शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

अन् तब्बल आठ वर्षांनी संजय घरी परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:00 IST

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे देवळी तालुक्यातील पुलगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाºया मलातपूर येथील मतिमंद असलेला संजय उत्तम डहाके (वय ३८) हा तरूण तब्बल आठ वर्षांनी घरी परतला.

ठळक मुद्देकर्जतच्या श्रद्धा रिहॅबिलिटेशनचे अद्भूत कार्य : नातेवाईक, गावकऱ्यांमध्ये आश्चर्य

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी): ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे देवळी तालुक्यातील पुलगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाºया मलातपूर येथील मतिमंद असलेला संजय उत्तम डहाके (वय ३८) हा तरूण तब्बल आठ वर्षांनी घरी परतला. यामुळे नातेवाईक आणि गावकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.सविस्तर असे की, देवळी तालुक्यातील मलातपूर येथे संजयचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. संजय लहानपणापासूनच मतिमंद, चिडचिड्या स्वभावाचा होता. २०११ मध्ये मे महिन्यात त्याच्या आत्येबहिणीचे नगाजी महाराज देवस्थान, वर्धा येथे लग्न होते. या लग्नाकरिता त्याचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. सर्व जण लग्न सोहळ्यात मग्न होते. येथून संजय केव्हा बेपत्ता झाला, हे कुणाच्याही लक्षात आले नाही. त्याचा सर्वच ठिकाणी शोध घेतल्यानंतरही संजयचा पत्ता लागत नसल्यामुळे वर्धा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन-तीन वर्षे त्याच्या परिवाराने नातेवाईकांकडे व इतर ठिकाणी शोध घेतला, परंतु तो मिळाला नाही. संजय बेपत्ता झाल्यापासुन त्याच्या आईवर मोठा आघात झाला. यातच आई आजारी पडली आणि संजय परत येण्याची आशा पूर्णत: मावळल्याचे जाणून त्याच्या आईने २०१५ मध्ये जगाचा निरोप घेतला, अशी माहिती भाऊ अरविंद डहाके यांनी लोकमतला दिली आणि २३ डिसेंबरला संजय घरी परतला. संजय कित्येक दिवस वेड्यासारखा निर्वस्त्र कुठेही भटकायचा. भटकंतीदरम्यानतो थेट गुजरात राज्यातील सूरत येथे पोहोचला. त्याच्या पायांना मोठमोठ्या जखमा होत्या. त्याचे वेडेपणाचे लक्षण दिसून येत होते. श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन ता.कर्जत रायगड, या संस्थेचे समाजसेवक यांच्या ही बाब लक्षात येतात त्यांनी संजयला संस्थेत दाखल केले. या संस्थेमध्ये मतिमंद, वेड्यांना भारताच्या कानाकोपºयातून आणून त्यांच्यावर उपचार केले जातात, दुरूस्त झाल्यावर त्यांच्या गावी पोहोचविण्यात येते. ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेत पीडितांवर नि:शुल्क उपचार केले जातात. संजयवर तीन वर्षे उपचार करण्यात आला. वेगवेगळ्या चाचण्यासद्धा करण्यात आल्या. तीन वर्षांनी तो दुरूस्त झाल्याची खात्री तेथील डॉक्टरांना पटली. दरम्यान संजयने स्वगावाचा संपूर्ण पत्ता तेथील डॉक्टरांना सांगितला.सुरूवातीला तो केवळ त्याचेच नाव सांगत होता. आता बरा झाल्याने त्याने संपूर्ण पत्ता सांगितला. सांगितलेला पत्ता खरा असल्याची येथील सेवकांनी खात्री करून घेतली व या पत्याच्या आधारे पुलगाव पोलीस ठाण्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पुलगाव पोलीस ठाण्याने मलातपूर येथील पोलीस पाटलांसोबत संपर्क साधला असता संजयने सांगितलेला पत्ता खरा असल्याचे सिद्ध झाले.श्रद्धा रिहॅबिलीटेशन फाऊंडेशनचे समाजसेवक समाधान पालकर यांनी २३ डिसेंबरला संजयला पुलगाव पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संजयला भाऊ, मलापूरचे पोलिस पाटील तसेच गावातील दोन-तीन नागरिकांच्या स्वाधीन केले. याशिवाय दोन महिन्यांचे औषधुसद्धा संजयसोबत दिले.भारतातील कोठेही मतिमंद, वेडी स्त्री, पुरूष, बालके दिसली तर या संस्थेचे समाजसेवक त्यांना या सेवाभावी संस्थेत घेऊन येतात व त्यांच्यावर नि:शुल्क उपचार करून दुरूस्त करतात.- समाधान पालकर, समाजसेवक, श्रद्धा रिहॅबिलिटेशन, वेणगाव, रायगड..