शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

वकिलांनी ‘पीके’तील रिमोट व्हावे

By admin | Updated: February 15, 2016 02:17 IST

समाजाची दिशा ‘पीके’ सिनेमातील रिमोट हरविलेल्या ‘पीके’ सारखी झाली आहे. वकिलांमध्ये हा रिमोट होण्याची क्षमता आहे.

भूषण धर्माधिकारी : विदर्भ प्रदेश अधिवक्ता परिषदेचे एकदिवसीय शिबिरवर्धा : समाजाची दिशा ‘पीके’ सिनेमातील रिमोट हरविलेल्या ‘पीके’ सारखी झाली आहे. वकिलांमध्ये हा रिमोट होण्याची क्षमता आहे. वकिलांनी समाजासाठी तो रिमोट झाले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेद्वारे संचालित विदर्भ प्रदेश अधिवक्ता परिषदेच्यावतीने सेवाग्राम येथील शांती भवनात शनिवारी एकदिवसीय शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला भारत सरकारचे सहायक महाधिवक्ता अनिल सिंग, राज्य सरकारचे सहायक महाधिवक्ता रोहीत देव, अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे संघटक ज्योदीप रॉय, परिषदेचे अध्यक्ष मधुकर सोमलवार, जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ‘बदलत्या काळातील वकिलांची सामाजिक व कायदेशीर भूमिका’ विषयावर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी उद्घाटनपर सत्रात अनिल सिंग यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. पुढे बोलताना न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की, न्यायदेवतेच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीविषयी समजून घेणे आवश्यक आहे. ती पट्टी आपण बांधली आहे. बरेचदा प्रकरणांमध्ये पोलीस झपाट्याने तपास करतात. चार्जशिट दाखल करतात. न्यायालय कोणालाही निर्दोष सोडत नाही. प्रकरणामध्ये असलेल्या त्रूट्या न्यायालय समाजापुढे आणते. अपघाताचे उदाहरण देत न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनाची नोंद होते. मग, हे अज्ञात वाहन सांगण्याची जबाबदारी समाजातील नागरिकांची आहे. न्यायालयापुढे एकच काम आहे, ज्या माणसाला गुन्हेगार म्हणून न्यायालयासमोर आणले तो गुन्हेगार आहे वा नाही. गुन्हेगार कोण आहे, हे शोधण्याची जबाबदारी न्यायालयाची नाही. ती जबाबदारी समाजाची, पोलिसांची आहे. शहरामध्ये इमारतींचे जंगल उभे झाल्याचे दिसते. झाडे सोयीस्कररित्या कापली जात आहेत. पुढील काळात बांधकाम पाडून झाडे लावावी लागणार आहेत, असेही न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. अजित सदावर्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्ही.टी. देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील वकील प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)