शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

अखेर ‘ती’ २७८ घरे सिंदी ग्रा.पं. हद्दीत

By admin | Updated: January 17, 2017 01:03 IST

नगर परिषद व ग्रामपंचायतीत असलेल्या हद्दीच्या वादावरून बेवारस ठरलेल्या तब्बल २७८ घरांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नव्हत्या.

१० वर्षांनी तोडगा निघाला : नागरी सुविधांसाठी करावा लागला संघर्षवर्धा : नगर परिषद व ग्रामपंचायतीत असलेल्या हद्दीच्या वादावरून बेवारस ठरलेल्या तब्बल २७८ घरांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नव्हत्या. यामुळे या भागतील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन केली, निवेदने दिली. त्यांनी उभारलेल्या या लढ्याला अखेर १० वर्षांनी यश आले. या प्रकरणात जिल्हा परिषदेने हस्तक्षेप करून ही संपूर्ण घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले. यामुळे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्यावतीने या घरांचा सर्व्हे करणे सुरू झाले आहे. येथील नगर परिषेद हद्दीतील संत तुकाराम वॉर्ड क्रमांक १९ मध्ये असलेले २७८ घरे १० वर्षांपूर्वी नगर पालिका प्रशासनाने आपल्या हद्दीत नसल्याचे म्हणत त्यांना उल्लेख हटवित ती घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याचे घोषित केले होते. यावर सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीने ही घरे आमच्या हद्दीत नसल्याचे स्पष्ट केल्याने या घरमालकांना आपण बेवारस असल्याची अनुभूती येत होती. ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रात ही घरे नसल्याने त्यांना नागरी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. नाली सफाई, रस्ते दुरूस्ती, मालमत्तेची खरेदी विक्री, गहाण, कर्ज आदी सुविधांपासून या भागातील नागरिक दूर होते. कुठल्याही नागरी सुविधा नसल्याने या समस्यांकरिता नागरिकांनी युवा परिर्वतन की आवाज या संघटनेशी संपर्क करून आंदोलन सुरू केले. प्रशासनाशी चर्चा केली. नगर परिषद, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासनाशी संघटनेच्या सदस्यांनी वारंवार जावून चर्चा केली. पाठपुरावा केला. हा पाठपुरावा सुरू असताना या २७८ घरांची यादी ग्रामपंचायत प्रशासनाने गहाळ केल्याचे उघड झाले. त्यामुळे या भागातील नागरिकांना न्याय मिळेल याची खात्री कमी होती, म्हणून संघटनेनी रक्तदान आंदोलन करून प्रशासनाला चेतावनी दिली. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी महिनाभरात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता ही घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीतच असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी अखेर निर्णय घेत ही घरे ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या या सूचनेनुसार ही घरे आता ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या हद्दीत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ही समस्या सोडविण्याकरिता युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे निहाल पांडे, चंद्रशेखर इंगोले, स्वप्नील घुमे, पंकज गणवरे, अमोल देऊळकर, राम आसटकर, विठ्ठल राऊत, अशोक भोयर, गुलाब बोकडे, दाते, अक्षय बाळसराफ, सोनू दाते, अभिषेक भोयर, मयूर पापडकर, निखील आंबुलकर यांनी रक्तदान आंदोलन केले होते.(प्रतिनिधी) मतदानाच्या हक्काकरिता करावी लागणार प्रतीक्षा नगर परिषद आणि ग्रामपंचायत हद्दीत नसलेली घरे आता ग्रामपंचायत हद्दीत आली आहेत. या भागातील नागरिकांची नावे लोकसभा आणि विधानसभेकरिता असलेल्या मतदार यादीत आहेत; मात्र ग्रामपंचायत आणि नगरपरिषद हद्दीतील यादीत त्यांचा समावेश नाही. यामुळे येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरिता त्यांना मतदान करणे शक्य नसल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे. यामुळे मतदानाकरिता त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.