शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळी वातावरणाने शेतकºयांत धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:47 IST

दिवाळीच्या दुसºया दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. शिवाय रविवारी पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी अचानक पावसानेही हजेरी लावली.

ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : पहिल्या पावसाने सडली बोंडे; सोयाबीनही ओलेच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीच्या दुसºया दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. शिवाय रविवारी पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी अचानक पावसानेही हजेरी लावली. पुन्हा आलेल्या या ढगाळी वातावरण आणि पावसामुळे शेतकºयांत चांगलीच धडकी भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यात सर्वाधिक भीती कापूस उत्पादकांना असून त्यांचा कापूस शेतातच ओला तर होणार नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.गत आठवड्यात आलेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास हिसकला आहे. शेतात सोयाबीन सवंगणीच्या स्थितीत असताना आलेला पाऊस सोयाबीनची माती करून गेला. या पावसाने शेतात असलेल्या कपाशी पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. झाडावरच कपाशीची बोंडे सडल्याने कापूस उत्पादकांना मोठा फटका बसला. तर असलेल्या दमट वातावरणामुळे ओला झालेल्या कापसातील सरकीलाही अंकूर फुटल्याचे दिसून आले. याचा फटका कापूस उत्पादकांना बसला आहे. आता पुन्हा ढगाळी वातावरण असून पाऊस आल्यास कापूस उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे.कापसाची बोंडे झाडावरच सडण्याची भीतीदिवाळीच्या पूर्वी आलेल्या पावसामुळे शेतात असलेल्या कपाशीची बोंडे झाडावरच काळी पडून सडली होती. काही भागात ओल्या झालेल्या कापसातील सरकीला अंकुर फुटले होते. या स्थितीत बºयाच शेतकºयांनी त्यांच्याकडे असलेला कापूस बाजारात आणला. बाजारात आणलेला हा कापूस ओला असल्याच्या कारणाने व्यापाºयांकडून त्याला अत्यल्प दर दिल्या जात आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना याचा चांगलाच फटका बसत आहे. या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यात आता पुन्हा ढगाळी वातावरण आणि पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. याचा फटका कापूस उत्पादकांना बसण्याचे संकेत दिसत आहे.बाजारात आलेले सोयाबीन ओले असल्याने दर पडलेसोयाबीन बाजारात काढून मिळणाºया रकमेतून दिवाळी साजरी करण्याचा शेतकºयांचा मानस होता. मात्र आलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन शेतातच ओले झाले. तर काही भागात ओल्या झालेल्या सोयाबीनला अंकूर फुटले. याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला. पावसापासून उसंत मिळताच शेतकºयांनी सोयाबीन वाळवून त्याची काढणी केली. पावसाच्या काळामुळे शेतकºयांना सोयाबीन वाळविण्याकरिता वेळ मिळाला नसल्याने त्याने तसेच सोयाबीन बाजारात नेले. हे सोयाबीन पाहून व्यापाºयांनी ते ओले असल्याचे म्हणत त्याला अत्यल्प दर दिला. यामुळे शेतकºयांची मोठी अडचण झाल्याचे दिसून आले आहे.