शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अडतबंदीच्या स्थगितीने शेतकरी संकटात

By admin | Updated: December 25, 2014 23:36 IST

गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये खरेदीदार व्यापारी अडत देतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मात्र अडत लादली जात आहे. त्यामुळे एकाच देशात दोन निर्णय वेगवेगळे कसे असा

वर्धा : गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये खरेदीदार व्यापारी अडत देतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मात्र अडत लादली जात आहे. त्यामुळे एकाच देशात दोन निर्णय वेगवेगळे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी पूर्वीच दुष्काळाच्या छायेत असताना त्यांच्याप्रती सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी नकारात्मक घेतलेल्या अडतबंदी स्थगितीचा महात्मा समता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. आदेशाला दिलेली स्थगिती सरकारने तत्काळ उठवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनातून करण्यात आली. निवेदनानुसार महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून अडत मापाई, तोलाईच्या नावाखाली ३ ते १३ टक्क्यांपर्यंत अडत कमिशन घेऊन शेतकऱ्यांची लूट होत आहे. केंद्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी कायदा करून शेतमालाची अडत किंवा इतर सर्व खर्च हा खरेदीदार व्यापाऱ्यांकडून घेण्यात यावा, असा कायदा केला. परंतु महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे, शेतकरी संघटनांच्या निष्क्रीयतेमुळे व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा कायदा अमलात येत नव्हता. राज्यशासनाचे पणन संचालक सुभाष माने यांनी शनिवारपासून याच कायद्याच्या आधारे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अडतबंदी आदेश काढला. पण त्या आदेशाची अंमलबजावणी न करता राज्य सरकारने व्यापाऱ्यांची बाजू घेऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. भाजपचे फडणवीस ज्या गुजरातला आपला आदर्श मानतात त्या गुजरात आणि राजस्थान या भाजपशासित राज्यांमध्ये मागील १० वर्षांपासून याची अंमलबजावणी होत आहे. तेथील खरेदीदार, व्यापारी व अडते निमूटपणे या नियमाचे पालन करतात. मग महाराष्ट्रातच त्याच्या अंमलबजावणीसाठी नेमके अडत व व्यापाऱ्यांच्या पोटात का दुखते असा प्रश्न निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. येथे संप व बाजार बंदचे फतवे व्यापारी वारंवार काढतात. सरकारही त्वरित याची दखल घेऊन कायदेशीर शेतकरी न्यायाच्या आदेशाला स्थगिती देते. त्यामुळे या कृतीचा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव निषेध व्यक्त करण्यात आला. अडतला कायमची बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डाहाके, सुधीर पांगूळ उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)