शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शासनाच्या आदेशानंतर घरकुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:08 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागात लाभार्थ्यांची निवड स्वत: च्या मालकीची जागा व वार्षिक उत्पन्नाच्या निकषा आधारे केली जाते. परंतू शहरी भागात अतिक्रमीत व नझुलची जागा असल्याने ही योजना राबवितांना अनेक अडचणी येत असल्याने लाभांश कमी होतो.

ठळक मुद्देनगराध्यक्षांच्या प्रयत्नाला यश : अतिक्रमण नियमानुकूल होणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागात लाभार्थ्यांची निवड स्वत: च्या मालकीची जागा व वार्षिक उत्पन्नाच्या निकषा आधारे केली जाते. परंतू शहरी भागात अतिक्रमीत व नझुलची जागा असल्याने ही योजना राबवितांना अनेक अडचणी येत असल्याने लाभांश कमी होतो. त्यामुळे या नियमावलीत शिथिलता करण्याची मागणी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून शासनाने नागरी भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा आदेश पारीत केला आहे. यामुळे वर्ध्यातील जवळपास साडेचार हजार तर राज्यातील सहा लाख घरकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात ३८२ शहर व त्यालगतच्या नियोजन क्षेत्रात आवास योजना राबविली जात आहे. वर्धा शहरात ५ हजार लाभार्थ्यांनी पालिकेकडे अर्ज केले. नियमानुसार केवळ २५७ अर्जांना मंजुरी देण्यात आली. परंतू उर्वरीत ९२. ३२ टक्के प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी या योजनेच्या अंमलबजावणीकरिता नियमावलीत शिथिलता आणावी आणि नझुलच्या जागेत असलेल्या कुटूंबाना कायमस्वरुपी जागेचे मालकी हक्क द्यावा, अशी मागणी केली. यासंदर्भात राज्याचे वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन १३ नाव्हेंबरला अतिक्रमित जागेसंदर्भात परिपत्रक काढले. तसचे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी शासनाने ‘सर्वासाठी घरे २०२२’या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा आदेश पारीत केला. त्यामुळे नगराध्यक्ष तराळे यांच्या प्रयत्नाने वर्ध्यासह राज्यातील ३८२ शहरातील घरकुलाचा प्रश्न सुटला आहे.नियमित करण्यासाठी समित्यांचे गठनमहानगरपालिका व ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सदस्य म्हणून जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख तर सदस्य सचिव म्हणून महानगरपालिका आयुक्त अथवा उपआयुक्त व संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि ‘ब’ व ‘क’ वर्ग नगरपालिका व नगरपंचायत हद्दीकरिता उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेत सदस्य म्हणून उप-अधीक्षक भूमी अभिलेख व सदस्य सचिव म्हणून नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या समितीने आवश्यकतेनुसार सहायक संचालक व नगर रचनाकार यांच्या सल्ल्याने अतिक्रमण नियमित करतील.शासनाने काढलेला अतिक्रमण नियमानुकूल करणाऱ्या आदेशात जवळपास १६ अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार संबंधित समितीकडून ही कार्यवाही होणार आहे. या निर्णयामुळे वर्ध्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नझुल जागेत निर्वासीत कुटूंबाचा प्रश्न सुटेल व सर्व कुटूंबाना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येईल.अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा