शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पर्यायी जागा दिल्यानंतरच अतिक्रमण काढावे

By admin | Updated: August 21, 2016 00:44 IST

शहरातील टिळक चौक, गोलबाजार, सराफ लाईन, इंगोले चौक, गोरस भंडार रोड तसेच कपडा लाईन परिसरात मुख्य रस्त्यांवर फळ,

किरकोळ हॉकर्स फळ व भाजी विक्रेत्यांची मागणी : नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडेवर्धा : शहरातील टिळक चौक, गोलबाजार, सराफ लाईन, इंगोले चौक, गोरस भंडार रोड तसेच कपडा लाईन परिसरात मुख्य रस्त्यांवर फळ, भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. पालिका प्रशासन टॅक्स घेते; पण जागा देत नसल्याने किरकोळ विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला दुकाने लावावी लागतात. यामुळे पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि नंतरच अतिक्रमण हटवावे, अशी मागणी किरकोळ हॉकर्स फळ आणि भाजी विक्रेत्यांनी केली आहे. याबाबत न.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.शिवाय ही कार्यवाही करीत असताना होणाऱ्या चर्चेत विनोद वानखेडे, कांचन खेडकर, शेख इमाम कुरेशी, कमलेश छकोले व पंढरी खेकडे हे पाच सदस्य ठेवावेत. अन्यथा कुठलाही निर्णय मान्य केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.शहरातील रहदारीच्या रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे सामान्यांना त्रास होत आहे. यातून त्यांची सुटका व्हावी या उद्देशाने काही एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी व प्रमुख व्यावसायिकांची ६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सराफ लाईन व कपडा लाईन येथील किरकोळ रस्त्यांवरील दुकानदारांना टिळक चौक गोलबाजारमध्ये आतील भागात जागा देण्याचे ठरले. दुकान मालकांनी स्वत:ची चारचाकी वाहने दुकानासमोर न ठेवता महादेवपुरा येथील बुटीवाडा जवळील रस्त्याच्या बाजूला ठेवावी, अशी सर्वांनुमते चर्चा झाली; पण एक आठवड्यापासून टिळक चौकात ६० वर्षापासून उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण समजून नगर परिषदेने ते हटविले. वास्तविक, त्या सर्व दुकानदारांना प्रथम गोलबाजारात आतील भागात दुकानासाठी जागा देणे, शौचालय, स्वच्छतागृह तयार करणे, पाणी, विद्युत आदी व्यवस्था करणे गरजेचे होते; पण तसे केले नाही.केवळ किरकोळ दुकानदारांचे अतिक्रमण काढून त्यांना बेरोजगार करण्याचा प्रताप पालिकेने केला. यामुळे प्रथम दुकानांची व्यवस्था करावी, नंतरच अतिक्रमण काढावे, दुकान मालकांनी चारचाकी वाहने दुकानासमोर रस्त्यावर न ठेवता अन्यत्र ठेवण्यास सांगावे, अशी मागणीही किरकोळ हॉकर्स फळ आणि भाज्या विक्रेत्यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)किरकोळ भाजी व फळ विक्रेते गोलबाजारात बसण्यास तयारगोलबाजार तसेच टिळक चौक, सराफ लाईन, इंगोले चौक, गोरस भंडार रोड तथा कपडा लाईन परिसरातील सर्व किरकोळ भाजी विक्रेते गोलबाजारातील आतील भागात व्यवसाय करण्यास तयार आहेत; पण सर्वांना समान न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही दुकानदार आतमध्ये आणि पुन्हा काही दुकानदार रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणार असतील तर परिस्थिती जैसे थे होते. असे होत असेल तर दुकाने आहे तेथेच ठेवून वाहने लावू द्यावीत, जागेची सीमा कमी करून पट्टे आखून द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.