शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

तब्बल २५ वर्षांनी बससेवा सुरू

By admin | Updated: May 12, 2016 02:27 IST

जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली.

वानरचुवा ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली : गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान गिरड : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली. बस सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बस गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी आंब्याचे तोरण बांधून बस सजविली. मोहगावचे उपसरपंच कैलास नवघरे व पोलीस पाटील महादेव सलाम यांनी बसची पूजा केली. यावेळी बसचालक आर.जी. ठाकूर, मनोहर बलविर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विजय मसराम, दशरथ दुधकोहळे, वामन दोडके, बालु पसारे, भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली, गजानन गारघाटे, विलास नवघरे, कवडु कोटमकर, पुरुषोत्तम राऊत, किशोर रंदये उपस्थित होते. वानरचुवा या गावात २५ वर्षांपूर्वी हिंगणघाट डेपोची ताडोबा बस मोहगाव जंगल मार्गाने चिमूर ताडोबा येथे जात होती. ही बस हिंगणघाट, समुद्रपूर, गिरड, शिवणफळ, मोहगाव, वानरचुवा, मंगरूळ, आमडी, खडसंगी या मार्गाने जात असल्याने ही बस समुद्रपूर तालुक्यासाठी महत्वपूर्ण होती. पण कालांतराने ही बस अचानक बंद झाली. त्यामुळे या मार्गावरील वानरचुवा गावातील नागरिकांनी तेव्हापासून बस गावात पाहिलीच नाही. तेव्हापासून या गावातील नागरिक वारंवार ही बस सुरू करावी तसेच मोहगाव मार्गाने पक्का रस्ता बांधावा, अशी मागणी करीत होते. पण खोट्या आश्वासना व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. या २५ वर्षात कित्येक लोकप्रतिनिधी आले आणि गेले. बसचे दर्शन वानरचुवा ग्रामस्थांना झालेच नाही. ही बाब गावकऱ्यांनी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांना सांगत मोहगाव जंगल मार्गे रस्ता व बसची मागणी केली. ग्रामस्थांची मागणी आणि त्यांचा होत असलेली अडचण लक्षात घेत आमदार कुणावार यांनी लवकरच बस सुरू करणार असे आश्वासन ग्रमस्थांना दिले होते. भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली यांनीही हा प्रश्न लावून धरला.अखेर २५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर मंगळवारी १० मे रोजी गावात बस पोहचली. गावात बस पोहोचल्याचे नागरिकही समाधान व्यक्त करीत होते. याच मागणीप्रमाणे मोहगाव ते वानरचुवा हा रस्ताही लवकरच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा वामन दोळके, बालु पसारे, प्रकाश सहारे, बाबा पुनवटकर, गुलाब मसराम, हनुमान येटे, अंबादास मुडरे, सुरेश पुनवटकर, राजु पुनवटकर आदी नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. ७आ बसमुळे प्रवाश्यांना होत असलेली अडचण दूर झाली आहे.(वार्ताहर)