शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
3
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
4
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
5
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
6
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
8
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
9
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
10
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
11
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
12
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
13
Pankaj Dhir: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
14
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
15
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
16
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
17
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
18
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
19
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
20
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक

तीन वर्षांनंतरही इमारत अपूर्णच

By admin | Updated: April 13, 2016 02:23 IST

तीन वर्षांपूर्वी सेलू येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामाला सुरुवात झाली.

बांधकामाचा दर्जा तपासण्याची गरज : कंत्राटदारावरील भुर्दंड पोहोचला तीन लाखांवरघोराड : तीन वर्षांपूर्वी सेलू येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामाला सुरुवात झाली. रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी रुग्णालयाच्या परिसरातच वास्तव्यास असल्यास रुग्णांना तात्काळ सेवा देता येईल हा यामागील उद्देश होता. पण तीन वर्ष लोटूनही सदर बांधकाम अपूर्णच आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण होण्यास अजून किती वेळ लागेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामाला ३० मार्च २०१३ ला सुरुवात झाली. त्यानंतर २६ दिवसांनी २६ एप्रिल २०१३ रोजी तत्कालीन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांचे हस्ते तत्कालीन आमदार सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला. आधी बांधकामाला सुरुवात आणि नंतर भूमिपूजन असे सेलूत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रथमच केले असावे. या बांधकामासाठी ३४९.१५ लक्ष रूपयाच्या निधीची प्रशासकीय मान्यता असून ३१५.२५ लक्ष रूपयाची तांत्रिक मान्यता आहे. २९९.७३ लक्ष रूपयाचा करारनामा करण्यात आला. फलकावर काम सुरू झाल्याची तारीख ३०/३/१३ आहे. येथून १३ महिन्यात संबंधीत कंत्राटदाराला सदर काम पूर्ण करणे बंधनकारक होते. पण तीन वर्षाचा कालावधी लोटूनही काम अपूर्णावस्थेत असून ते लवकर पूर्ण होईल याची तिळमात्र शंका नाही. या बांधकामाची कासव गती असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने याआधीचही प्रकाशित केले होते. त्यावेळी उपविभागीय अभियंता डी. डब्ल्यू. कुटे यांना विचारणा केली होती. तेव्हा काम पूर्ण करण्याचा कालावधी संपला आहे. तेव्हापासून दररोज ५०० रुपये प्रमाणे दंडाची आकारणी संबंधीत कंत्राटदारावर करणे सुरू आहे, असे सांगितले होते. पण अजूनही काम पूर्ण झाले नसल्याने या कंत्राटदारावर जवळपास तीन लाखांच्या वर भूर्दंड बसल्याचे सांगण्यात येत आहे. अजून सहा महिन्यांचा काळ या बांधकामाला लागल्यास ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराकडून दंडाची रक्कम वसूल केली जाणार काय, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. कामाची संथगती हादेखील संशोधनाचा विषय ठरत आहे. वेळेत काम पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेतच पावले उचलणे गरजेचे होते. पण दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती ओढावल्याचे दिसून येत आहे.(वार्ताहर)