शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतरही अतिक्रमण कायम

By admin | Updated: September 8, 2016 00:42 IST

गत महिन्यात १७ आॅगस्ट रोजी नगर पालिकेच्यावतीने शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील टिळक मार्केट

अध्यक्ष, उपाध्यक्षांचे दुर्लक्ष : टिळक मार्केट झाले बकालपराग मगर वर्धागत महिन्यात १७ आॅगस्ट रोजी नगर पालिकेच्यावतीने शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील टिळक मार्केट परिसरात फळभाज्या विक्रेत्यांवर कारवाई करीत अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विक्रेत्यांना टिळक मार्केटच्या आत जागाही देण्यात आली; पण ही कारवाईच औटघटकेची ठरली. एकही विक्रेता टिळक मार्केटमध्ये दिलेल्या जागेवर गेला नाही. यामुळे या कारवाईला अर्थ काय, हे अतिक्रमण कायमचे हटणार काय, असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. वर्धा शहरातील भाजी व फळ बाजाराची गरज लक्षात घेत १९८५ साली शहराच्या मधोमध गोल बाजारात लोकमान्य टिळक भाजी व फळ मार्केट या नावाने बाजार तयार करण्यात आला. प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था येथे करण्यात आली. मार्केटच्या मधोमध असलेल्या विहिरीलगत लोकमान्य टिळकांचा अर्थकृती पुतळाही बसविण्यात आला. हळूहळू शहर वाढले तसतसे भाजी व फळविक्रेत्यांनी बाहेर रस्त्यांवर अतिक्रमण सुरू केले. काही काळातच मार्केटमध्ये कमी आणि बाहेरच अधिक दुकाने दिसायला लागली. त्यामुळे निर्माण झालेला अतिक्रमणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. पालिका प्रशासन वारंवार अतिक्रामण काढण्याचा प्रयत्न करते; पण दोनच दिवसांत चित्र जैसे थेच होऊन जाते. पदोपदी भाजी व फळविक्रेत्यांनी जागा बळकावून थाटलेल्या दुकानांमुळे वाहतुकीची वाट लागून अपघात वाढले आहेत. ही बाब ध्यानात घेऊन नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून १७ आॅगस्ट रोजी शहर पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण काढायाला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर टिळक मार्केटच्या आत जागेचे मोजमाप करून रेषा आखून प्रत्येक विक्रेत्याला जागा देऊन उद्यापासून येथेच दुकान लावण्याबाबत सज्जड दम दिला. पण नगराध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित राहत नसल्याने प्रस्थापित असलेले फळ व भाजीविक्रे पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वास्तव आहे. दोन दिवसांचा अल्टिमेटम विक्रेत्यांना देण्यात आला; पण २२ दिवस लोटूनही पालिकेचा अल्टिमेटम संपलेला नाही. एकही विक्रेता मार्केटमध्ये दुकान लावायला गेलेला नाही. ही कार्यवाही पुन्हा होणार काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.