शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

माणुसकीचे क्रांतीलढे पुन्हा एकदा लढून पाहू

By admin | Updated: May 17, 2017 00:41 IST

सध्याच्या काळात असत्य वाढत चाललेले आहे. माणुसकी हरवताना दिसत आहे. अन्याय, अत्याचाराचे परिसिमता गाठली जात आहे.

संमेलनात कवींनी फुंकले रणशिंग : वास्तवाचे विदारक चित्र शब्दांतून केले प्रकट लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सध्याच्या काळात असत्य वाढत चाललेले आहे. माणुसकी हरवताना दिसत आहे. अन्याय, अत्याचाराचे परिसिमता गाठली जात आहे. अशावेळी, ‘झुंज आपुली सत्यासाठी पडलो, हरलो, जरी कोसळलो, माणुसकीचे क्रांतीलढे हे पुन्हा एकदा लढून पाहू’, असे शाब्दिक रणशिंग कवींनी कवितेतून फुंकत एकूणच आजच्या विदारक परिस्थितीवर व अन्यायग्रस्ततेवर आपला आक्रोश व्यक्त केला. ज्येष्ठ कवी प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरोजनी खुरगे व दिलीप चरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित कवींनी दर्जेदार व सामाजिक आशयाच्या कविता सादर केल्या. प्रा. प्रमोद नारायणे यांनी ‘समरभूमीवर प्राण अर्पिले मागे सरलो नाही कधी स्वातंत्र्याच्या श्वासासाठी पुन्हा एकदा मरून पाहू’ ही कविता सादर केली. कवी रमेश खुरगे यांनी ‘हाडा मासांचे अंकूर पोटात ती वाढवते, मरणाच्या यातना सोसून आम्हा जग दाखविते’ अशी आईच्या वेदना व्यक्त करणारी कविता सादर केली. कवी सुनिल सावध यांनीही यावेळी बहारदार कविता सादर केली. दिलीप गायकवाड यांनी चार घडीचे जगणे जीवनास दे भरोसा, वय जगण्याचे व्हावे सत्तर म्हणायचे का? अशी जीवनावर भाष्य करणारी गझल सादर केली. संजय भगत यांनी स्वातंत्र्य आता गरिबांचे राहिले नाही, स्वातंत्र्य धनदांडग्यांचे, गरिबांसाठी काहीच नाही, अशी खंत कवितेतून व्यक्त केली. प्रा. अरविंद पाटील यांनी कवितेतून आदर्श गावाची संकल्पना मांडली. प्रशांत ढोले यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाची व्यथा आपल्या कवितेतून मांडली. या कवी समंलनात तलम रेशमी साडी, मारूनी खडा कुंभ ओढशी रे सावळ्या तू भिजविले अंग, पाणी भरण्या यमूनेला जात, उठली भीतीने ही कळ सावरे आदी कवीता सादर करण्यात आल्या. गंगाधर पाटील, बबन थुल, जी.के. उरकुडे, वंदना कोल्हे, पुष्पा चौधरी, जनार्दन ददगाळे यांनीही वर्तमान काळावर भाष्य करणाऱ्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कविसंमेलनासाठी डॉ. निरंजन एरकेवार, तुळशीराम वाघमारे, वीणा राऊत, अरविंद भोयर, आशा भोयर, सुषमा पिसे, मंदाकिनी एरकेवार, छाया उरकुडे, हांडे, स्रेहल हुकूम, तेजराम, अमृत चौधरी, भरत गजभिये यांच्यासह तसेच शहरातील गणमान्य व्यक्तींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कवी संमेलनाचे संचालन रामेश्वर भोपळे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार रमेश खुरगे यांनी मानले.