शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अतिक्रमण हटविण्याचा बार ठरला फुसका

By admin | Updated: February 2, 2017 00:45 IST

गावातील एकुर्ली व हिंगणघाट-वायगाव रस्त्याच्या बाजूला अनेकांनी अवैध बांधकाम केले. याच रस्त्याच्या बाजूच्या काही घरांवर दोन वर्षांपूर्वी

अधिकारी आलेच नाही : नोटीस आणि दवंडीमुळे ग्रामस्थांना होती पथकाची प्रतीक्षा तळेगाव (टा.) : गावातील एकुर्ली व हिंगणघाट-वायगाव रस्त्याच्या बाजूला अनेकांनी अवैध बांधकाम केले. याच रस्त्याच्या बाजूच्या काही घरांवर दोन वर्षांपूर्वी बांधकाम विभागाने जेसीबी चालवित अतिक्रमण काढले होते. शिल्लक राहिलेले अतिक्रमण बुधवारी काढण्यात येणार होते. संबंधितांना याबाबत नोटीस देत गावात दवंडीही दिली; पण बांधकाम विभागाचे पथक आलेच नाही. परिणामी, अतिक्रमण हटविण्याचा बार फुसकाच ठरला. या रस्त्याचे अनेक वेळा मोजमाप करण्यात आले. यामुळे दोन वर्षांपासून काही अतिक्रमणधारक घरे पडतील, या विवंचनेत आहे. अशातच यावर्षी नव्याने बांधकाम विभागाने अवैधरित्या बांधकाम केलेल्या अतिक्रमण धारकांना एक महिन्यापूर्वी नोटीस दिली. यासाठी शासनाच्या आदेशाद्वारे मंगळवारी ग्रामपंचायतीच्यावतीने दवंडी देण्यात आली. ‘अतिक्रमणाची मोजणी करून सिमांकन करण्यात आले आहे. शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्यांनी दवंडीची दखल घेत २४ तासांत सिमांकनाप्रमाणे अतिक्रमण काढून टाकावे. अन्यथा १ फेब्रुवारी २०१७ रोजी अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासन जबाबदार राहणार नाही’, असे सांगण्यात आले. यावरून काहींनी दुकानाचे काऊंटर, काहींनी घरे उकलली; पण बुधवारी दिवसभर अतिक्रमण हटविण्यासाठी पथक आले नाही. यामुळे अकारण मनस्ताप सहन करावा लागला.(वार्ताहर) ग्रामस्थांमध्ये होती धास्ती तळेगाव गावातील एकुर्ली रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना नोटीस देत दवंडी देण्यात आली होती. मंगळवारी दिलेल्या दवंडीमुळे बुधवारी अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होणार, अशी धास्ती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती. परिणामी, अतिक्रमणधारकांनी आपल्या दुकानांचे काऊंटर, काहींनी रस्त्यावर आलेली घरे उकलून ठेवल्याचे दिसून आले. बांधकाम विभागाकडून तत्पूर्वीच अतिक्रमणाची मोजणी करून सिमांकन करून देण्यात आलेले होते. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याच्या सूचना नोटीसमधून देण्यात आल्या होत्या. असे असले तरी बुधवारी पथकच गावात दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.