शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

तीन वर्षे लोटूनही रोहित्र दुरुस्त होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:34 IST

शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते.

ठळक मुद्देएकाच रोहित्रावर भार : निम्मे गाव अंधारात, शिवणफळचे ग्रामस्थ हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते. संबधित विभागाकडे वारंवार रोहित्र दुरुस्तीची मागणी केल्यावरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.तीन वर्षांपूर्वी गावठाणावरील विद्युत दाब कमी करण्यासाठी दोन रोहित्र बसविण्यात आले. मात्र, रोहित्र सुरू करण्याचा संबंधितांना विसर पडला. रोहित्र सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे दोन्ही रोहित्र नादुरुस्त असल्याने अद्याप बंद आहेत. सध्या शिवणफळ गावातील गावठाणावरील एकाच रोहित्रावरून पाणी पुरवठा योजनेच्या जोडणीसह २० कृषिपंपाला जोडणी देण्यात आली आहे. यामुळे विद्युत रोहित्रावर अधिक दाब येत असल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. परिणामी पीठ गिरण्या बंद राहतात. याचा फटका नागरिकांना बसत आहे.महिलांना चार ते सहा किलोमीटर अंतरावरील गावातून दळण दळून आणावे लागत आहे. वीज वितरण कंपनीकडे रोहित्र बदलविण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.या गावातील शेतशिवारातील कृषिपंपाची जोडणी स्वतंत्र करण्याच्या हेतूने दोन ठिकाणी रोहित्र उभारण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने रोहित्र उभारणीचे काम पूर्ण केले. मात्र या रोहित्राला विद्युत पुरवठा केलाच नाही. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेत दोन्ही ठिकाणचे रोहित्र निकामी पडलेले आहे. तीन वर्षे लोटूनही या समस्येकडे विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. तातडीने दोन्ही रोहित्र दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विद्युतवाहिनी गेली चोरीलाशिवणफळ गावातील बसस्थानक लगतच्या झोपडपट्टी भागातील प्रवाहित तारा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र अद्यापही कंपनीच्या अधिकाºयांना याविषयी कुठलीही माहिती नाही, हे नवलच. यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांचा निष्काळजीपणा उजेडात आला आहे. याविषयी नागरिकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे.पाणीपुरवठा योजनेला फटकाशिवणफळ गावठाण रोहित्रावरून गावाला आणि नळयोजनेला विद्युत पुरवठा होत आहे. मात्र, याच रोहित्रावरून २० कृषिपंप आणि दोन पीठगिरण्या चालत असल्याने रोहित्रावर अधिक विद्युत दाब येतो. यामुळे वारंवार रोहित्रात बिघाड येतो. यामुळे निम्मे गाव अंधारात असते. या प्रकारामुळे गावात वीजपुरवठ्याचा नित्याने लपंडाव सुरू असतो. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे.

टॅग्स :electricityवीज