शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

ढगाळी वातावरणाने शेतकºयांत धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:47 IST

दिवाळीच्या दुसºया दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. शिवाय रविवारी पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी अचानक पावसानेही हजेरी लावली.

ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : पहिल्या पावसाने सडली बोंडे; सोयाबीनही ओलेच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीच्या दुसºया दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. शिवाय रविवारी पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी अचानक पावसानेही हजेरी लावली. पुन्हा आलेल्या या ढगाळी वातावरण आणि पावसामुळे शेतकºयांत चांगलीच धडकी भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यात सर्वाधिक भीती कापूस उत्पादकांना असून त्यांचा कापूस शेतातच ओला तर होणार नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.गत आठवड्यात आलेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास हिसकला आहे. शेतात सोयाबीन सवंगणीच्या स्थितीत असताना आलेला पाऊस सोयाबीनची माती करून गेला. या पावसाने शेतात असलेल्या कपाशी पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. झाडावरच कपाशीची बोंडे सडल्याने कापूस उत्पादकांना मोठा फटका बसला. तर असलेल्या दमट वातावरणामुळे ओला झालेल्या कापसातील सरकीलाही अंकूर फुटल्याचे दिसून आले. याचा फटका कापूस उत्पादकांना बसला आहे. आता पुन्हा ढगाळी वातावरण असून पाऊस आल्यास कापूस उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे.कापसाची बोंडे झाडावरच सडण्याची भीतीदिवाळीच्या पूर्वी आलेल्या पावसामुळे शेतात असलेल्या कपाशीची बोंडे झाडावरच काळी पडून सडली होती. काही भागात ओल्या झालेल्या कापसातील सरकीला अंकुर फुटले होते. या स्थितीत बºयाच शेतकºयांनी त्यांच्याकडे असलेला कापूस बाजारात आणला. बाजारात आणलेला हा कापूस ओला असल्याच्या कारणाने व्यापाºयांकडून त्याला अत्यल्प दर दिल्या जात आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना याचा चांगलाच फटका बसत आहे. या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यात आता पुन्हा ढगाळी वातावरण आणि पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. याचा फटका कापूस उत्पादकांना बसण्याचे संकेत दिसत आहे.बाजारात आलेले सोयाबीन ओले असल्याने दर पडलेसोयाबीन बाजारात काढून मिळणाºया रकमेतून दिवाळी साजरी करण्याचा शेतकºयांचा मानस होता. मात्र आलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन शेतातच ओले झाले. तर काही भागात ओल्या झालेल्या सोयाबीनला अंकूर फुटले. याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला. पावसापासून उसंत मिळताच शेतकºयांनी सोयाबीन वाळवून त्याची काढणी केली. पावसाच्या काळामुळे शेतकºयांना सोयाबीन वाळविण्याकरिता वेळ मिळाला नसल्याने त्याने तसेच सोयाबीन बाजारात नेले. हे सोयाबीन पाहून व्यापाºयांनी ते ओले असल्याचे म्हणत त्याला अत्यल्प दर दिला. यामुळे शेतकºयांची मोठी अडचण झाल्याचे दिसून आले आहे.