शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

अखेर ‘ती’ २७८ घरे सिंदी ग्रा.पं. हद्दीत

By admin | Updated: January 17, 2017 01:03 IST

नगर परिषद व ग्रामपंचायतीत असलेल्या हद्दीच्या वादावरून बेवारस ठरलेल्या तब्बल २७८ घरांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नव्हत्या.

१० वर्षांनी तोडगा निघाला : नागरी सुविधांसाठी करावा लागला संघर्षवर्धा : नगर परिषद व ग्रामपंचायतीत असलेल्या हद्दीच्या वादावरून बेवारस ठरलेल्या तब्बल २७८ घरांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नव्हत्या. यामुळे या भागतील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन केली, निवेदने दिली. त्यांनी उभारलेल्या या लढ्याला अखेर १० वर्षांनी यश आले. या प्रकरणात जिल्हा परिषदेने हस्तक्षेप करून ही संपूर्ण घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले. यामुळे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्यावतीने या घरांचा सर्व्हे करणे सुरू झाले आहे. येथील नगर परिषेद हद्दीतील संत तुकाराम वॉर्ड क्रमांक १९ मध्ये असलेले २७८ घरे १० वर्षांपूर्वी नगर पालिका प्रशासनाने आपल्या हद्दीत नसल्याचे म्हणत त्यांना उल्लेख हटवित ती घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याचे घोषित केले होते. यावर सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीने ही घरे आमच्या हद्दीत नसल्याचे स्पष्ट केल्याने या घरमालकांना आपण बेवारस असल्याची अनुभूती येत होती. ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रात ही घरे नसल्याने त्यांना नागरी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. नाली सफाई, रस्ते दुरूस्ती, मालमत्तेची खरेदी विक्री, गहाण, कर्ज आदी सुविधांपासून या भागातील नागरिक दूर होते. कुठल्याही नागरी सुविधा नसल्याने या समस्यांकरिता नागरिकांनी युवा परिर्वतन की आवाज या संघटनेशी संपर्क करून आंदोलन सुरू केले. प्रशासनाशी चर्चा केली. नगर परिषद, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासनाशी संघटनेच्या सदस्यांनी वारंवार जावून चर्चा केली. पाठपुरावा केला. हा पाठपुरावा सुरू असताना या २७८ घरांची यादी ग्रामपंचायत प्रशासनाने गहाळ केल्याचे उघड झाले. त्यामुळे या भागातील नागरिकांना न्याय मिळेल याची खात्री कमी होती, म्हणून संघटनेनी रक्तदान आंदोलन करून प्रशासनाला चेतावनी दिली. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी महिनाभरात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता ही घरे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीतच असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी अखेर निर्णय घेत ही घरे ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या या सूचनेनुसार ही घरे आता ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या हद्दीत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ही समस्या सोडविण्याकरिता युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे निहाल पांडे, चंद्रशेखर इंगोले, स्वप्नील घुमे, पंकज गणवरे, अमोल देऊळकर, राम आसटकर, विठ्ठल राऊत, अशोक भोयर, गुलाब बोकडे, दाते, अक्षय बाळसराफ, सोनू दाते, अभिषेक भोयर, मयूर पापडकर, निखील आंबुलकर यांनी रक्तदान आंदोलन केले होते.(प्रतिनिधी) मतदानाच्या हक्काकरिता करावी लागणार प्रतीक्षा नगर परिषद आणि ग्रामपंचायत हद्दीत नसलेली घरे आता ग्रामपंचायत हद्दीत आली आहेत. या भागातील नागरिकांची नावे लोकसभा आणि विधानसभेकरिता असलेल्या मतदार यादीत आहेत; मात्र ग्रामपंचायत आणि नगरपरिषद हद्दीतील यादीत त्यांचा समावेश नाही. यामुळे येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरिता त्यांना मतदान करणे शक्य नसल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे. यामुळे मतदानाकरिता त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.