शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
7
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
8
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
9
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
10
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
11
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
12
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
13
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
14
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
15
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
16
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
17
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
18
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
19
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
20
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

तब्बल २५ वर्षांनी बससेवा सुरू

By admin | Updated: May 12, 2016 02:27 IST

जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली.

वानरचुवा ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली : गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान गिरड : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली. बस सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बस गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी आंब्याचे तोरण बांधून बस सजविली. मोहगावचे उपसरपंच कैलास नवघरे व पोलीस पाटील महादेव सलाम यांनी बसची पूजा केली. यावेळी बसचालक आर.जी. ठाकूर, मनोहर बलविर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विजय मसराम, दशरथ दुधकोहळे, वामन दोडके, बालु पसारे, भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली, गजानन गारघाटे, विलास नवघरे, कवडु कोटमकर, पुरुषोत्तम राऊत, किशोर रंदये उपस्थित होते. वानरचुवा या गावात २५ वर्षांपूर्वी हिंगणघाट डेपोची ताडोबा बस मोहगाव जंगल मार्गाने चिमूर ताडोबा येथे जात होती. ही बस हिंगणघाट, समुद्रपूर, गिरड, शिवणफळ, मोहगाव, वानरचुवा, मंगरूळ, आमडी, खडसंगी या मार्गाने जात असल्याने ही बस समुद्रपूर तालुक्यासाठी महत्वपूर्ण होती. पण कालांतराने ही बस अचानक बंद झाली. त्यामुळे या मार्गावरील वानरचुवा गावातील नागरिकांनी तेव्हापासून बस गावात पाहिलीच नाही. तेव्हापासून या गावातील नागरिक वारंवार ही बस सुरू करावी तसेच मोहगाव मार्गाने पक्का रस्ता बांधावा, अशी मागणी करीत होते. पण खोट्या आश्वासना व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. या २५ वर्षात कित्येक लोकप्रतिनिधी आले आणि गेले. बसचे दर्शन वानरचुवा ग्रामस्थांना झालेच नाही. ही बाब गावकऱ्यांनी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांना सांगत मोहगाव जंगल मार्गे रस्ता व बसची मागणी केली. ग्रामस्थांची मागणी आणि त्यांचा होत असलेली अडचण लक्षात घेत आमदार कुणावार यांनी लवकरच बस सुरू करणार असे आश्वासन ग्रमस्थांना दिले होते. भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली यांनीही हा प्रश्न लावून धरला.अखेर २५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर मंगळवारी १० मे रोजी गावात बस पोहचली. गावात बस पोहोचल्याचे नागरिकही समाधान व्यक्त करीत होते. याच मागणीप्रमाणे मोहगाव ते वानरचुवा हा रस्ताही लवकरच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा वामन दोळके, बालु पसारे, प्रकाश सहारे, बाबा पुनवटकर, गुलाब मसराम, हनुमान येटे, अंबादास मुडरे, सुरेश पुनवटकर, राजु पुनवटकर आदी नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. ७आ बसमुळे प्रवाश्यांना होत असलेली अडचण दूर झाली आहे.(वार्ताहर)