शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २५ वर्षांनी बससेवा सुरू

By admin | Updated: May 12, 2016 02:27 IST

जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली.

वानरचुवा ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली : गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान गिरड : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली. बस सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बस गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी आंब्याचे तोरण बांधून बस सजविली. मोहगावचे उपसरपंच कैलास नवघरे व पोलीस पाटील महादेव सलाम यांनी बसची पूजा केली. यावेळी बसचालक आर.जी. ठाकूर, मनोहर बलविर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विजय मसराम, दशरथ दुधकोहळे, वामन दोडके, बालु पसारे, भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली, गजानन गारघाटे, विलास नवघरे, कवडु कोटमकर, पुरुषोत्तम राऊत, किशोर रंदये उपस्थित होते. वानरचुवा या गावात २५ वर्षांपूर्वी हिंगणघाट डेपोची ताडोबा बस मोहगाव जंगल मार्गाने चिमूर ताडोबा येथे जात होती. ही बस हिंगणघाट, समुद्रपूर, गिरड, शिवणफळ, मोहगाव, वानरचुवा, मंगरूळ, आमडी, खडसंगी या मार्गाने जात असल्याने ही बस समुद्रपूर तालुक्यासाठी महत्वपूर्ण होती. पण कालांतराने ही बस अचानक बंद झाली. त्यामुळे या मार्गावरील वानरचुवा गावातील नागरिकांनी तेव्हापासून बस गावात पाहिलीच नाही. तेव्हापासून या गावातील नागरिक वारंवार ही बस सुरू करावी तसेच मोहगाव मार्गाने पक्का रस्ता बांधावा, अशी मागणी करीत होते. पण खोट्या आश्वासना व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. या २५ वर्षात कित्येक लोकप्रतिनिधी आले आणि गेले. बसचे दर्शन वानरचुवा ग्रामस्थांना झालेच नाही. ही बाब गावकऱ्यांनी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांना सांगत मोहगाव जंगल मार्गे रस्ता व बसची मागणी केली. ग्रामस्थांची मागणी आणि त्यांचा होत असलेली अडचण लक्षात घेत आमदार कुणावार यांनी लवकरच बस सुरू करणार असे आश्वासन ग्रमस्थांना दिले होते. भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली यांनीही हा प्रश्न लावून धरला.अखेर २५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर मंगळवारी १० मे रोजी गावात बस पोहचली. गावात बस पोहोचल्याचे नागरिकही समाधान व्यक्त करीत होते. याच मागणीप्रमाणे मोहगाव ते वानरचुवा हा रस्ताही लवकरच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा वामन दोळके, बालु पसारे, प्रकाश सहारे, बाबा पुनवटकर, गुलाब मसराम, हनुमान येटे, अंबादास मुडरे, सुरेश पुनवटकर, राजु पुनवटकर आदी नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. ७आ बसमुळे प्रवाश्यांना होत असलेली अडचण दूर झाली आहे.(वार्ताहर)