शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
4
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
5
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
6
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
7
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
8
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
9
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
12
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
13
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
14
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
15
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
16
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
17
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
18
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
19
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
20
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?

तीन वर्षे लोटूनही रोहित्र दुरुस्त होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:34 IST

शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते.

ठळक मुद्देएकाच रोहित्रावर भार : निम्मे गाव अंधारात, शिवणफळचे ग्रामस्थ हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : शिवणफळ गावातील दोन रोहित्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने पाणीपुरवठा योजनेला फटका बसला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गावठाणाच्या रोहित्रावरून वीस कृषी पंप आणि नळयोजना सध्या कार्यान्वित असून एकाच रोहित्रावर अधिक विद्युत दाब येत असल्याने निम्मे गाव काळोखात राहते. संबधित विभागाकडे वारंवार रोहित्र दुरुस्तीची मागणी केल्यावरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.तीन वर्षांपूर्वी गावठाणावरील विद्युत दाब कमी करण्यासाठी दोन रोहित्र बसविण्यात आले. मात्र, रोहित्र सुरू करण्याचा संबंधितांना विसर पडला. रोहित्र सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे दोन्ही रोहित्र नादुरुस्त असल्याने अद्याप बंद आहेत. सध्या शिवणफळ गावातील गावठाणावरील एकाच रोहित्रावरून पाणी पुरवठा योजनेच्या जोडणीसह २० कृषिपंपाला जोडणी देण्यात आली आहे. यामुळे विद्युत रोहित्रावर अधिक दाब येत असल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे. परिणामी पीठ गिरण्या बंद राहतात. याचा फटका नागरिकांना बसत आहे.महिलांना चार ते सहा किलोमीटर अंतरावरील गावातून दळण दळून आणावे लागत आहे. वीज वितरण कंपनीकडे रोहित्र बदलविण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.या गावातील शेतशिवारातील कृषिपंपाची जोडणी स्वतंत्र करण्याच्या हेतूने दोन ठिकाणी रोहित्र उभारण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने रोहित्र उभारणीचे काम पूर्ण केले. मात्र या रोहित्राला विद्युत पुरवठा केलाच नाही. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेत दोन्ही ठिकाणचे रोहित्र निकामी पडलेले आहे. तीन वर्षे लोटूनही या समस्येकडे विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. तातडीने दोन्ही रोहित्र दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विद्युतवाहिनी गेली चोरीलाशिवणफळ गावातील बसस्थानक लगतच्या झोपडपट्टी भागातील प्रवाहित तारा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र अद्यापही कंपनीच्या अधिकाºयांना याविषयी कुठलीही माहिती नाही, हे नवलच. यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांचा निष्काळजीपणा उजेडात आला आहे. याविषयी नागरिकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे.पाणीपुरवठा योजनेला फटकाशिवणफळ गावठाण रोहित्रावरून गावाला आणि नळयोजनेला विद्युत पुरवठा होत आहे. मात्र, याच रोहित्रावरून २० कृषिपंप आणि दोन पीठगिरण्या चालत असल्याने रोहित्रावर अधिक विद्युत दाब येतो. यामुळे वारंवार रोहित्रात बिघाड येतो. यामुळे निम्मे गाव अंधारात असते. या प्रकारामुळे गावात वीजपुरवठ्याचा नित्याने लपंडाव सुरू असतो. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे.

टॅग्स :electricityवीज