शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

दडीनंतरच्या पाऊसधारांनी शेतकरी सुखावला

By admin | Updated: June 27, 2017 01:11 IST

पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला होता. त्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.

सर्वदूर पाऊस : पेरण्या साधणार; शेतीकामांना वेगलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला होता. त्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. गत काही दिवसांपासून आकाशात ढग दाटत होत; पण तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या. दडीनंतर अखेर सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पाऊसधारा शेतात अंकुरलेल्या पिकांकरिता नवसंजीवनीवच घेवून आल्याने जिल्ह्यात शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस येईल या आशेने जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादकांनी मान्सूनपूर्व पेरणी केली होती. प्रारंभी आलेल्या पावसामुळे शेतात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे बियाणे अंकुरले. अशातच उगविलेल्या अंकुरांना पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली. यात अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणी पावसानंतरच करावी असे म्हणत पावसाची प्रतीक्षा संपल्याचे आजच्या पावसावरून दिसून आले. पावसाच्या दडीने जिल्ह्यातील सोयाबीन व इतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीला ‘ब्रेक’ दिला. त्यांनी बियाण्यांची जुळवाजुळव करून ठेवली आहे. त्यांना केवळ पावसाची प्रतीक्षा होती. त्यांची प्रतीक्षा आजच्या पावसाने ती संपली आहे. आज आलेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर आला आहे. यामुळे उद्यापासून पेरणीच्या कामांना गती येणार असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या नोंदीनुसार गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यात १ हजार ५१७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे सांगण्यात आले; मात्र वास्तविकतेत पेरणीचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात १ हजार ५१७ हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. जर पावसाची दडी अशीच राहिली तर दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यात सोमवारी दुपारपासूनच जिल्ह्यात सर्वदूर आलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला. आज आलेला पाऊस शेतात अंकुरलेल्या बियाण्यांकरिता संजीवनीच ठरणार आहे. या पावसामुळे पिके तग धरण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. सोयाबीनच्या पेरणीला येणार जोर पेरणीकरिता योग्य पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरा करण्याची हिंम्मत दर्शविली नाही. यामुळे स्प्रिंकलर आणि ठिंबक सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. सोमवारपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून सर्वदूर पेरणीला प्रारंभ होणार असल्याचे संकेत आहेत. आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून रखडलेल्या सोयाबीनच्या पेरणीला उद्या मंगळवारपासून जोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.