शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

अखेर जिल्हा बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना

By admin | Updated: May 3, 2016 02:32 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे मागील चार वर्षांपासून ठप्प पडलेले आर्थिक व्यवहार सुरू होण्याचे सर्व मार्ग मोकळे

लवकरच अधिकृत घोषणा : शेतकरी व ठेवीदारांच्या चेहऱ्यावरील आनंद परतणार वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे मागील चार वर्षांपासून ठप्प पडलेले आर्थिक व्यवहार सुरू होण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. मागील चार वर्षांत नैसर्गिक संकट आणि जिल्हा बॅँक बंद यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आर्थिक कणा मोडल्यागत झाली होती. सोमवारी भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकेला परवाना दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. बोटावर मोजण्या इतक्या दिवसांतच बँकेचे व्यवहार सुरळीत होणार असल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हाधिकारी अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्राने दिली. यामुळे शेतकऱ्यांसह ठेवीदारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे.जिल्ह्यात शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांकडे व काही कर्जदारांकडे थकलेल्या कर्जापोटी आर्थिक अडचणीत आली होती. यामुळे रिझर्व्ह बँकेने सन २०१२ मध्ये बँकेचे आर्थिक व्यवहार गोठविले. कोणत्याही ठेवी स्वीकारू नका, असे आदेशच रिझर्व्ह बँकेने बँक व्यवस्थापनाला दिले. यानंतर काही महिन्यातच म्हणजे डिसेंबर २०१२ पासून बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परिणामी, शेतकऱ्यांना कर्ज मिळणे बंद झाले. यामुळे बँकेची वसुलीही रखडली. वसुली होऊ न शकल्यामुळे जिल्हा बँकेची रिझर्व्ह बँकेकडे असेलली पत संपुष्टात आली. अखेर मे २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवानाच रद्द केला. यामुळे शेतकरी आणि ठेवीदार आर्थिक अडचणीत आले होते. या बँकेत जिल्ह्यात सर्वाधिक रक्कम शेतकऱ्यांची असून त्यांना त्यांच्या ठेवी मिळणे बंद झाले. शिवाय बँकेचे व्यवहारही धोक्यात आले होते. बँकेच्या व्यवहारावर आलेल्या प्रतिबंधामुळे सुमारे ४५० कोटींचे व्यवहार अडचणीत आले. खातेदारांच्या सुमारे ३५० कोटींच्या ठेवी बँकेकडे अडून पडल्या. बँकेची पत सिद्ध करण्याकरिता १०२ कोटींची गरज होती. बँक परत सुरू व्हावी, यासाठी शेतकरी हित जोपासणाऱ्या संघटनांसह विविध राजकीय पक्ष सरसावले. शासनावर दबाव आणण्याकरिता अनेक आंदोलने झालीत. आघाडी सरकारने बँकेचा परवाना परत मिळवून देण्याची घोषणाही केली होती; पण काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे घोर निराशा झाली. राज्यातील सरकार बदलले. नव्या सरकारनेही बँक सुरू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या. केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेतला. नाबार्डकडूनही आर्थिक सहाय्य घेण्यात आले. यामुळे बँकेची पत परत आली. याच कारणाने भारतीय रिझर्व्ह बँकेने आज वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा सुरू करण्याचा परवाना दिल्याची माहिती माहितगार सूत्राने दिली. यानंतर ही बिकट स्थिती उद्भवू नये, यासाठी बँक सुरू करण्यापूर्वी जिल्हाप्रशासन काही मार्गदर्शक सूचना देणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही दिवसांतच बँक सुरू होणार असल्याचे सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)बँकेच्या ठेवीदारांना दिलासा४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्याने ४५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. ठेवीदारांमध्ये रकमा बुडण्याची भीती निर्माण झाली होती. शासनाने मदत करणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. यामुळे ३१ मार्च २०१३ पर्यंत बहुतांश ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत घेतल्या. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या रकमा थकल्या आहेत. काही ठेवीदारांची १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम सहकारी बँकेत अडकली आहे. आता रिझर्व्ह बँकेने बँकींग परवाना बहाल केल्याने ठेवीदार भीतीमुक्त होणार आहे. बँकेत अडल्या आहेत ३५० कोटींच्या ठेवी ४जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरी व खातेदारांच्या सुमारे ३५० कोटींच्या ठेवी अडलेल्या आहे. या परवान्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला परवाना मिळाल्याची माहिती कानावर आली आहे. असे झाल्यास लवकरच बँक सुरू होईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. - सुरेश देशमुख, सहकार नेते तथा माजी आमदार, वर्धा