शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षे लोटूनही रोहित्र दुरुस्त होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:34 IST

शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते.

ठळक मुद्देएकाच रोहित्रावर भार : निम्मे गाव अंधारात, शिवणफळचे ग्रामस्थ हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते. संबधित विभागाकडे वारंवार रोहित्र दुरुस्तीची मागणी केल्यावरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.तीन वर्षांपूर्वी गावठाणावरील विद्युत दाब कमी करण्यासाठी दोन रोहित्र बसविण्यात आले. मात्र, रोहित्र सुरू करण्याचा संबंधितांना विसर पडला. रोहित्र सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे दोन्ही रोहित्र नादुरुस्त असल्याने अद्याप बंद आहेत. सध्या शिवणफळ गावातील गावठाणावरील एकाच रोहित्रावरून पाणी पुरवठा योजनेच्या जोडणीसह २० कृषिपंपाला जोडणी देण्यात आली आहे. यामुळे विद्युत रोहित्रावर अधिक दाब येत असल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. परिणामी पीठ गिरण्या बंद राहतात. याचा फटका नागरिकांना बसत आहे.महिलांना चार ते सहा किलोमीटर अंतरावरील गावातून दळण दळून आणावे लागत आहे. वीज वितरण कंपनीकडे रोहित्र बदलविण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.या गावातील शेतशिवारातील कृषिपंपाची जोडणी स्वतंत्र करण्याच्या हेतूने दोन ठिकाणी रोहित्र उभारण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने रोहित्र उभारणीचे काम पूर्ण केले. मात्र या रोहित्राला विद्युत पुरवठा केलाच नाही. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेत दोन्ही ठिकाणचे रोहित्र निकामी पडलेले आहे. तीन वर्षे लोटूनही या समस्येकडे विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. तातडीने दोन्ही रोहित्र दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विद्युतवाहिनी गेली चोरीलाशिवणफळ गावातील बसस्थानक लगतच्या झोपडपट्टी भागातील प्रवाहित तारा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र अद्यापही कंपनीच्या अधिकाºयांना याविषयी कुठलीही माहिती नाही, हे नवलच. यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांचा निष्काळजीपणा उजेडात आला आहे. याविषयी नागरिकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे.पाणीपुरवठा योजनेला फटकाशिवणफळ गावठाण रोहित्रावरून गावाला आणि नळयोजनेला विद्युत पुरवठा होत आहे. मात्र, याच रोहित्रावरून २० कृषिपंप आणि दोन पीठगिरण्या चालत असल्याने रोहित्रावर अधिक विद्युत दाब येतो. यामुळे वारंवार रोहित्रात बिघाड येतो. यामुळे निम्मे गाव अंधारात असते. या प्रकारामुळे गावात वीजपुरवठ्याचा नित्याने लपंडाव सुरू असतो. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे.

टॅग्स :electricityवीज