शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

अडतबंदीच्या स्थगितीने शेतकरी संकटात

By admin | Updated: December 25, 2014 23:36 IST

गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये खरेदीदार व्यापारी अडत देतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मात्र अडत लादली जात आहे. त्यामुळे एकाच देशात दोन निर्णय वेगवेगळे कसे असा

वर्धा : गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये खरेदीदार व्यापारी अडत देतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मात्र अडत लादली जात आहे. त्यामुळे एकाच देशात दोन निर्णय वेगवेगळे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी पूर्वीच दुष्काळाच्या छायेत असताना त्यांच्याप्रती सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी नकारात्मक घेतलेल्या अडतबंदी स्थगितीचा महात्मा समता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. आदेशाला दिलेली स्थगिती सरकारने तत्काळ उठवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनातून करण्यात आली. निवेदनानुसार महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून अडत मापाई, तोलाईच्या नावाखाली ३ ते १३ टक्क्यांपर्यंत अडत कमिशन घेऊन शेतकऱ्यांची लूट होत आहे. केंद्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी कायदा करून शेतमालाची अडत किंवा इतर सर्व खर्च हा खरेदीदार व्यापाऱ्यांकडून घेण्यात यावा, असा कायदा केला. परंतु महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे, शेतकरी संघटनांच्या निष्क्रीयतेमुळे व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा कायदा अमलात येत नव्हता. राज्यशासनाचे पणन संचालक सुभाष माने यांनी शनिवारपासून याच कायद्याच्या आधारे महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अडतबंदी आदेश काढला. पण त्या आदेशाची अंमलबजावणी न करता राज्य सरकारने व्यापाऱ्यांची बाजू घेऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. भाजपचे फडणवीस ज्या गुजरातला आपला आदर्श मानतात त्या गुजरात आणि राजस्थान या भाजपशासित राज्यांमध्ये मागील १० वर्षांपासून याची अंमलबजावणी होत आहे. तेथील खरेदीदार, व्यापारी व अडते निमूटपणे या नियमाचे पालन करतात. मग महाराष्ट्रातच त्याच्या अंमलबजावणीसाठी नेमके अडत व व्यापाऱ्यांच्या पोटात का दुखते असा प्रश्न निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. येथे संप व बाजार बंदचे फतवे व्यापारी वारंवार काढतात. सरकारही त्वरित याची दखल घेऊन कायदेशीर शेतकरी न्यायाच्या आदेशाला स्थगिती देते. त्यामुळे या कृतीचा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव निषेध व्यक्त करण्यात आला. अडतला कायमची बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डाहाके, सुधीर पांगूळ उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)