शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

छाननीत ३३ नामांकन बाद

By admin | Updated: February 3, 2017 01:50 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामांकन दाखल

जिल्हा परिषद व पंचायत समितीतील एकूण ९६३ नामांकन वैधवर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस बुधवार (१ फेब्रुवारी) होता. अंतिम दिवसापर्यंत जि.प. आणि पं.स. करिता तब्बल ९९६ नामांकन दाखल झाले. या नामांकन अर्जाची गुरुवारी छाननी झाली. यात एकूण ३३ नामांकन अवैध ठरले. यामुळे आजच्या घडीला दाखल पैकी एकूण ९६३ नामांकन वैध ठरले आहे. अवैध ठरलेल्या नामांकनात जिल्हा परिषदेत एकूण १३ तर पंचायत समितीकरिता नामांकन दाखल करणाऱ्या २० उमेदवारांचे अर्ज काही त्रुट्यांमुळे नामंजूर झाले. यामुळे आजच्या घडीला जिल्हा परिषदेकरिता ३५९ तर पंचायत समितीकरिता ५६७ उमेदवार वैध ठरले आहेत. आज झालेल्या छानणीत काही राजकीय पक्षांना फटका बसल्याचे दिसून आले. हिंगणघाट जिल्हा परिषदेत शिवसेना आणि समुद्रपूर पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर झाला आहे. तर वर्धा तालुक्यातील बोरगाव (मेघे) पंचायत समितीतील शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज एकाच अनुमोदकाच्या कारणाने नामंजूर झाले. यामुळे येथे सेनेचे पंचायत समितीतील आव्हान संपुष्टात आले आहे. बुधवारी जिल्हा परिषदेकरिता एकूण ३६६ तर पंचायत समितीकरिता ६३० जणांनी नामांकन दाखल केले होते. आॅनलाईन पद्धतीत दाखल झालेल्या या नामांकनासोबत आवश्यक कागदपत्र आहे अथवा नाही, दाखल झालेले नामांकन अर्ज नियमाप्रमाणे आहेत अथवा नाही याची आज आठही तालुका स्तरावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी झाली. तपासणीनंतर गट आणि गणाकरिता एकूण ९६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. असे असले तरी अंतिम यादी जाहीर होणे बाकी आहे. नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख ७ फेबु्रवारी असून त्या दिवसापर्यंत किती उमेदवार रिंगणात राहतील यावर शिक्कामोर्तब होणार आहे. याच दिवशी अपक्ष असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे. यामळे वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण आपली उमेदवारी कायम राखतो याकडे जिल्ह्यातील ७.६० लाख मतदारांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)