शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांनी ‘पीके’तील रिमोट व्हावे

By admin | Updated: February 15, 2016 02:17 IST

समाजाची दिशा ‘पीके’ सिनेमातील रिमोट हरविलेल्या ‘पीके’ सारखी झाली आहे. वकिलांमध्ये हा रिमोट होण्याची क्षमता आहे.

भूषण धर्माधिकारी : विदर्भ प्रदेश अधिवक्ता परिषदेचे एकदिवसीय शिबिरवर्धा : समाजाची दिशा ‘पीके’ सिनेमातील रिमोट हरविलेल्या ‘पीके’ सारखी झाली आहे. वकिलांमध्ये हा रिमोट होण्याची क्षमता आहे. वकिलांनी समाजासाठी तो रिमोट झाले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेद्वारे संचालित विदर्भ प्रदेश अधिवक्ता परिषदेच्यावतीने सेवाग्राम येथील शांती भवनात शनिवारी एकदिवसीय शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला भारत सरकारचे सहायक महाधिवक्ता अनिल सिंग, राज्य सरकारचे सहायक महाधिवक्ता रोहीत देव, अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे संघटक ज्योदीप रॉय, परिषदेचे अध्यक्ष मधुकर सोमलवार, जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ‘बदलत्या काळातील वकिलांची सामाजिक व कायदेशीर भूमिका’ विषयावर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी उद्घाटनपर सत्रात अनिल सिंग यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. पुढे बोलताना न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की, न्यायदेवतेच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीविषयी समजून घेणे आवश्यक आहे. ती पट्टी आपण बांधली आहे. बरेचदा प्रकरणांमध्ये पोलीस झपाट्याने तपास करतात. चार्जशिट दाखल करतात. न्यायालय कोणालाही निर्दोष सोडत नाही. प्रकरणामध्ये असलेल्या त्रूट्या न्यायालय समाजापुढे आणते. अपघाताचे उदाहरण देत न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनाची नोंद होते. मग, हे अज्ञात वाहन सांगण्याची जबाबदारी समाजातील नागरिकांची आहे. न्यायालयापुढे एकच काम आहे, ज्या माणसाला गुन्हेगार म्हणून न्यायालयासमोर आणले तो गुन्हेगार आहे वा नाही. गुन्हेगार कोण आहे, हे शोधण्याची जबाबदारी न्यायालयाची नाही. ती जबाबदारी समाजाची, पोलिसांची आहे. शहरामध्ये इमारतींचे जंगल उभे झाल्याचे दिसते. झाडे सोयीस्कररित्या कापली जात आहेत. पुढील काळात बांधकाम पाडून झाडे लावावी लागणार आहेत, असेही न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. अजित सदावर्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्ही.टी. देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील वकील प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)