शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

अहिंसेच्या मार्गानेच उन्नती शक्य आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:01 IST

देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढण्याचे आव्हान राष्ट्रासमोर उभे आहे;

ठळक मुद्देगोल्डस्मिथ : बुद्ध विहाराचा २१ वा वर्धापन दिन

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढण्याचे आव्हान राष्ट्रासमोर उभे आहे; पण जग अहिंंसेच्या मार्गानेच जिंकता येऊ शकते. अहिंसेत उन्नतीचा मार्ग दडलेला आहे. हिच शिकवण भगवान गौतम बुद्धासह महापुरूष व राष्ट्रसंतांनी दिली, असे मत केंद्रीय दारूगोळा भांडाराचे प्रमुख ब्रिगेडिअर आय.व्ही.ओ.आर. गोल्डस्मिथ यांनी व्यक्त केले.सीएडी कॅम्प येथील बुद्ध विहाराच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धम्म मेळावा व सत्कार समारंभही घेण्यात आला. मोहन अग्रवाल यांनी ‘भगवान गौतम बुद्धाच्या अहिंसेच्या शस्त्राने जगातील कोणतेही युद्ध जिंकता येते. त्यांच्या संदेशाने संपूर्ण विश्वात शांती निर्माण करता येते, असे सांगितले. यावेळी इमरान राही, अनिल नरेडी, विहार समितीचे सचिव प्यारेलाल रामटेके, भन्ते माहागो गलणभबई, कमल धम्मोभबई, धम्मबोधी, विशुद्धानंद, उपअभियंता नाईक, अत्तरचंद खत्री, सत्कारमूर्ती मेजर शिवेंद्र त्रिपाठी, डॉ. प्रमोद नितनवरे, नितीन सिदुरकर आदी उपस्थित होते. मे २०१६ च्या रात्री भांडारात झालेल्या अग्निस्फोटात जीव धोक्यात घालणाºया मेजर त्रिपाठी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दंत शिबिरात डॉ. वैभव व डॉ. विभा पाटणी यांनी ४०० रुग्णांची तपासणी केली. प्रास्ताविक रामटेके यांनी, संचालन रंजना जीवने यांनी केले तर आभार सुनील मून यांनी मानले. समाज बांधवानी सहकार्य केले.