शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

संगणक चालकांच्या कामबंद आंदोलनाने ग्रामस्थांत संताप

By admin | Updated: October 30, 2014 22:56 IST

हिंगणघाट तालुक्यातील संगणक परिचालकांना मानधन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते़ यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत मिळणारा मृत्यूचा दाखला, जन्म दाखला, रहिवासी दाखला,

पोहणा : हिंगणघाट तालुक्यातील संगणक परिचालकांना मानधन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते़ यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत मिळणारा मृत्यूचा दाखला, जन्म दाखला, रहिवासी दाखला, ना हरकत प्रमाणपत्र आदी अन्य कागदपत्रे मिळत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ शिवाय अनेक कामेही खोळंबली आहेत़ग्रामपंचायतसह विविध शासकीय कार्यालयात मानधन तत्वावर तालुक्यात ६५ संगणक परिचालक काम करीत आहेत. या संगणक चालकांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. मानधनाबाबत त्यांनी निवेदने दिलीत; पण मानधन देण्यात आले नाही़ यामुळे संतापलेल्या संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते़ या आंदोलनामुळे गावातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला़ आंदोलन संपुष्टात आले असले तरी ग्रामस्थांच्या समस्या मात्र अद्याप निकाली निघालेल्या नाहीत़केंद्र शासनाच्या विविध योजनांत पंचायत समितीमार्फत विविध प्रकल्प राबवून त्यातच संगणक परिचालकाची नियुक्ती करण्यात आली़ हे संगणक परिचालक ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. ग्रा़पं़ स्तरावरील परिचालकांना ८ हजारांऐवजी ३५०० ते ४१०० रुपयांवर बोळवण केली जात आहे. त्यातही त्यांना चार महिन्यांपासून मानधन दिले नाही़ यामुळे उदरनिर्वाह संकटात आला आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(वार्ताहर)