्यासाठी याचा फायदा होत असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सुरेश नेमाडे यांनी मंडळामार्फत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्या बाबतची तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर तरूण मंडळीचा स्वत:च्या शेतीमध्ये सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी मंडळाने कार्य करावे, असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी अभ्यास मंडळामार्फत शेतकऱ्यांना परंपरागत शेतीसोबत विज्ञान तंत्रज्ञानाची जोड देण्यावर भर दिला. युवकांची शेतीशी नाळ तुटत चालली आहे. परंतु शेती समृद्ध करण्यासाठी युवकांची मातीशी नाळ पुन्हा जोडली जाणे आवश्यक असून मंडळाने त्यामार्गाने विधायक प्रयत्न करावे, असेही ते यावेळी म्हणाले. संचालन डॉ. रतन चौधरी यांनी केले. आभार डॉ. अजय किनखेडकर यांनी मानले. कृषी अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष अमर पाटील, कोषाध्यक्ष अर्चना घोंगडे, सचिव आरती गायकवाड व सहसचिव म्हणून अश्विनी बुधबावरे व इतर सदस्यांचा समावेश आहे. त्यानीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)