शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दडीनंतरच्या पाऊसधारांनी शेतकरी सुखावला

By admin | Updated: June 27, 2017 01:11 IST

पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला होता. त्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.

सर्वदूर पाऊस : पेरण्या साधणार; शेतीकामांना वेगलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला होता. त्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. गत काही दिवसांपासून आकाशात ढग दाटत होत; पण तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या. दडीनंतर अखेर सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पाऊसधारा शेतात अंकुरलेल्या पिकांकरिता नवसंजीवनीवच घेवून आल्याने जिल्ह्यात शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस येईल या आशेने जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादकांनी मान्सूनपूर्व पेरणी केली होती. प्रारंभी आलेल्या पावसामुळे शेतात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे बियाणे अंकुरले. अशातच उगविलेल्या अंकुरांना पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली. यात अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणी पावसानंतरच करावी असे म्हणत पावसाची प्रतीक्षा संपल्याचे आजच्या पावसावरून दिसून आले. पावसाच्या दडीने जिल्ह्यातील सोयाबीन व इतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीला ‘ब्रेक’ दिला. त्यांनी बियाण्यांची जुळवाजुळव करून ठेवली आहे. त्यांना केवळ पावसाची प्रतीक्षा होती. त्यांची प्रतीक्षा आजच्या पावसाने ती संपली आहे. आज आलेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर आला आहे. यामुळे उद्यापासून पेरणीच्या कामांना गती येणार असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या नोंदीनुसार गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यात १ हजार ५१७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे सांगण्यात आले; मात्र वास्तविकतेत पेरणीचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात १ हजार ५१७ हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. जर पावसाची दडी अशीच राहिली तर दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यात सोमवारी दुपारपासूनच जिल्ह्यात सर्वदूर आलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला. आज आलेला पाऊस शेतात अंकुरलेल्या बियाण्यांकरिता संजीवनीच ठरणार आहे. या पावसामुळे पिके तग धरण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. सोयाबीनच्या पेरणीला येणार जोर पेरणीकरिता योग्य पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरा करण्याची हिंम्मत दर्शविली नाही. यामुळे स्प्रिंकलर आणि ठिंबक सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. सोमवारपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून सर्वदूर पेरणीला प्रारंभ होणार असल्याचे संकेत आहेत. आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून रखडलेल्या सोयाबीनच्या पेरणीला उद्या मंगळवारपासून जोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.