शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीचे क्रांतीलढे पुन्हा एकदा लढून पाहू

By admin | Updated: May 17, 2017 00:41 IST

सध्याच्या काळात असत्य वाढत चाललेले आहे. माणुसकी हरवताना दिसत आहे. अन्याय, अत्याचाराचे परिसिमता गाठली जात आहे.

संमेलनात कवींनी फुंकले रणशिंग : वास्तवाचे विदारक चित्र शब्दांतून केले प्रकट लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सध्याच्या काळात असत्य वाढत चाललेले आहे. माणुसकी हरवताना दिसत आहे. अन्याय, अत्याचाराचे परिसिमता गाठली जात आहे. अशावेळी, ‘झुंज आपुली सत्यासाठी पडलो, हरलो, जरी कोसळलो, माणुसकीचे क्रांतीलढे हे पुन्हा एकदा लढून पाहू’, असे शाब्दिक रणशिंग कवींनी कवितेतून फुंकत एकूणच आजच्या विदारक परिस्थितीवर व अन्यायग्रस्ततेवर आपला आक्रोश व्यक्त केला. ज्येष्ठ कवी प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरोजनी खुरगे व दिलीप चरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित कवींनी दर्जेदार व सामाजिक आशयाच्या कविता सादर केल्या. प्रा. प्रमोद नारायणे यांनी ‘समरभूमीवर प्राण अर्पिले मागे सरलो नाही कधी स्वातंत्र्याच्या श्वासासाठी पुन्हा एकदा मरून पाहू’ ही कविता सादर केली. कवी रमेश खुरगे यांनी ‘हाडा मासांचे अंकूर पोटात ती वाढवते, मरणाच्या यातना सोसून आम्हा जग दाखविते’ अशी आईच्या वेदना व्यक्त करणारी कविता सादर केली. कवी सुनिल सावध यांनीही यावेळी बहारदार कविता सादर केली. दिलीप गायकवाड यांनी चार घडीचे जगणे जीवनास दे भरोसा, वय जगण्याचे व्हावे सत्तर म्हणायचे का? अशी जीवनावर भाष्य करणारी गझल सादर केली. संजय भगत यांनी स्वातंत्र्य आता गरिबांचे राहिले नाही, स्वातंत्र्य धनदांडग्यांचे, गरिबांसाठी काहीच नाही, अशी खंत कवितेतून व्यक्त केली. प्रा. अरविंद पाटील यांनी कवितेतून आदर्श गावाची संकल्पना मांडली. प्रशांत ढोले यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाची व्यथा आपल्या कवितेतून मांडली. या कवी समंलनात तलम रेशमी साडी, मारूनी खडा कुंभ ओढशी रे सावळ्या तू भिजविले अंग, पाणी भरण्या यमूनेला जात, उठली भीतीने ही कळ सावरे आदी कवीता सादर करण्यात आल्या. गंगाधर पाटील, बबन थुल, जी.के. उरकुडे, वंदना कोल्हे, पुष्पा चौधरी, जनार्दन ददगाळे यांनीही वर्तमान काळावर भाष्य करणाऱ्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कविसंमेलनासाठी डॉ. निरंजन एरकेवार, तुळशीराम वाघमारे, वीणा राऊत, अरविंद भोयर, आशा भोयर, सुषमा पिसे, मंदाकिनी एरकेवार, छाया उरकुडे, हांडे, स्रेहल हुकूम, तेजराम, अमृत चौधरी, भरत गजभिये यांच्यासह तसेच शहरातील गणमान्य व्यक्तींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कवी संमेलनाचे संचालन रामेश्वर भोपळे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार रमेश खुरगे यांनी मानले.