शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

छाननीत ३३ नामांकन बाद

By admin | Updated: February 3, 2017 01:50 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामांकन दाखल

जिल्हा परिषद व पंचायत समितीतील एकूण ९६३ नामांकन वैधवर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस बुधवार (१ फेब्रुवारी) होता. अंतिम दिवसापर्यंत जि.प. आणि पं.स. करिता तब्बल ९९६ नामांकन दाखल झाले. या नामांकन अर्जाची गुरुवारी छाननी झाली. यात एकूण ३३ नामांकन अवैध ठरले. यामुळे आजच्या घडीला दाखल पैकी एकूण ९६३ नामांकन वैध ठरले आहे. अवैध ठरलेल्या नामांकनात जिल्हा परिषदेत एकूण १३ तर पंचायत समितीकरिता नामांकन दाखल करणाऱ्या २० उमेदवारांचे अर्ज काही त्रुट्यांमुळे नामंजूर झाले. यामुळे आजच्या घडीला जिल्हा परिषदेकरिता ३५९ तर पंचायत समितीकरिता ५६७ उमेदवार वैध ठरले आहेत. आज झालेल्या छानणीत काही राजकीय पक्षांना फटका बसल्याचे दिसून आले. हिंगणघाट जिल्हा परिषदेत शिवसेना आणि समुद्रपूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर झाला आहे. तर वर्धा तालुक्यातील बोरगाव (मेघे) पंचायत समितीतील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज एकाच अनुमोदकाच्या कारणाने नामंजूर झाले. यामुळे येथे सेनेचे पंचायत समितीतील आव्हान संपुष्टात आले आहे. बुधवारी जिल्हा परिषदेकरिता एकूण ३६६ तर पंचायत समितीकरिता ६३० जणांनी नामांकन दाखल केले होते. आॅनलाईन पद्धतीत दाखल झालेल्या या नामांकनासोबत आवश्यक कागदपत्र आहे अथवा नाही, दाखल झालेले नामांकन अर्ज नियमाप्रमाणे आहेत अथवा नाही याची आज आठही तालुका स्तरावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी झाली. तपासणीनंतर गट आणि गणाकरिता एकूण ९६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असे असले तरी अंतिम यादी जाहीर होणे बाकी आहे. नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख ७ फेबु्रवारी असून त्या दिवसापर्यंत किती उमेदवार रिंगणात राहतील यावर शिक्कामोर्तब होणार आहे. याच दिवशी अपक्ष असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. यामळे वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण आपली उमेदवारी कायम राखतो याकडे जिल्ह्यातील ७.६० लाख मतदारांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)